शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

कर्ज वसुलीसाठी तारण मालमत्तेचा थेट लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:37 IST

महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची माहिती

ठळक मुद्देकायदा संमत होणार  

हितेंद्र काळुंखेजळगाव : सहकार चळवळ राष्ट्राच्या विकासासाठी महत्वाची आहे, मात्र सहकारी बँका आणि पतपेढ्या यातील चुकीच्या कार्यपद्धतीमुळे तसेच बुडव्या कर्जदारांमुळे अनेक पतपेढ्या आणि बँकाही अडचणीत आल्या आहेत. याची दखल घेत राज्य सरकार नवीन कायदा आणत असून याद्वारे कर्जापोटी तारण ठेवलेल्या मालमत्तेचा थेट लिलाव करुन संबंधित संस्था आपली वसुली करु शकेल, अशी माहिती महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शहरात ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांच्याशी केलेली बाचचित पुढील प्रमाणे.प्रश्न: जिल्ह्यात ठेवीदारांचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे, त्यांना न्याय मिळणार की नाही?उत्तर: गेल्या अनेक वर्षात सहकार चळवळीकडे दुर्लक्ष झाले यामुळे सहकार क्षेत्राला अनेक आजार जडले. बँका किंवा पतपेढ्यांकडे वसुलीची प्रभावी यंत्रणा नाही. यामुळे अनेक पतपेढ्या डबघाईस जात असल्याने आता मात्र सरकारने वसुलीसाठी फास्ट ट्रॅक सुरु केला आहे. स्वतंत्र पॅनलची निर्मिती यासाठी केली आहे. यामुळे हळू हळू ठेवीदारांना पैसे मिळू लागले आहेत, यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घ्यायला हवा.प्रश्न : बºयाचदा संस्था वसुलीसाठी न्यायालयामध्ये गेल्यास वेळ आणि पैसाही खर्ची पडतो, यामुळे वसुलीत अडचणी येतात. यावर काही उपाय नाही का.?उत्तर : ही बाब लक्षात घेत सरकारने आता नवीन कायदा आणण्याचे ठरवले आहे. हा कायदा विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात मांडला जाणार आहे. या कायद्यान्वये एखाद्या सहकारी बँक किंवा पतपेढीने तारण ठेवून कर्ज दिले असेल तर कर्ज मिळत नसल्यास संबंधित संस्था ही तारण ठेवलेल्या मालमत्तेचा थेट लिलाव करुन आपला पैसा वसुल करु शकणार आहे. न्यायालयात वगैरे जायची गरज राहणार नाही, यामुळे वसुली सोपी होणार आहे. हा कायदा सध्या केवळ भूविकास बँकेला लागू आहे. या आधी सहा महिन्यांपूर्वी दिवाळखोरीचा कायदा सरकारने जाहीर केला आहे. सध्या संस्था विरुद्ध कंपनी अशी प्रोसेस अनेक ठिकाणी सुरु आहे. पुढे संस्था विरुद्ध व्यक्ती अशी कार्यवाहीही सुरु होईल, प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीस काही काळ द्यावाच लागतो.प्रश्न : अनेकदा पतसंस्था किंवा सहकारी बॅँकचालकच घोटाळा करतात. अशी अनेक उदाहरणे आहेत,असे असताना अनेकांवर हवी तशी कारवाई होताना का दिसत नाही?उत्तर : अशाअनेकवेया दुसºयाच्या नावावर मालमत्ता घेणे व कर्ज घेणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र अशा प्रकरणांमध्येही आता इडी मार्फत चौकशी होवू लागली आहे. अशा मालमत्ता जप्त केल्या आहेत. पेन अर्बन बँकेचे उदाहरण यासाठी देता येईल. संबंधित व्यक्ती मग आपोआप खºया मालकाचे नाव सांगते, अशा वेळी घोटाळे करणारे वाचू शकत नाहीत.प्रश्न: सहकारी बँका, पतपेढ्या तसेच विविध सहकारी संस्था यांचे रोजच बाहेर येत असलेले होणारे घोटाळे पाहता सहकार क्षेत्रात स्वाहाकार वाढला आहे, असे म्हणता येईल का? सहकार क्षेत्राचे भविष्य काय?उत्तर: सहकार क्षेत्रात अनेक वर्षात सरकारकडून दुर्लक्ष झाले. सवंग लोकप्रियता आणि कार्यकर्ते जपण्यासाठीच सहकर क्षेत्राचा उपयोग झाला. यामुळे या क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे, हे मान्यच करावे लागेल. मात्र देशाच्या विकासासाठी भांडवलवादी आणि समाजवादी अशी कोणती एकच नाही तर दोन्ही मिश्र अर्थव्यवस्था लाभदायी असल्याचे बहुतांश अर्थतज्ज्ञांनाही मान्य झाले आहे. ही अर्थव्यवस्था सहकारातच असून सहकार टिकणे आणि वाढणे देशाच्या दृष्टीने गरजचे आहे. मात्र त्यासाठी सहकाराला लागलेला भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा आजार हा दूर करणे गरजेचे आहे. यावर सरकारतर्फे काही कायदे आता आणले जात असून विविध उपाय योजले जात आहे. यामुळे नक्कीच इलाज होऊन सहकार क्षेत्र समृद्ध केले जाईल. याचे उदाहरण द्यायचे झाले तर राज्य सहकारी बँकेचे पुनर्जीवन केले असून ही बँक आता चांगली कामगिरी करीत आहे. याचबरोबर साखर उद्योगाला बळकटी देण्यासाठी साडेआठ हजार कोटी देण्यात आले. ग्रामीण भागापर्यंत सहकारात विकास साधण्याचे प्रयत्न जोरदारपणे सुरु झाले आहेत.घोटाळे करणारे वाचू शकत नाहीअनेकवेळा दुसºयाच्या नावावर मालमत्ता घेणे व कर्ज घेणे असे प्रकार होताना दिसतात. मात्र अशा प्रकरणांमध्येही आता इडी मार्फत चौकशी होवू लागली आहे. अशा मालमत्ता जप्त केल्या आहेत. संबंधित व्यक्ती खºया मालकाचे नाव सांगते, अशा वेळी घोटाळे करणारे वाचू शकत नाहीत.