शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शिस्तीचा बडगा कायम असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:10 IST

जिल्हा परिषद

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी विविध कामांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही सुरु केले आहे. यासाठी काही ठिकाणी अचानक भेटी देवून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण केला आहे. असे असले तरी हा असर जास्त काळ टिकत नाही, असेच दिसून येते. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत काही विभागांमध्ये अचानक भेटी देवून कामाच्या वेळेत कार्यालयात हजर नसलेले तसेच रजा न घेता कार्यालयातच न आलेले ... अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन विभागांना भेटी देवून झाडाझडती केली होती. यावेळी सर्व व्यवस्थित आढळले मात्र दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी अचानक भेट दिली असता गटविकास अधिकारी यांच्यासह १० कर्मचारी कार्यालयातच नव्हते. याची दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या महिन्यात पाचोरा पं. स. मध्येही अचानक भेट दिली असता गैरहजर असलेल्या पाच अभियंत्यांना थेट निलंबित केले होते. ही बाब लक्षात घेता इतरांनी सावध होणे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसत नाही. जळगाव पंचायत समितीला तर हा धाक अधिक असायला हवा, कारण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जळगाव येथेच कार्यालय असल्याने ते केव्हाही आपल्याही पंचायत समितीत भेट देवू शकतात हे संबंधितांनी गृहीत धरायला हवे होते. परंतु दुर्लक्ष करण्याचा मानवी स्वभाव या सर्वांना नडला. यामुळेच शिस्तीचा हा बडगा एकदा किंवा दोनदा नव्हे तर नेहमीच उगारणे गरजेचे आहे.