शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

शहर विकास आघाडीकडून विकासकामांना चार वर्षांपासून अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST

चाळीसगाव : नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक निधी म्हणजे तीनशे कोटी रुपयांचा मिळवूनही गेल्या ४ वर्षात विरोधकांच्या आडमुठेपणामुळे वेळोवेळी ...

चाळीसगाव : नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक निधी म्हणजे तीनशे कोटी रुपयांचा मिळवूनही गेल्या ४ वर्षात विरोधकांच्या आडमुठेपणामुळे वेळोवेळी शहराच्या विकासकामांना वेगवेगळ्या पद्धतीने आडकाठी आणून शहरवासीयांना वेठीस धरण्याचे काम शहर विकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. आता तर स्थायी समितीमधील शहर विकास आघाडीच्या बहुमताच्या बळावर ठेकेदारांवर दहशत व अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून निविदा ‘मॅनेज’ केल्या जात आहे. यामुळे शहरवासियांच्या कराच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप नगराध्यक्ष आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील व शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.त्यांनी सांगितले की, काही ठराविक वर्गाकडून सोशल मीडियावर नगरपालिकेमार्फत विकासकामे होत नसल्याच्या चर्चा केल्या जातात व जनतेच्या मनातदेखील सत्ताधारी म्हणून आमच्याकडून विकासकामे होण्याच्या अपेक्षा असतात. जनतेमधून लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर विधायक टीका झाली तर त्याचे स्वागतच आहे; मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्यांची कामे का थांबली, विरोधकांची भूमिका काय राहिली, शहराची सर्व विकासकामे ठरविणारी स्थायी समिती ही विरोधकांच्या गेली काही वर्ष ताब्यात आहे, यावर मात्र जाणीवपूर्वक चर्चा होत नाही. नगराध्यक्ष या जरी भारतीय जनता पक्षाच्या असल्या तरी बहुमत विरोधकांकडे असल्याने प्रत्येक विकासकामांना आडकाठी आणली जात होती. शहरात अंतर्गत पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजना जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत नवीन रस्त्यांची कामे करता येणार नाहीत, असे शासनाचे आदेश आहेत; मात्र विरोधकांनी जाणीवपूर्वक भुयारी गटार योजना दोन वर्ष सुरू होऊ दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

अनेक प्रलंबित विषय मार्गी

चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर चाळीस वर्षात झाले नाही, इतका निधी भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व तत्कालीन आमदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने शहराच्या विकासासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या कामांना भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व शिवसृष्टी, करगावरोड वरील रेल्वे भुयारी मार्ग आदी वर्षानुवर्षे प्रलंबित विषय आमच्या कार्यकाळात मार्गी लागले. अंतर्गत पाणीपुरवठा योजना (६८ कोटी), भुयारी गटार योजना (१४७.५० कोटी), जिमखाना, अभ्यासिका व चौक सुशोभीकरण (५ कोटी), रस्ते विकास निधी (३ कोटी), घनकचरा व्यवस्थापन (८ कोटी), ओपन स्पेस डेव्हलपमेंट (२ कोटी) आदी कामांना मंजुरी मिळाली असल्याचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय पाटील व नितीन पाटील यांनी सांगितले.

...तर भरचौकात सत्कार करू

सध्या राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेची सत्ता आहे. रस्ते व इतर विकास कामांसाठी शासनाकडून निधी आणला तर भाजपतर्फे भरचौकात सत्कार करू आणि त्यांचे कौतुक करू, असे आवाहन घृष्णेश्वर पाटील यांनी शेवटी केले