शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
2
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
3
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
4
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
5
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
6
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
7
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
8
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान
9
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
10
'ब्लड मनी' घेण्यास तलालच्या कुटुंबाने दिला नकार! येमेनमधल्या निमिषा प्रियाला वाचवण्याची एकमेव आशाही धूसर?
11
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
12
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
13
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
14
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
15
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
16
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
17
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
18
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
19
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
20
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

सामान्यांची निराशा, उद्योगपतीधार्जिणा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा ...

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपतीधार्जिणा असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल

अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असून यातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण ठोस पाऊल टाकले आहे. कोविडच्या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला असताना आपण कोरोनावर मात करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलले आहेत. याच्या जोडीला अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.

- गिरीश महाजन, माजी मंत्री

शेतकरी धोरणाला हरताळ

देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याची मोदी सरकारची घोषणा होती. त्‍याचप्रमाणे शेतकऱ्यांच्‍या शेतमालाल दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दिष्‍ट होते. ज्‍या मुद्यांवरून दिल्‍लीच्‍या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहे. तोच मुद्दा या अर्थसंकल्‍पात दिसून येत नाही. हमीभावापोटी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये दिल्‍याचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. प्रत्‍यक्षात शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर उत्‍पादनाचा खर्च निघेल एवढीदेखील रक्‍कम जमा झाली नाही. जगभरात कोरोना महामारीने अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आली. अर्थव्‍यवस्‍था मजबूत करण्याच्‍या दृष्‍टीने देखील ठोस धोरणांचा अभाव अर्थसंकल्‍पात आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी हिताच्‍या धोरणाला यंदाच्‍या अर्थसंकल्‍पातही मोदी सरकारने हरताळ फासला आहे.

- डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस.

निराशाजनक

हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र फारसे काही पदरी पडलेले नाही. कृषी क्षेत्राचीही निराशा आहे. उद्योगांसाठी हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांचे यामुळे कंबरडे मोडले जाणार आहे.

- ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

सर्वच क्षेत्राची आर्थिक हानी झाली असताना आवश्यक उपाययोजना नाही. आरोग्यासाठी हवी तेवढी तरतूद नसून शेतीसाठीही आ‌वश्यक घोषणा नाही.

- ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस.

महाराष्ट्राला ठेंगा

आकस तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याच राज्यांना भरीव मदत, महाराष्ट्राला ठेंगा, नाशिक व नागपूरलासुद्धा राजकीय हेतूने मदत, रोजगार देण्याऐवजी कंपनीतील तरुणांना बेरोजगार करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना नवी योजना नाही, म्हणून हा राजकीय हेतूने प्रेरित अर्थसंकल्प आहे.

- गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख, शिवसेना