शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
4
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
5
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
6
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
7
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
8
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
9
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
10
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
11
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
12
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
13
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
14
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
15
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
16
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
17
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
18
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
19
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
20
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स

विद्यार्थांच्या परिक्षांबाबत बोर्डाच्या सचिवांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कवी-लेखक डॉ.मिलिंद बागुल यांनी मराठी भाषा आणि बोली भाषा यांच्या वाहक असणाऱ्या साहित्याने सामाजिक , सांस्कृतिक जाणं प्रगल्भ करीत विचारधारा जोडण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अब्दुल करीम सालार ,मुख्याध्यापक डॉ. शेख हरून बशीर, शालेय समिती सभापती प्रा. एस. एम. जाफर आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन जाकीर हुसेन यांनी तर आभार जावेद शेख असलम यांनी मानले.

रेल्वेतही ज्येष्ठांना सवलत देण्याची मागणी

जळगाव : एसटी महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यात येत असतांना, रेल्वेत मात्र कुठलीही सवलत देण्यात येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनानेही रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी राहत असून, यामुळे शेवटच्या जनरल डब्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे अनेक प्र‌वाशांना उभे राहुन प्र‌वास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

जळगाव : टॉवर चौकात सिंग्रल यंत्रणा नेहमी बंद असल्यामुळे वाहने सुसाट धावत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने टॉवर चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुक कोंडी

जळगाव : नवीन बस स्थानकासमोर नेहमी दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत असल्यामु‌ळे, रस्त्यावरील वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी दररोज वाहतुक कोंडी उद्भवत असून, नागरिकांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे.

पथदिवे लावण्याची मागणी

जळगाव : मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात रात्री अनेक ठिकाणी पथदिवे राहत असल्यामुळे, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपाने या भागात पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.