शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
4
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
5
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
6
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
7
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
9
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
10
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
11
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
12
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
13
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
14
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
15
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
16
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
17
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
18
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
19
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
20
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बर्फवृष्टी व वादळाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यातील भाविक केदारनाथाच्या दर्शनापासून भाविक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:27 IST

जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक मात्र सुरक्षित

ठळक मुद्देसहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथदौरा थांबविला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या जिल्ह्यातील भाविक व पर्यटकांचा दौरा विस्कळीत झाला असून वादळामुळे भाविकांचे केदारनाथाचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली.दरवर्षी मे ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविक चारधाम यात्रेसह काश्मीरात पर्यटनास व दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही हा हंगाम जोरात सुरू असून जिल्ह्यातून भाविक चारधाम यात्रेला गेलेले आहे. मात्र उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता सर्व भाविक, पर्यटक सुरक्षित आहेत. मात्र यात्रा काहीसी विस्कळीत झाली.सहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथचारधाम यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांपैकी काही भाविक केदारनाथला जात असताना केदारनाथ मंदिर केवळ सहा कि.मी. अंतरावर राहिले व रस्ता बंद झाला आणि प्रशासनाने भाविकांना परत पाठवित सुरक्षित ठिकाणी मुक्कामी ठेवले. थोड्याच अंतरावर मंदिर असताना दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.पहेलगाम जाण्यास रोखलेचारधामसह काश्मीरातही पर्यटक गेले असून काश्मीरात तामिळनाडूतील एका पर्यटकाच्या हत्येनंतर काहीसे वातावरण गंभीर होऊन सध्या तेथे परिणाम जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातीलही काही पर्यटक काश्मीरात पैलगामला जात असताना त्यांना तेथे रोखण्यात आले. मात्र श्रीनगर येथे सहज जाता येत असल्याचे काही जणांनी सांगितले.दौरा थांबविलाएका टूर कंपनीकडून ३२ भाविकांचा गट १५ मे रोजी चारधाम यात्रेसाठी जाणार होता. मात्र सध्याची स्थिती पाहता हा दौरा थांबविला असल्याची माहिती टूर कंपनीने दिली. या कंपनीकडून जूनमध्येही आरक्षण असून ते रद्द सध्यातरी होणार असल्याचे चित्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.अनेक जाण्यास तयारसध्या सुट्यांमुळे काश्मीर, उत्तराखंडकडे जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण असून वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे आता जे दौरे ठरले आहे, ते रद्द न करता अथवा न थांबविता ते होणारच असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटकच उत्सुक असून काश्मीरात जाण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार १४ मे रोजी एक गट जाणार आहे.जिल्ह्यातून उत्तराखंड व काश्मीरात भाविक व पर्यटक गेले असून ते सर्व सुरक्षित आहेत. रस्ता बंद झाल्याने काही भाविकांचे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही.- लक्ष्मण अमृतकर, ट्रॅव्हेल्स संचालक.उत्तराखंडातील वातावरणामुळे १५ रोजी जाणारा गट थांबला आहे. मात्र सध्या पर्यटकांना तेथे काही अडचण येत नाही.- मनीष जोशी, ट्रॅव्हेल्स संचालक.

टॅग्स :Jalgaonजळगाव