शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

विद्यार्थांच्या परिक्षांबाबत बोर्डाच्या सचिवांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:14 IST

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कवी-लेखक डॉ.मिलिंद बागुल यांनी मराठी भाषा आणि बोली भाषा यांच्या वाहक असणाऱ्या साहित्याने सामाजिक , सांस्कृतिक जाणं प्रगल्भ करीत विचारधारा जोडण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अब्दुल करीम सालार ,मुख्याध्यापक डॉ. शेख हरून बशीर, शालेय समिती सभापती प्रा. एस. एम. जाफर आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन जाकीर हुसेन यांनी तर आभार जावेद शेख असलम यांनी मानले.

रेल्वेतही ज्येष्ठांना सवलत देण्याची मागणी

जळगाव : एसटी महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यात येत असतांना, रेल्वेत मात्र कुठलीही सवलत देण्यात येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनानेही रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी राहत असून, यामुळे शेवटच्या जनरल डब्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे अनेक प्र‌वाशांना उभे राहुन प्र‌वास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

जळगाव : टॉवर चौकात सिंग्रल यंत्रणा नेहमी बंद असल्यामुळे वाहने सुसाट धावत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने टॉवर चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुक कोंडी

जळगाव : नवीन बस स्थानकासमोर नेहमी दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत असल्यामु‌ळे, रस्त्यावरील वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी दररोज वाहतुक कोंडी उद्भवत असून, नागरिकांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे.

पथदिवे लावण्याची मागणी

जळगाव : मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात रात्री अनेक ठिकाणी पथदिवे राहत असल्यामुळे, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपाने या भागात पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.