शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

शिस्तीचा बडगा कायम असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 15:10 IST

जिल्हा परिषद

हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी विविध कामांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही सुरु केले आहे. यासाठी काही ठिकाणी अचानक भेटी देवून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण केला आहे. असे असले तरी हा असर जास्त काळ टिकत नाही, असेच दिसून येते. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत काही विभागांमध्ये अचानक भेटी देवून कामाच्या वेळेत कार्यालयात हजर नसलेले तसेच रजा न घेता कार्यालयातच न आलेले ... अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन विभागांना भेटी देवून झाडाझडती केली होती. यावेळी सर्व व्यवस्थित आढळले मात्र दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी अचानक भेट दिली असता गटविकास अधिकारी यांच्यासह १० कर्मचारी कार्यालयातच नव्हते. याची दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या महिन्यात पाचोरा पं. स. मध्येही अचानक भेट दिली असता गैरहजर असलेल्या पाच अभियंत्यांना थेट निलंबित केले होते. ही बाब लक्षात घेता इतरांनी सावध होणे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसत नाही. जळगाव पंचायत समितीला तर हा धाक अधिक असायला हवा, कारण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जळगाव येथेच कार्यालय असल्याने ते केव्हाही आपल्याही पंचायत समितीत भेट देवू शकतात हे संबंधितांनी गृहीत धरायला हवे होते. परंतु दुर्लक्ष करण्याचा मानवी स्वभाव या सर्वांना नडला. यामुळेच शिस्तीचा हा बडगा एकदा किंवा दोनदा नव्हे तर नेहमीच उगारणे गरजेचे आहे.