शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
5
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
6
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
7
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
8
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
9
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
11
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
12
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
13
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
14
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
15
सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!
16
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
17
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
18
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
19
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
20
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आधी शहराचा विकास करा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे एका खेडेगाव प्रमाणेच भासत आहे. अशा परिस्थितीत म.न.पा हद्दीमध्ये इतर गावांचा समावेश करणे, म्हणजे त्या गावांना विकासापासून दूर ठेवणे असेच आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांनी आधी जळगाव शहराचा विकास करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार त्यांनी करावा. मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव हा रद्द करावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण पुकारू असा इशारा देत आव्हाणे ग्रामस्थांनी मनपा हद्दीत समावेश करण्याचा सत्ताधार्‍यांच्या ठरावाला विरोध केला आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने आव्हाणे, मोहाडी, सावखेडा, कुसुंबा व मण्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर केला. या ठरावाला शिवसेना व एमआयएम ने विरोध केला मात्र तरीही हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता या ठरावानंतर ज्या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्या गावांचा ग्रामस्थांकडून व ग्रामपंचायत प्रशासनाकडून देखील विरोध होताना दिसून येत आहे. आव्हाणे येथील ग्रामस्थांनी याबाबत राज्य शासनाकडे देखील जाण्याची तयारी दर्शवली आहे.

नगर विकास मंत्र्यांना देणार निवेदन

महापालिकेने केलेला ठरावानुसार हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान हा ठराव जर मनपा सत्ताधाऱ्यांनी रद्द केला नाही. तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार येइल. आव्हाणे गाव मनपा हद्दीत घेण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आव्हाणे गावचे रहिवासी तथा अंबरनाथ नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे. याबाबत सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी काही ग्रामस्थ देखील उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी आव्हाणे ग्रामस्थांकडून महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनादेखील निवेदन दिले जाणार आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील ग्रामस्थ भेट घेणार आहेत.

कोट

मनपाने केलेला ठरावाला आमचा विरोध असून, ठराव करण्यासाठी दिलेले कारण देखील चुकीचे आहे. ग्रामपंचायत आव्हाणे गावाचा विकास करण्यात पूर्ण सक्षम असून, मनपाने हद्दवाढ करताना आव्हाणे गावाचा विचार सोडून द्यावा.

- भारती पाटील, सरपंच आव्हाणे

आव्हाणे गावाचा विकास जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत आहे. अशा परिस्थितीत जळगाव शहराच्या हद्दीत आव्हाणे गावाचा समावेश करणे चुकीचे आहे. या ठरावाला आमचा विरोध असून मनपाने हा ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.

-ॲड.हर्षल चौधरी,पंचायत समिती, सदस्य

मनपाने केलेल्या ठरावाला ग्रामस्थ आमचा विरोध आहे. जळगाव शहराचा विकास झाला नसताना परिसरातील गावांच्या विकासाबाबत मनपातील सत्ताधार्‍यांनी दावाच करणे चुकीचा आहे. आव्हाणे गावाचा विकास हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

- मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्या

जळगाव शहरातील समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्या समस्या न सोडविता इतर गावांचा विचार करणे म्हणजे हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणार.

- विजय दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य.