शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांचा उद्या जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविता याव्यात म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत महानगरपालिकेच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेविका ॲड.शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अमित काळे, मनोज अहुजा, मनोज काळे आदी उपस्थित होते. उपमहापौरांनी यावेळी सांगितले की, उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमातुन नागरिकांनी मांडलेल्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अनेक नागरिकांची भेटी या दरम्यान होवू शकल्या नाहीत. अनेकजण मनपात आपल्या समस्या घेवून येतात. अनेकवेळा या समस्या व तक्रारींना फारसा प्रतीसाद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांचा उपस्थितीतच जनता दरबार घेवून, नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या जाणार आहेत. तसेच या समस्या तत्काळ सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. उपमहापौरांचा जनता दरबार हा महिनाभर चालणार असून, प्रत्येक गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या आवारातच हा दरबार भरविला जाणार आहे.

अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

उपमहापौरांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता मनपातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्व विकासकामांच्या स्थितीचा आढावा घेतला. अमृत, रस्ते, स्वच्छता यावर आढावा घेवून माहिती घेतली. तसेच गुरुवारी होणाऱ्या जनता दरबाराच्या वेळेस सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.