शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

प्रवाशांचा ‘मनस्ताप’ कधी दूर होणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:39 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे विश्लेषण  रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार गाड्या धावताहेत उशिराने

सचिन देवजळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना जळगाव, पाचोरा व चाळीसगाव स्थानकावर थांबा दिला आहे. यामुळे प्रवाशी संघटनांतर्फे रेल्वे प्रशासनाचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र,या गाड्या बहुतांश वेळा या गाड्या १ ते २ तासांनी विलंबाने धावत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.दररोज कामानिमित्त, व्यवासायिनिमत्त हजारो चाकरमानी चाळीसगाव व पाचोरा तालुक्यातुन जळगावला येत असतात. या स्थानकांवर लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्यांना थांबा नसल्यामुळे,  येतांना महाराष्ट्र एक्सप्रेस किंवा नाशिक-भुसावळ पॅसेंजरनेच यावे लागत होते. तसेच जातांनादेखील सायंकाळी याच गाड्यांनी घराकडे जावे लागायचे. त्यामुळे सचखंड एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस या गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा स्थानकावर थांबा मिळण्याची अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी सुुरु होती.अखेर गेल्या आठवड्यांत खासदार ए. टी. पाटील यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करुन, प्रवाशांना दिलासा दिला आहे. या गाड्यांना चाळीसगाव व पाचोºयाला थांबत असल्यामुळे प्रवाशाांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र, या गाड्या वेळेवर न धावता उशिरा धावत असल्याने, प्रवाशांना या गाड्यांचा कुठलाही फायदा झालेला नाही. त्यामुळे या गाड्यांना थांबा देऊन, उपयोग काय असा प्रश्न प्रवाशांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.  तसेच अधून-मधून अपची  महाराष्ट्र एक्सप्रेस भुसावळ- नाशिक पॅसेंजरही विलंबाने धावत असल्याने, प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. रेल्वे प्रशासनातर्फे उत्तर प्रदेशात थंडीमुळे तर कधी तांत्रीक कामामुळे गाड्या विलंबाने धावत असल्याचे उत्तर देण्यात येत आहे. मात्र, हा प्रकार हिवाळ््यापुरताच नसुन उन्हाळ््यातदेखील या गाड्या विलंबाने धावत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यान हजारो नोकरदार वर्ग अपडाऊन करत असुन, विलंबाने धावत असलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना घरी जाण्यासाठी २ ते ३ तासांचा कालावधी लागत आहे.  यामुळे महिला वर्गांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तर स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी मनमाड ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमानी अफडाऊन करत असून, बहुतांश वेळा गाडी विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. चाकर मान्यांमुळे रेल्वे प्रशासनालाही चांगले उत्पन्न मिळत असल्याने, रेल्वेने चाकर मान्यासांठी भुसावळ ते जळगाव दरम्यान स्वतंत्र गाडी सुरु करण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे.