शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी..

By admin | Updated: December 22, 2015 00:52 IST

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती.

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती. त्यामुळे हा दावा रद्द करावा. तसेच चुकीचा दावा केल्याने मनपाचे खूप नुकसान झाले असून अधिका:यांचा वेळ वाया गेला असल्याने नुकसान भरपाईची मागणी आयुक्तांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

90 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

महासभेतील वेळोवेळी मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात उपमहापौरांनी आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या दाव्यात आयुक्तांनी सुमारे 90 पानांचे हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

दावाच चुकीचा

आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, उपमहापौरांनी सुमारे 50 ठरावांची यादी दाव्यासोबत जोडली आहे. त्यातील 1-2 अपवाद वगळता बहुतांश ठरावांची अंमलबजावणी सुरू आहे. हे माहिती असतानाही हा दावा केला असल्याचा आरोप केला असून जर ठरावांची अंमलबजावणी होत नसेल, जनहिताचा विषय असेल तर महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम 448, 450 नुसार शासनाकडेही दाद मागू शकतात. मात्र तसे न करता थेट कोर्टात दावा दाखल केल्याने तो चुकीचा असून रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच एकाच संस्थेच्या दोन शाखांनी आपसात भांडू नये असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्यामुळे ही जनहित याचिका नाही. त्यामुळे हा दावा योग्य आहे की नाही हे आधी ठरवावे, अशी मागणी केली आहे.

आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 नुसार नियमाच्या चौकटीच्या बाहेर असलेले ठराव अंमलबजावणीची आवश्यकता नाही, असे नमूद करीत काही ठरावांची यादीच सोबत जोडली आहे. तसेच ओपनस्पेसबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही प्रशासनाने 393 जागा ताब्यात घेण्याबाबत दिलेला प्रस्ताव कारवाईत टाळाटाळ करण्यासाठी बदलण्यात आला असून समिती नेमण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच मनपाच्या बिकट आर्थिक परिस्थितीची माहिती देणारी आकडेवारी सादर करून बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने रोजचे काम करणेही अवघड बनले आहे. त्यामुळे कामात, ठरावांच्या अंमलबजावणीत अडथळा येत असल्याचे म्हटले आहे. वाघूर, घरकूल, विमानतळ, गोलाणी मार्केट संबंधातील बेकायदेशिर ठराव मंजूर झाले नसते तर घोळही झाले नसते. त्यामुळे आयुक्त म्हणून ठरावांची अंमलबजावणी करताना काळजी घ्यावी लागते, असा दावा केला आहे.

12 वर्षात 24 आयुक्त

आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात मनपातील अस्थिरतेबद्दल माहिती देताना 2003 ला मनपाची स्थापना झाली. तेव्हापासून आतार्पयत 24 आयुक्त बदलले असून ते स्वत: 25वे आयुक्त असल्याचे नमूद केले आहे.

22 रोजी कामकाज

याप्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवार, 21 रोजी कामकाज होणार होते. मात्र केस बोर्डावर आलीच नाही. याप्रकरणी आता मंगळवारी 22 रोजी कामकाज होणार आहे.