शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी..

By admin | Updated: December 22, 2015 00:52 IST

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती.

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती. त्यामुळे हा दावा रद्द करावा. तसेच चुकीचा दावा केल्याने मनपाचे खूप नुकसान झाले असून अधिका:यांचा वेळ वाया गेला असल्याने नुकसान भरपाईची मागणी आयुक्तांनी औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

90 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

महासभेतील वेळोवेळी मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीसंदर्भात उपमहापौरांनी आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या दाव्यात आयुक्तांनी सुमारे 90 पानांचे हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

दावाच चुकीचा

आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, उपमहापौरांनी सुमारे 50 ठरावांची यादी दाव्यासोबत जोडली आहे. त्यातील 1-2 अपवाद वगळता बहुतांश ठरावांची अंमलबजावणी सुरू आहे. हे माहिती असतानाही हा दावा केला असल्याचा आरोप केला असून जर ठरावांची अंमलबजावणी होत नसेल, जनहिताचा विषय असेल तर महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम 448, 450 नुसार शासनाकडेही दाद मागू शकतात. मात्र तसे न करता थेट कोर्टात दावा दाखल केल्याने तो चुकीचा असून रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच एकाच संस्थेच्या दोन शाखांनी आपसात भांडू नये असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. त्यामुळे ही जनहित याचिका नाही. त्यामुळे हा दावा योग्य आहे की नाही हे आधी ठरवावे, अशी मागणी केली आहे.

आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र मनपा अधिनियम 1949 नुसार नियमाच्या चौकटीच्या बाहेर असलेले ठराव अंमलबजावणीची आवश्यकता नाही, असे नमूद करीत काही ठरावांची यादीच सोबत जोडली आहे. तसेच ओपनस्पेसबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही प्रशासनाने 393 जागा ताब्यात घेण्याबाबत दिलेला प्रस्ताव कारवाईत टाळाटाळ करण्यासाठी बदलण्यात आला असून समिती नेमण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच मनपाच्या बिकट आर्थिक परिस्थितीची माहिती देणारी आकडेवारी सादर करून बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने रोजचे काम करणेही अवघड बनले आहे. त्यामुळे कामात, ठरावांच्या अंमलबजावणीत अडथळा येत असल्याचे म्हटले आहे. वाघूर, घरकूल, विमानतळ, गोलाणी मार्केट संबंधातील बेकायदेशिर ठराव मंजूर झाले नसते तर घोळही झाले नसते. त्यामुळे आयुक्त म्हणून ठरावांची अंमलबजावणी करताना काळजी घ्यावी लागते, असा दावा केला आहे.

12 वर्षात 24 आयुक्त

आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रात मनपातील अस्थिरतेबद्दल माहिती देताना 2003 ला मनपाची स्थापना झाली. तेव्हापासून आतार्पयत 24 आयुक्त बदलले असून ते स्वत: 25वे आयुक्त असल्याचे नमूद केले आहे.

22 रोजी कामकाज

याप्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमवार, 21 रोजी कामकाज होणार होते. मात्र केस बोर्डावर आलीच नाही. याप्रकरणी आता मंगळवारी 22 रोजी कामकाज होणार आहे.