शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नेरी व खरजई पाणी योजनांवरून मतभेद

By admin | Updated: June 6, 2014 13:54 IST

सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले.

सभेत फडकला 'लोकमत'
 
जळगाव : नेरी ता.जामनेर आणि खरजई ता.चाळीसगाव या सामूहिक पाणी योजनांतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी आणि जि.प. अध्यक्ष यांच्यातील मतभेद सर्वसाधारण सभेत उघड झाले. 
सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, सभापती लीलाबाई सोनवणे, कांताबाई मराठे, राजेंद्र राठोड, सीईओ शीतल उगले, अतिरिक्त सीईओ सुनील गायकवाड, सभा सचिव मिनल कुटे उपस्थित होत्या. 
नेरी व खरजई सामूहिक पाणी योजनांचा लाभ घेत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजनांच्या विषयाला सदस्यांनी स्पष्ट विरोध न करता स्वतंत्र पाणी योजना या अयशस्वी ठरल्याची उदाहरणे दिली. 
प्रशासनाच्या प्रमुख म्हणून सीईओ यांनी या योजनांसंबंधी दिलेल्या अभिप्रायाबाबत सांगितले. त्या म्हणाल्या, ज्या गावांमध्ये सामूहिक पाणी योजना आहेत तेथे स्वतंत्र पाणी योजना घेऊन पैशांची उधळपट्टी करायला नको. परंतु जेथे खरोखरच गरज आहे तेथे स्वतंत्र पाणी योजना व्हाव्यात. ज्या गावांमधील स्वतंत्र पाणी योजनांना पाण्याचा स्त्रोत नाही त्या गावांसाठी सामूहिक पाणी योजनाच योग्य असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिल्याचे त्या म्हणाल्या. 
अर्थातच नेरी व खरजई पाणी योजनांचा विषय अध्यक्ष खोडपे यांच्या संमतीने सभागृहात आला होता. विशेष म्हणजे नेरी हे खोडपे यांचे गाव आहे. सदस्यांनी नेरी सामूहिक पाणी योजनेंतर्गत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्यास मंजुरी दिली. पण खरजई योजनेंतर्गत फक्त वडाळा वडाळी या गावात स्वतंत्र योजना घेण्यास मंजुरी दिली गेली. इतर गावांमध्ये सर्वेक्षणानंतर स्वतंत्र पाणी योजना देण्याचा निर्णय झाला.
 
खडसेंचा दबाव आणू नका
नदी संवर्धन योजनेंतर्गत वाघोदा बुद्रूक ता.रावेर येथे चार कोटी १९ लाख रुपयांच्या कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जात असेल तर प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकारही जि.प.लाच द्या. या विषयासंबंधी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांचे नाव विषय सूचित टाकल्याची बाब चुकीची असल्याचे शिवसेनेचे प्रकाश सोमवंशी म्हणाले. त्यांचे नाव टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न त्यांनी केला. या योजनेसंबंधी अटीनुसार ३0 टक्के निधी ग्रा.पं.नेच द्यावा. ग्रा.पं. ने निधी नाही दिला तर सेस फंडातून निधी देण्याची तरतूद होऊ नये.तसेच फक्त इतर गावांमध्येही अशी योजना आणावी, अशी मागणी करण्यात आली. लोकमतचा आधार घेऊन आपले मुद्दे मांडताना सदस्य प्रकाशसोमवंशी.