शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

थेट जनतेशी संपर्क असतानााही लोकप्रतिनिधींनाच लागते संरक्षण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:43 IST

आचारसंहिता लागल्यापासून बहुतांश बंदोबस्त काढून घेण्यात आला

जळगाव/ धुळे/ नंदुरबार : जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्वसामांन्यांमध्ये वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींना या जनतेत जाण्यासाठी पोलीस बंदोबस्त लागत असल्याची परिस्थिती आहे. तुर्तास आचारसंहितेमुळे हा बंदोबस्त काही प्रमाणात काढून घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते.जळगाव जिल्ह्यातील स्थितीजिल्ह्यातील लोकांचे प्रतिनिधी म्हणून जनतेत वावरत असलेल्या आमदारांना अंगरक्षक तर कॅबिनेट, राज्य मंत्री तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ‘वाय प्लस’ दर्जाचा बंदोबस्त शासन आदेशानुसार आहे. सद्य स्थितीत मात्र आचारसंहिता असल्याने हा बंदोबस्त काहीसा काढून घेण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात विधानसभेचे १२ आमदार, दोन खासदार आहेत. तर विधानपरिषदेचे दोन आमदार आहेत. आमदारांना बंदोबस्त म्हणून शासन आदेशानुसार एक अंगरक्षक दिला जातो. कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांना एस्कॉर्टसह विशेष बंदोबस्त असतो. यात शस्त्रधारी पोलीस कर्मचारी व एका अधिकाऱ्याचा समावेश असतो. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने आमदारांचा बंदोबस्त आचारसंहिता आहे त्या कालावधीसाठी काढून घेण्यात आला आहे. कॅबिनेट किंवा राज्यमंत्री ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातील तेथे त्यांना एस्कॉर्टसह हद्दीपर्यंत बंदोबस्त असतो. शासन आदेशानुसार माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. एस्कॉर्ट वाहनासह हा बंदोबस्त आहे. तसेच माजी आमदार डॉ. गुुरूमुख जगवाणी यांची सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाल्याने या पदाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्याने त्यांनाही अंगरक्षक देण्यात आला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून बहुतांश बंदोबस्त काढून घेण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.धुळ्यात दोन मंत्री व दोन आमदारांना मिळते सुरक्षामंत्री असल्यास त्यांची सुरक्षा असलीतरी त्यांचा शासकीय प्रोटोकॉल काढला जातो़ त्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ़ सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल या दोन मंत्र्यांचा असलेला प्रोटोकॉल काढून घेण्यात आला आहे़ त्यांना एक पोलीस कर्मचारी याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यात आलेली आहे़ याशिवाय धुळे शहराचे आमदार अनिल गोटे आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्याकडे केवळ पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत़नंदुरबार जिल्ह्यात संरक्षण घेतले काढूननंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता सुरू होताच सर्वच लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार आमदार व एक खासदार यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांनी मागणी केली नसल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण पुरविले गेले नाही. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच या सर्व लोकप्रतिनिधींचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर दुसºया कुठल्याही राजकीय पदाधिकाºयाला पोलीस संरक्षण देण्यात आलेले नव्हते.

टॅग्स :Politicsराजकारण