शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कन्नड घाटात वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या तीन किमी पर्यत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:53 IST

रविवारी मध्यरात्री पासून वाहतूक खोळंबली

ठळक मुद्देअवजड वाहनांसह प्रवाशी वाहनेही अडकून अवजड वाहने वाढल्याने वाहतूक थांबली

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव,  दि. 30 - राष्ट्रीय महामार्ग  क्र. 211वर (धुळे - सोलापूर) कन्नड घाटात सोमवारी पहाटेपासून वाहतूक खोळंबली असून वाहनांच्या तीन कि.मी. पर्यत रांगा लागल्या आहेत. त्यामुळे अवजड वाहनांसह प्रवाशी वाहनेही अडकून पडली आहे. गेल्या महिन्यात पावसामुळे चाळीसगाव शहरापासून 15 कि.मी. अंतरावर कन्नड घाटातील रस्ता दोन ठिकाणी खचला. रस्ता दुरुस्तीसाठी घाटातील वाहतूक थांबविण्यात आली होती. आठ दिवसांपूर्वी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. यामुळे घाटातील वाहनांची संख्या वाढल्याने ट्रॉफीक जाम होण्याचे प्रसंग वारंवार येत आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला होता. तिथे अजूनही एकेरी वाहतूक होते. यामुळे दोन वाहने समोरासमोर येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे अवजड वाहने वाढल्याने वाहतूक थांबली. यात बसेससह प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनांचाही समावेश आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांची रांग मोठी होत आहे. राजमार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांनीदेखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लक्ष देण्याची मागणी असून ट्रॉफीक जाममुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.