शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

सामान्यांची निराशा, उद्योगपतीधार्जिणा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा ...

जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपतीधार्जिणा असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल

अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असून यातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण ठोस पाऊल टाकले आहे. कोविडच्या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला असताना आपण कोरोनावर मात करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलले आहेत. याच्या जोडीला अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.

- गिरीश महाजन, माजी मंत्री

शेतकरी धोरणाला हरताळ

देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याची मोदी सरकारची घोषणा होती. त्‍याचप्रमाणे शेतकऱ्यांच्‍या शेतमालाल दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दिष्‍ट होते. ज्‍या मुद्यांवरून दिल्‍लीच्‍या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहे. तोच मुद्दा या अर्थसंकल्‍पात दिसून येत नाही. हमीभावापोटी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये दिल्‍याचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. प्रत्‍यक्षात शेतकऱ्याच्‍या खात्‍यावर उत्‍पादनाचा खर्च निघेल एवढीदेखील रक्‍कम जमा झाली नाही. जगभरात कोरोना महामारीने अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आली. अर्थव्‍यवस्‍था मजबूत करण्याच्‍या दृष्‍टीने देखील ठोस धोरणांचा अभाव अर्थसंकल्‍पात आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी हिताच्‍या धोरणाला यंदाच्‍या अर्थसंकल्‍पातही मोदी सरकारने हरताळ फासला आहे.

- डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस.

निराशाजनक

हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र फारसे काही पदरी पडलेले नाही. कृषी क्षेत्राचीही निराशा आहे. उद्योगांसाठी हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांचे यामुळे कंबरडे मोडले जाणार आहे.

- ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

सर्वच क्षेत्राची आर्थिक हानी झाली असताना आवश्यक उपाययोजना नाही. आरोग्यासाठी हवी तेवढी तरतूद नसून शेतीसाठीही आ‌वश्यक घोषणा नाही.

- ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस.

महाराष्ट्राला ठेंगा

आकस तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याच राज्यांना भरीव मदत, महाराष्ट्राला ठेंगा, नाशिक व नागपूरलासुद्धा राजकीय हेतूने मदत, रोजगार देण्याऐवजी कंपनीतील तरुणांना बेरोजगार करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना नवी योजना नाही, म्हणून हा राजकीय हेतूने प्रेरित अर्थसंकल्प आहे.

- गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख, शिवसेना