शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कर्ज वसुलीसाठी तारण मालमत्तेचा थेट लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:37 IST

महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची माहिती

ठळक मुद्देकायदा संमत होणार  

हितेंद्र काळुंखेजळगाव : सहकार चळवळ राष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची आहे, मात्र सहकारी बँका आणि पतपेढ्या यातील चुकीच्या कार्यपद्धतीमुळे तसेच बुडव्या कर्जदारांमुळे अनेक पतपेढ्या आणि बँकाही अडचणीत आल्या आहेत. याची दखल घेत राज्य सरकार नवीन कायदा आणत असून याद्वारे कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेचा थेट लिलाव करुन संबंधित संस्था आपली वसुली करु शकेल, अशी माहिती महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शहरात ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांच्याशी केलेली बाचचित पुढील प्रमाणे.प्रश्न: जिल्ह्यात ठेवीदारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे, त्यांना न्याय मिळणार की नाही?उत्तर: गेल्या अनेक वर्षात सहकार चळवळीकडे दुर्लक्ष झाले यामुळे सहकार क्षेत्राला अनेक आजार जडले. बँका किंवा पतपेढ्यांकडे वसुलीची प्रभावी यंत्रणा नाही. यामुळे अनेक पतपेढ्या डबघाईस जात असल्याने आता मात्र सरकारने वसुलीसाठी फास्ट ट्रॅक सुरु केला आहे. स्वतंत्र पॅनलची निर्मिती यासाठी केली आहे. यामुळे हळू हळू ठेवीदारांना पैसे मिळू लागले आहेत, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घ्यायला हवा.प्रश्न : बºयाचदा संस्था वसुलीसाठी न्यायालयामध्ये गेल्यास वेळ आणि पैसाही खर्ची पडतो, यामुळे वसुलीत अडचणी येतात. यावर काही उपाय नाही का.?उत्तर : ही बाब लक्षात घेत सरकारने आता नवीन कायदा आणण्याचे ठरवले आहे. हा कायदा विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. या कायद्यान्वये एखाद्या सहकारी बँक किंवा पतपेढीने तारण ठेवून कर्ज दिले असेल तर कर्ज मिळत नसल्यास संबंधित संस्था ही तारण ठेवलेल्या मालमत्तेचा थेट लिलाव करुन आपला पैसा वसुल करु शकणार आहे. न्यायालयात वगैरे जायची गरज राहणार नाही, यामुळे वसुली सोपी होणार आहे. हा कायदा सध्या केवळ भूविकास बँकेला लागू आहे. या आधी सहा महिन्यांपूर्वी दिवाळखोरीचा कायदा सरकारने जाहीर केला आहे. सध्या संस्था विरुद्ध कंपनी अशी प्रोसेस अनेक ठिकाणी सुरु आहे. पुढे संस्था विरुद्ध व्यक्ती अशी कार्यवाहीही सुरु होईल, प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीस काही काळ द्यावाच लागतो.प्रश्न : अनेकदा पतसंस्था किंवा सहकारी बॅँकचालकच घोटाळा करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत,असे असताना अनेकांवर हवी तशी कारवाई होताना का दिसत नाही?उत्तर : अशाअनेकवेया दुसºयाच्या नावावर मालमत्ता घेणे व कर्ज घेणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र अशा प्रकरणांमध्येही आता इडी मार्फत चौकशी होवू लागली आहे. अशा मालमत्ता जप्त केल्या आहेत. पेन अर्बन बँकेचे उदाहरण यासाठी देता येईल. संबंधित व्यक्ती मग आपोआप खºया मालकाचे नाव सांगते, अशा वेळी घोटाळे करणारे वाचू शकत नाहीत.प्रश्न: सहकारी बँका, पतपेढ्या तसेच विविध सहकारी संस्था यांचे रोजच बाहेर येत असलेले होणारे घोटाळे पाहता सहकार क्षेत्रात स्वाहाकार वाढला आहे, असे म्हणता येईल का? सहकार क्षेत्राचे भविष्य काय?उत्तर: सहकार क्षेत्रात अनेक वर्षात सरकारकडून दुर्लक्ष झाले. सवंग लोकप्रियता आणि कार्यकर्ते जपण्यासाठीच सहकर क्षेत्राचा उपयोग झाला. यामुळे या क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे, हे मान्यच करावे लागेल. मात्र देशाच्या विकासासाठी भांडवलवादी आणि समाजवादी अशी कोणती एकच नाही तर दोन्ही मिश्र अर्थव्यवस्था लाभदायी असल्याचे बहुतांश अर्थतज्ज्ञांनाही मान्य झाले आहे. ही अर्थव्यवस्था सहकारातच असून सहकार टिकणे आणि वाढणे देशाच्या दृष्टीने गरजचे आहे. मात्र त्यासाठी सहकाराला लागलेला भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा आजार हा दूर करणे गरजेचे आहे. यावर सरकारतर्फे काही कायदे आता आणले जात असून विविध उपाय योजले जात आहे. यामुळे नक्कीच इलाज होऊन सहकार क्षेत्र समृद्ध केले जाईल. याचे उदाहरण द्यायचे झाले तर राज्य सहकारी बँकेचे पुनर्जीवन केले असून ही बँक आता चांगली कामगिरी करीत आहे. याचबरोबर साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी साडेआठ हजार कोटी देण्यात आले. ग्रामीण भागापर्यंत सहकारात विकास साधण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरु झाले आहेत.घोटाळे करणारे वाचू शकत नाहीअनेकवेळा दुसºयाच्या नावावर मालमत्ता घेणे व कर्ज घेणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र अशा प्रकरणांमध्येही आता इडी मार्फत चौकशी होवू लागली आहे. अशा मालमत्ता जप्त केल्या आहेत. संबंधित व्यक्ती खºया मालकाचे नाव सांगते, अशा वेळी घोटाळे करणारे वाचू शकत नाहीत.