शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

चाळीसगावला एक हजार मृत जनावरांची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST

चाळीसगाव : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. पुराच्या पाण्यात अनेक गुरांना जलसमाधी मिळाली. पशुपालक, शेतकरी ...

चाळीसगाव : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने सर्वत्र हाहाकार उडाला होता. पुराच्या पाण्यात अनेक गुरांना जलसमाधी मिळाली. पशुपालक, शेतकरी यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असून, शुक्रवारअखेर यात ४०४ लहान, ६१३ मोठी, अशा एक हजार १७ मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

महापूर आणि अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बाणगाव, खेर्डे, सोनगाव, वाकडी, वाघडू, रोकडे, हातले, जावळे, मजरे, भामरे आदी गावांना बसला आहे. या गावांसोबतच एकूण ४२ गावांमधील शेती पिके व पशुधनाचे अतोनात नुकसान झाले आहे. ४० हून अधिक नागरिकांचे घरासह संसारोपयोगी साहित्य पुराच्या जबड्याने गिळून घेतले.

.......

दावणीचे जित्राब मुके-अबोल अन् शेतकऱ्यांचा हंबरडा

एरवी पशुपालकांना पाहून आनंदाने हंबरडा फोडणारी गुरे मंगळवारी आलेल्या पुराने कायमची गपगार झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. पुरात मृत झालेली गुरे पाहून शेतकरी व पशुपालकांनीच हंबरडे फोडला. हे दुःख भयावह व मन सुन्न करणारे आहे. गत दोन दिवसांत पूरग्रस्त सावरत असून, मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली जात आहे.

.......

चौकट १०१७ मृत जनावरांची लावली विल्हेवाट

पुराच्या आक्राळ-विक्राळ संकटात गायी, म्हशी, बैल, शेळी आदी जनावरे मृत्युमुखी पडली. यात दुभत्या जनावरांचाही समावेश होता. मृत जनावरांचे पंचनामे झाल्यानंतर १०१७ जनावरांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

1...काही गावांमध्ये जनावरे फुगल्याने मोठी दुर्गंधी पसरली होती. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. पूरग्रस्तांनी प्रशासनाची वाट न पाहता मृत गुरे जमिनीत पुरली. काही गावांमध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाची कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. पूरग्रस्तांना दिली जाणारी कोणतीही मदत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याने ते संतप्त झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

2...वाकडी गावात सर्वाधिक १४४ लहान, तर ३१३ मोठी अशा ४५७ पशुधनाची हानी झाली. रोकडे येथे ३५ लहान, १५२ मोठी, वाघडू येथे लहान ५२, मोठी ३५ मृत जनावरे पुरण्यात आली.

......

इनफो

प्रशासनाने सर्व मृत झालेल्या जनावरांची विल्हेवाट लावली आहे. काही गावांमध्ये पशुपालकांनी स्वतःहून विल्हेवाट लावली. काही गावांमध्ये प्रशासनाने सहकार्यही केले.

- अमोल मोरे

तहसीलदार, चाळीसगाव

.... इनफो

जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम ग्रामपंचायतीला करावे लागले. कोणतीही मदत शासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे पूरग्रस्त हतबल झाले आहेत.

- प्रकाश पाटील

सरपंच, वाकडी, ता. चाळीसगाव