शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त स्वस्त धान्य दुकानात ज्येष्ठांना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST

नशिराबाद : जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानात केवायसी ठसे घेण्यावरून ग्राहक व दुकानदार यांच्यात खटके उडत असतात त्यातच ज्येष्ठ ...

नशिराबाद : जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानात केवायसी ठसे घेण्यावरून ग्राहक व दुकानदार यांच्यात खटके उडत असतात त्यातच ज्येष्ठ नागरिकांना तर हेलपाटे मारावे लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत शासनाने याबाबत पर्यायी काढावा व ज्येष्ठांना हाल थांबावेत, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते ललित बराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शिधावाटप दुकानामध्ये शिधापत्रिकाधारकांना धान्य घेण्यासाठी के.वाय.सी तसेच थंब इम्प्रेशन मशीन लावण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार यात थंब इम्प्रेशन जुळणाऱ्या व्यक्तीलाच धान्य दिले जाते. मात्र वयस्कर नागरिकांचे वयोमानानुसार बोटाचे ठसे योग्य पद्धतीने जुळत नसल्यामुळे ऑनलाइन थंब इम्प्रेशन मशीनमधे त्यांच्या नावासमोर सिडिंग

झालेली नाही म्हणून त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना घरातील वयस्कर व्यक्तीला रेशन घेण्यासाठी जाणे तसेच मुख्य कार्यालयात सतत फेऱ्या मारणे शक्य होत नाही. यावर ठोस उपाययोजना शिधावाटप अधिकाऱ्यांनी करून ज्येष्ठ नागरिकांना शिधावाटप दुकानातून धान्य देणेबाबत सहकार्य करावे.

जेष्ठ नागरिकांना मिळणारे धान्य सहजरित्या उपलब्ध व्हावे,यासाठी शिधावाटप कार्यालयाने उपाययोजना करून विशिष्ट स्टॅम्प शिधापत्रिकेवर मारण्यात यावा व वयोवृद्ध नागरिकांना सहकार्य करण्याबाबतचे आदेश शिधावाटप दुकानदाराना देण्यात यावेत. परिणामी बायोमेट्रिक पद्धतीत वितरण करत असताना अंगठा जुळला नाही तर दुकानदार आणि शिधाधारक यांच्यात नेहमीच वाद होत आहेत. कधी तर या वादाचे पर्यवसान मोठ्या भांडणातही होत आहे. शिधावाटप दुकानामध्ये के.वाय.सी. प्रक्रियेद्वारे पुन्हा आधारकार्ड नव्याने व्हेरिफिकेशन

करण्यात येत आहे. चालू महिन्यात धान्य मिळाले परन्तु पुढील महिन्यात मिळेल याची शाश्वती नाही,याचे कारण थम इम्प्रेशन मशीनमधून अनेक शिधाधारक नागरिकांचा डाटा अचानक उडत असल्यामुळे अनेक नागरिक धान्यापासून वंचित असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या कुटुंबात विधवा स्त्रिया अथवा आजारी व दिव्यांग व्यक्ती किवा ६० वर्ष वरील जेष्ठ नागरिक आहेत व ज्यांना उदर निर्वाहाचे निश्चित असे साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही अश्या कुटुंबाना तसेच ग्रामीण कारागीराना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यासाठी पुरवठा विभागाने विशेष मोहीम राबवावी. शिधावाटप दुकानातून धान्य मिळण्यासाठी त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नानुसार पिवळी, केशरी व शुभ्र

शिधापत्रिकासाठी निश्चित केलेली उत्पन्नाची मर्यादा गेल्या २० वर्षांपूर्वीच्या उत्पन्नावर आधारित आहे. मात्र,या उत्पन्नाच्या मर्यादेत गेल्या २० वर्षांपासून कोणताही बदल झाला नसून उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल.

२०१४ साली भारत सरकारने दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना अन्नसुरक्षा योजना संसदेत मंजूर करून घेतली आणि ती संपूर्ण भारतात लागू झाली. या योजनेमार्फत गरजू गरीब लोकांना स्वस्त दराने धान्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर पुढील टप्प्यात २०१५ पासून शासनाने बायोमेट्रिक पद्धतीत वितरण करण्यासाठी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड मशीनमध्ये टाकून दिले. ज्यामध्ये थंब इम्प्रेशन महत्त्वाचे ठरले. शासनमान्य रेशन दुकानातून वितरित होणारे धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशानेच शासनाने ही नवीन प्रणाली वितरीत केली आहे.यामुळे अनेक बोगस लाभार्थी समोर आलेत त्यामुळे कामकाज अतिशय सुलभ, गतिमान व पारदर्शी झाले आहे म्हणून शासनाने बायोमेट्रिक पद्धतीत वितरण करण्यासाठी घेतलेला निर्णय स्वागतार्थ आहे. परंतु यामध्ये खूप त्रुटी असल्याने शिधापत्रिकाधारकांची अत्यंत गैरसोय होऊ लागली आहे. यंत्रणा प्रथम दोषमुक्त केली जावी आणि त्यानंतरच अशा स्वरूपाची सक्ती करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.