शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

उपमहापौरांचा उद्या जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, अनेकदा नागरिक पदाधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या पोहचवू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविता याव्यात म्हणून गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत महानगरपालिकेच्या आवारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेविका ॲड.शुचिता हाडा, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, अमित काळे, मनोज अहुजा, मनोज काळे आदी उपस्थित होते. उपमहापौरांनी यावेळी सांगितले की, उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमातुन नागरिकांनी मांडलेल्या समस्या तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अनेक नागरिकांची भेटी या दरम्यान होवू शकल्या नाहीत. अनेकजण मनपात आपल्या समस्या घेवून येतात. अनेकवेळा या समस्या व तक्रारींना फारसा प्रतीसाद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून मिळत नाही म्हणून अधिकाऱ्यांचा उपस्थितीतच जनता दरबार घेवून, नागरिकांच्या समस्या ऐकूण घेतल्या जाणार आहेत. तसेच या समस्या तत्काळ सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली. उपमहापौरांचा जनता दरबार हा महिनाभर चालणार असून, प्रत्येक गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या आवारातच हा दरबार भरविला जाणार आहे.

अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

उपमहापौरांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता मनपातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्व विकासकामांच्या स्थितीचा आढावा घेतला. अमृत, रस्ते, स्वच्छता यावर आढावा घेवून माहिती घेतली. तसेच गुरुवारी होणाऱ्या जनता दरबाराच्या वेळेस सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या आहेत.