शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

आधी शहराचा विकास करा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जळगाव शहराची जी दुर्दशा झाली आहे. ती पाहता जळगाव शहर हे एका खेडेगाव प्रमाणेच भासत आहे. अशा परिस्थितीत म.न.पा हद्दीमध्ये इतर गावांचा समावेश करणे, म्हणजे त्या गावांना विकासापासून दूर ठेवणे असेच आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांनी आधी जळगाव शहराचा विकास करावा त्यानंतरच हद्दवाढीचा विचार त्यांनी करावा. मनपातील सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव हा रद्द करावा अन्यथा महापालिकेसमोर आमरण उपोषण पुकारू असा इशारा देत आव्हाणे ग्रामस्थांनी मनपा हद्दीत समावेश करण्याचा सत्ताधार्‍यांच्या ठरावाला विरोध केला आहे.

शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्ताधारी भाजपने आव्हाणे, मोहाडी, सावखेडा, कुसुंबा व मण्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजूर केला. या ठरावाला शिवसेना व एमआयएम ने विरोध केला मात्र तरीही हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. आता या ठरावानंतर ज्या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला आहे. त्या गावांचा ग्रामस्थांकडून व ग्रामपंचायत प्रशासनाकडून देखील विरोध होताना दिसून येत आहे. आव्हाणे येथील ग्रामस्थांनी याबाबत राज्य शासनाकडे देखील जाण्याची तयारी दर्शवली आहे.

नगर विकास मंत्र्यांना देणार निवेदन

महापालिकेने केलेला ठरावानुसार हा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान हा ठराव जर मनपा सत्ताधाऱ्यांनी रद्द केला नाही. तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील निवेदन देण्यात येणार येइल. आव्हाणे गाव मनपा हद्दीत घेण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती आव्हाणे गावचे रहिवासी तथा अंबरनाथ नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली आहे. याबाबत सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावेळी काही ग्रामस्थ देखील उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी आव्हाणे ग्रामस्थांकडून महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनादेखील निवेदन दिले जाणार आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील ग्रामस्थ भेट घेणार आहेत.

कोट

मनपाने केलेला ठरावाला आमचा विरोध असून, ठराव करण्यासाठी दिलेले कारण देखील चुकीचे आहे. ग्रामपंचायत आव्हाणे गावाचा विकास करण्यात पूर्ण सक्षम असून, मनपाने हद्दवाढ करताना आव्हाणे गावाचा विचार सोडून द्यावा.

- भारती पाटील, सरपंच आव्हाणे

आव्हाणे गावाचा विकास जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत आहे. अशा परिस्थितीत जळगाव शहराच्या हद्दीत आव्हाणे गावाचा समावेश करणे चुकीचे आहे. या ठरावाला आमचा विरोध असून मनपाने हा ठराव रद्द करावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.

-ॲड.हर्षल चौधरी,पंचायत समिती, सदस्य

मनपाने केलेल्या ठरावाला ग्रामस्थ आमचा विरोध आहे. जळगाव शहराचा विकास झाला नसताना परिसरातील गावांच्या विकासाबाबत मनपातील सत्ताधार्‍यांनी दावाच करणे चुकीचा आहे. आव्हाणे गावाचा विकास हा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

- मनीषा पाटील, ग्रामपंचायत सदस्या

जळगाव शहरातील समस्या मोठ्या प्रमाणात असताना त्या समस्या न सोडविता इतर गावांचा विचार करणे म्हणजे हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करण्यात यावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागणार.

- विजय दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य.