शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

विकास प्रकल्प : जिल्हा प्रशासनाची समिती नेमणार जमीन खरेदीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

By admin | Updated: August 25, 2015 22:12 IST

सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार आता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिला आहे.

सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार आता शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिला आहे. त्यामुळे आता शासन शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.पाटबंधारे व इतर प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास बराच कालावधी जातो. परिणामी प्रकल्प रेंगाळतो. पर्यायाने त्याचा लाभ लाभधारकांना मिळण्यास विलंब होतो. तसेच प्रकल्पाची किंमतदेखील वाढते. याशिवाय केंद्रशासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यान्वये मिळणारा मोबदला आणि राज्यशासनामार्फत देण्यात येणारा मोबदला यात मोठी तफावत असल्याने शेतकरी जमीन देण्यासाठी संभ्रमावस्थेत असतात. या बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाने सिंचन व इतर प्रकल्पांसाठी लागणारी खासगी जमीन थेट खरेदी करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी जमीन खरेदी करताना ती प्रकल्पासाठीच खरेदी करण्यात यावी. बुडीत क्षेत्र, मुख्य कालवे, वितरिका याकरिता जमिनी थेट खरेदीने घ्याव्यात. तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याकरिता भूसंपादन प्रक्रिया न राबविता आवश्यक जमीन सलग थेट खरेदीने घ्याव्यात, असेही या अध्यादेशात नमूद केले आहे.पूर्वी शासन प्रकल्पासाठी लागणारी शेतकऱ्यांची खासगी जमीन भूसंपादन प्रक्रिया अन्वये खरेदी करीत असे. त्यामुळे त्यास कायद्याचा अडसर होता. परंतु आता थेट जमीन खरेदी करणार असल्याने कायदा आड येणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचन प्रकल्पांच्या नावावर हडपण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.