शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बर्फवृष्टी व वादळाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यातील भाविक केदारनाथाच्या दर्शनापासून भाविक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:27 IST

जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक मात्र सुरक्षित

ठळक मुद्देसहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथदौरा थांबविला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या जिल्ह्यातील भाविक व पर्यटकांचा दौरा विस्कळीत झाला असून वादळामुळे भाविकांचे केदारनाथाचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली.दरवर्षी मे ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविक चारधाम यात्रेसह काश्मीरात पर्यटनास व दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही हा हंगाम जोरात सुरू असून जिल्ह्यातून भाविक चारधाम यात्रेला गेलेले आहे. मात्र उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता सर्व भाविक, पर्यटक सुरक्षित आहेत. मात्र यात्रा काहीसी विस्कळीत झाली.सहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथचारधाम यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांपैकी काही भाविक केदारनाथला जात असताना केदारनाथ मंदिर केवळ सहा कि.मी. अंतरावर राहिले व रस्ता बंद झाला आणि प्रशासनाने भाविकांना परत पाठवित सुरक्षित ठिकाणी मुक्कामी ठेवले. थोड्याच अंतरावर मंदिर असताना दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.पहेलगाम जाण्यास रोखलेचारधामसह काश्मीरातही पर्यटक गेले असून काश्मीरात तामिळनाडूतील एका पर्यटकाच्या हत्येनंतर काहीसे वातावरण गंभीर होऊन सध्या तेथे परिणाम जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातीलही काही पर्यटक काश्मीरात पैलगामला जात असताना त्यांना तेथे रोखण्यात आले. मात्र श्रीनगर येथे सहज जाता येत असल्याचे काही जणांनी सांगितले.दौरा थांबविलाएका टूर कंपनीकडून ३२ भाविकांचा गट १५ मे रोजी चारधाम यात्रेसाठी जाणार होता. मात्र सध्याची स्थिती पाहता हा दौरा थांबविला असल्याची माहिती टूर कंपनीने दिली. या कंपनीकडून जूनमध्येही आरक्षण असून ते रद्द सध्यातरी होणार असल्याचे चित्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.अनेक जाण्यास तयारसध्या सुट्यांमुळे काश्मीर, उत्तराखंडकडे जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण असून वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे आता जे दौरे ठरले आहे, ते रद्द न करता अथवा न थांबविता ते होणारच असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटकच उत्सुक असून काश्मीरात जाण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार १४ मे रोजी एक गट जाणार आहे.जिल्ह्यातून उत्तराखंड व काश्मीरात भाविक व पर्यटक गेले असून ते सर्व सुरक्षित आहेत. रस्ता बंद झाल्याने काही भाविकांचे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही.- लक्ष्मण अमृतकर, ट्रॅव्हेल्स संचालक.उत्तराखंडातील वातावरणामुळे १५ रोजी जाणारा गट थांबला आहे. मात्र सध्या पर्यटकांना तेथे काही अडचण येत नाही.- मनीष जोशी, ट्रॅव्हेल्स संचालक.

टॅग्स :Jalgaonजळगाव