शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

निराधारांना मिळाले शासनाचे साहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थींना विशेष ...

डमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांची घोषणा करताना पाच विविध योजनांच्या लाभार्थींना विशेष साहाय्य योजनेंतर्गत या काळात प्रत्येकी एक हजाराची मदत देण्याची घोषणाही केली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ४० हजार ४७२ जणांना ही मदत मिळाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांची एकत्रित रक्कम लाभार्थींना देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका स्तरावर ही रक्कम पाठवली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील लाभार्थींना साहाय्याच्या रकमेचे धनादेश बँकेत पाठवण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत त्यांना ही रक्कम मिळेल.

राज्य सरकारने १५ मेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत नागरिक अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कामासाठी बाहेर निघू शकणार नाहीत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडत आहेत. अल्प उत्पन्न स्तरातील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यासाठी सरकारने विशेष साहाय्य योजनेत प्रत्येक लाभार्थीला एक हजार रुपये देण्याचा

निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण २ लाख ४० हजार ४७२ लाभार्थींना ही रक्कम मिळाली आहे.

वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचे सर्वाधिक लाभार्थी

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी हे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे आहेत. त्यात ८९ हजार ४१५ लाभार्थी आहेत, तर इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचे फक्त ५५८ लाभार्थी आहेत.

विशेष साहाय्य योजनेंतर्गत लाभार्थी संख्या

संजय गांधी निराधार अनुदान योजना ५८,२८४

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ७८,९०१

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना ८९,४१५

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना १३,३१४

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ५५८

एकूण २,४०,४७२

किती आला निधी

एप्रिल महिन्यासाठी २५ कोटी ७७ लाख २४ हजार ७०० रुपये, मे महिन्यासाठी २५ कोटी ७७ लाख २४ हजार ७०० रुपये निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यासोबतच मार्च महिन्याचा शिल्लक भाग ११.५० कोटींचा निधी देखील याच काळात जिल्हा प्रशासनाला मिळाला. त्यानंतर हा निधी तालुक्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. तालुका प्रशासनाला मिळालेला निधी तेथून थेट डीबीटीद्वारे लाभार्थींच्या खात्यात पाठवण्यात आला. जिल्ह्यातील सर्व लाभार्थींना हा निधी मिळाला आहे.

शासनाकडून पाठवण्यात आलेला ६३ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाने तालुक्यांच्या मागणीनुसार त्यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार हा निधी लाभार्थींना मिळत आहे.

- जितेंद्र कुंवर, तहसीलदार, संगांयो शाखा

जिल्हा प्रशासनाकडून एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्यांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याची बिले मंजूर झाली असून, ती बँकांमध्ये देखील पाठविण्यात आली आहेत. ही रक्कम सोमवारी जळगाव तालुक्यातील सर्व लाभार्थींना मिळेल.

- नामदेव पाटील, तहसीलदार, जळगाव

शासनाने जाहीर केलेली रक्कम अजून मिळालेली नाही. बँकांमध्ये चौकशी केली तर एक-दोन दिवसांत हे पैसे येतील, असे सांगण्यात येते. बँकेतही येऊ दिले जात नाही. पैसे मिळणार कसे?

- लक्ष्मी जोहरे

शासनाने ही रक्कम देताना लवकर द्यायला हवी. अजूनही हे पैसे मिळालेले नाहीत. बँकेत चौकशी देखील करता येत नाही. पैसे कधी मिळणार, याची वाट पाहत आहोत.

- लीलाबाई पाटील