शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
3
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
4
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
5
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
6
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
7
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
8
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
9
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
10
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
11
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
12
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
13
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
14
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
15
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
16
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
17
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
18
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
19
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
20
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

धुळे भाजपामध्ये आता निकराची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:51 IST

धुळे जिल्ह्यात भाजपामध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळस गाठला आहे. आक्रमक नेते अनिल गोटे यांच्या विरोधाला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे सोपविल्याने निकराची लढाई सुरू झाली आहे.

मिलींद कुलकर्णीधुळ्यातील राजकारण गुंतागुंतीचे आणि संभ्रमित करणारे राहिले आहे. काँग्रेसच्या भरभराटीच्या काळात रोहिदास पाटील, द.वा.पाटील, अमरीशभाई पटेल, रामराव पाटील या दिग्गज नेत्यांचा दबदबा होता. राज्य मंत्रिमंडळात किमान एक तरी मंत्री हमखास असायचा. पक्षांतर्गत मतभेद होतो. जवाहर आणि अँकर गट प्रसिध्द होते. या गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. एकदा जिल्हा परिषद हातातून गेली तर एकदा महापौरपद गेले. आधी लोकसभा, नंतर विधानसभेच्या जागा घटल्या. अलिकडे धुळे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाने हिसकावले. गटबाजीचा हा परिणाम दोन्ही काँग्रेसने भोगला आहे. विरोधी पक्ष बनल्यावर दोघांना त्याची जाणीव झाल्याने जिल्हा बँकेची निवडणूक असो की, आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक असो, दोन्ही पक्ष सामंजस्य व सामोपचाराची भाषा करीत आहे.याउलट चित्र भाजपामध्ये आहे. भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने आणि दोन्ही ठिकाणची मंत्रिपदे धुळे जिल्ह्याला मिळाली असल्याने नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच हवेत आहेत. त्यांच्या हवेला टाचणी लावण्याचे काम स्वकीय आमदार अनिल गोटे यांनी चालविले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि पर्यटन व रोहयोमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत गोटे यांनी उभा दावा मांडला आहे. धुळ्यातील विकास कामांमध्ये दोन्ही मंत्री आडकाठी आणत असल्याचा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासारख्या योजनांवरुन गोटे हे मंत्र्यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याने भामरे-रावल नाराज होते. पांझरा चौपाटीचे अतिक्रमण काढणे, पांझरेच्या दोन्ही तिरावर रस्ते बांधणे, रस्ते कामात अडथळा ठरणाऱ्या मंदिरांचे अतिक्रमण हटविणे या विषयावरून आमदार आणि मंत्रिगटातील वाद विकोपाला गेला. मंत्री हे मुख्यमंत्री, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना कार्यक्रमाला बोलावित तर गोटे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करीत असत. पण या दौºयांमध्ये गटबाजीचे दर्शन घडत असे.पत्रकार, शेतकरी नेते, बेरोजगारांचे नेते अशा भूमिकेतून राजकारणात स्थिरावलेल्या अनिल गोटे यांनी १५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात चढउतार पाहिले. तेलगी प्रकरणात कारागृहात जाऊन आलेल्या गोटे यांनी धुळ्यावरील पकड मात्र भक्कम ठेवली. पत्नी हेमा गोटे यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले. शिवतीर्थ, पांझरा चौपाटी, रस्ते, भाजीमार्केट अशा विकास कामांसोबत अतिक्रमण हटाव मोहीम ही गोटे यांची बलस्थाने आहेत. मंत्रालयापासून तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत संचार असलेल्या गोटे यांनी राजकारणाची नाडी अचूक ओळखली आहे. विरोधकांच्या कारवायांचा सुगावा त्यांना सर्वात आधी लागतो. त्यामुळे विरोधक उघडपणे त्यांच्या वाटेला जात नाही. अलिकडे भामरे आणि राष्टÑवादीचे राजवर्धन कदमबांडे यांनी गोटे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.दोन्ही मंत्र्यांचा मानसन्मान राखला जात नसल्याने पक्षश्रेष्ठी गोटे यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. लोकसंग्राम या संघटनेच्या माध्यमातून गोटे यांचे कार्य सुरू होते, याकडे पक्षश्रेष्ठी कानाडोळा करू शकत नव्हते. त्यामुळे पक्षांतर्गत वाद हाताळण्याचे कौशल्य लाभलेल्या गिरीश महाजन या मुख्यमंत्र्यांच्या जवळील मंत्र्याला धुळ्याची जबाबदारी देण्यात आली. अधिकृत घोषणा आता झाली असली तरी महिनाभर आधीच महाजन सक्रीय झालेले आहेत. दोनदा ते धुळ्यात येऊन गेले तर एकदा भामरे यांनी जळगावात त्यांच्यासोबत गुप्तगू केले. महाजनांच्या नियुक्तीला गोटे विरोध करतील, ही पक्षश्रेष्ठींची अपेक्षा खरी ठरली. आता गोटे काय भूमिका घेतात याविषयी पक्षश्रेष्ठींपासून तर सामान्य जनतेपर्यंत उत्सुकता राहणार आहे.महापालिकेत सध्या सत्ता राष्टÑवादी काँग्रेसची आहे. दोन्ही कॉंग्रेस एकत्रितपणे निवडणुका लढवतात काय हा प्रश्न महत्वाचा राहील. शिवसेना हा महत्त्वाचा घटक आहे. परंतु या पक्षालाही गटबाजीने ग्रासले आहे. भाजपाची सगळी मदार ही इतर पक्षांमधील नाराज मातब्बरांवर राहणार आहे. जळगावची पुनरावृत्ती करण्याचा महाजन यांचा प्रयत्न राहणार आहे.खान्देशातील जळगाव आणि धुळे या दोन मुख्यालयांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून सत्ताधारी भाजपामध्ये नवे समीकरण, भविष्यातील पक्षाच्या वाटचालीची दिशा निश्चित होत आहे. जळगावात खडसे तर धुळ्यात गोटे यांना पक्षाने दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेसाठी ‘साम-दाम-दंड-भेद’ नीती वापरण्यास भाजपा आता कचरत नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जळगावपाठोपाठ धुळ्यातही ‘आयारामां’ची फौज पक्षात सामील झाली तर आश्चर्य वाटायला नको.धुळ्यातील भाजपामध्ये ‘परका-निष्ठावंत’ असा वाद सुरू आहे. निष्ठावंत कार्यकर्ते दोन्ही गटात विभागले गेले आहेत. एकमेकांना ‘परका’म्हणण्याची स्पर्धा लागली आहे. विशेष म्हणजे तिन्ही नेते मूळ भाजपाचे नाहीच. गोटे यापूर्वी दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. डॉ.भामरे हे शिवसेनेतून भाजपामध्ये आले. तर रावल यांनी पहिली निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली होती. भामरे आणि रावल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची आहे. गोटे हे शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी या मार्गे आले आहेत.गोटे विरोधकांचे ऐक्यजळगावात ज्याप्रमाणे खडसे नको, महाजन चालतील, अशी सर्वपक्षीयांची भूमिका होती, त्याप्रमाणे धुळ्यातील स्थिती आहे. अनिल गोटे नकोत, या समान भूमिकेवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झालेले दिसते. खडसे यांनी जिल्हा बँक, दूध संघाच्या माध्यमातून सर्वपक्षीयांना जवळ केले असले तरी गोटे यांनी सगळ्यांना अंगावर घेतले आहे. हा मोठा फरक आहे. त्यामुळे उघडपणे नसले तरी गोटेविरोधकांचे अंतर्गत ऐक्य राहू शकते.

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण