शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

चाळीसगावला एक हजार मृत जनावरांची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

चाळीसगाव : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. पुराच्या पाण्यात अनेक गुरांना जलसमाधी मिळाली. पशुपालक, शेतकरी ...

चाळीसगाव : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. पुराच्या पाण्यात अनेक गुरांना जलसमाधी मिळाली. पशुपालक, शेतकरी यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असून, शुक्रवारअखेर यात ४०४ लहान, ६१३ मोठी, अशा एक हजार १७ मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

महापूर आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बाणगाव, खेर्डे, सोनगाव, वाकडी, वाघडू, रोकडे, हातले, जावळे, मजरे, भामरे आदी गावांना बसला आहे. या गावांसोबतच एकूण ४२ गावांमधील शेती पिके व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. ४० हून अधिक नागरिकांचे घरासह संसारोपयोगी साहित्य पुराच्या जबड्याने गिळून घेतले.

.......

दावणीचे जित्राब मुके-अबोल अन् शेतकऱ्यांचा हंबरडा

एरवी पशुपालकांना पाहून आनंदाने हंबरडा फोडणारी गुरे मंगळवारी आलेल्या पुराने कायमची गपगार झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. पुरात मृत झालेली गुरे पाहून शेतकरी व पशुपालकांनीच हंबरडे फोडला. हे दुःख भयावह व मन सुन्न करणारे आहे. गत दोन दिवसांत पूरग्रस्त सावरत असून, मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली जात आहे.

.......

चौकट १०१७ मृत जनावरांची लावली विल्हेवाट

पुराच्या आक्राळ-विक्राळ संकटात गायी, म्हशी, बैल, शेळी आदी जनावरे मृत्युमुखी पडली. यात दुभत्या जनावरांचाही समावेश होता. मृत जनावरांचे पंचनामे झाल्यानंतर १०१७ जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

1...काही गावांमध्ये जनावरे फुगल्याने मोठी दुर्गंधी पसरली होती. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. पूरग्रस्तांनी प्रशासनाची वाट न पाहता मृत गुरे जमिनीत पुरली. काही गावांमध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. पूरग्रस्तांना दिली जाणारी कोणतीही मदत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याने ते संतप्त झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

2...वाकडी गावात सर्वाधिक १४४ लहान, तर ३१३ मोठी अशा ४५७ पशुधनाची हानी झाली. रोकडे येथे ३५ लहान, १५२ मोठी, वाघडू येथे लहान ५२, मोठी ३५ मृत जनावरे पुरण्यात आली.

......

इनफो

प्रशासनाने सर्व मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली आहे. काही गावांमध्ये पशुपालकांनी स्वतःहून विल्हेवाट लावली. काही गावांमध्ये प्रशासनाने सहकार्यही केले.

- अमोल मोरे

तहसीलदार, चाळीसगाव

.... इनफो

जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम ग्रामपंचायतीला करावे लागले. कोणतीही मदत शासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे पूरग्रस्त हतबल झाले आहेत.

- प्रकाश पाटील

सरपंच, वाकडी, ता. चाळीसगाव