शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

बर्फवृष्टी व वादळाचा तडाखा, जळगाव जिल्ह्यातील भाविक केदारनाथाच्या दर्शनापासून भाविक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:27 IST

जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक मात्र सुरक्षित

ठळक मुद्देसहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथदौरा थांबविला

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे चारधाम यात्रेला गेलेल्या जिल्ह्यातील भाविक व पर्यटकांचा दौरा विस्कळीत झाला असून वादळामुळे भाविकांचे केदारनाथाचे दर्शन होऊ शकले नाही. मात्र जिल्ह्यातील सर्व भाविक व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर कंपन्यांनी दिली.दरवर्षी मे ते आॅगस्ट दरम्यान जिल्ह्यातील हजारो भाविक चारधाम यात्रेसह काश्मीरात पर्यटनास व दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार यंदाही हा हंगाम जोरात सुरू असून जिल्ह्यातून भाविक चारधाम यात्रेला गेलेले आहे. मात्र उत्तराखंडात झालेल्या बर्फवृष्टी व वादळामुळे रस्ते बंद झाल्याने जिल्ह्यात काहीसे चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता सर्व भाविक, पर्यटक सुरक्षित आहेत. मात्र यात्रा काहीसी विस्कळीत झाली.सहा कि.मी.वर राहिले होते केदारनाथचारधाम यात्रेसाठी गेलेल्या जिल्ह्यातील भाविकांपैकी काही भाविक केदारनाथला जात असताना केदारनाथ मंदिर केवळ सहा कि.मी. अंतरावर राहिले व रस्ता बंद झाला आणि प्रशासनाने भाविकांना परत पाठवित सुरक्षित ठिकाणी मुक्कामी ठेवले. थोड्याच अंतरावर मंदिर असताना दर्शन न झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला.पहेलगाम जाण्यास रोखलेचारधामसह काश्मीरातही पर्यटक गेले असून काश्मीरात तामिळनाडूतील एका पर्यटकाच्या हत्येनंतर काहीसे वातावरण गंभीर होऊन सध्या तेथे परिणाम जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातीलही काही पर्यटक काश्मीरात पैलगामला जात असताना त्यांना तेथे रोखण्यात आले. मात्र श्रीनगर येथे सहज जाता येत असल्याचे काही जणांनी सांगितले.दौरा थांबविलाएका टूर कंपनीकडून ३२ भाविकांचा गट १५ मे रोजी चारधाम यात्रेसाठी जाणार होता. मात्र सध्याची स्थिती पाहता हा दौरा थांबविला असल्याची माहिती टूर कंपनीने दिली. या कंपनीकडून जूनमध्येही आरक्षण असून ते रद्द सध्यातरी होणार असल्याचे चित्र असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.अनेक जाण्यास तयारसध्या सुट्यांमुळे काश्मीर, उत्तराखंडकडे जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण असून वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे आता जे दौरे ठरले आहे, ते रद्द न करता अथवा न थांबविता ते होणारच असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले. यामध्ये पर्यटकच उत्सुक असून काश्मीरात जाण्यास त्यांनी तयारी दर्शविली आहे. त्यानुसार १४ मे रोजी एक गट जाणार आहे.जिल्ह्यातून उत्तराखंड व काश्मीरात भाविक व पर्यटक गेले असून ते सर्व सुरक्षित आहेत. रस्ता बंद झाल्याने काही भाविकांचे केदारनाथचे दर्शन होऊ शकले नाही.- लक्ष्मण अमृतकर, ट्रॅव्हेल्स संचालक.उत्तराखंडातील वातावरणामुळे १५ रोजी जाणारा गट थांबला आहे. मात्र सध्या पर्यटकांना तेथे काही अडचण येत नाही.- मनीष जोशी, ट्रॅव्हेल्स संचालक.

टॅग्स :Jalgaonजळगाव