शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

पाच ग्रामसेवकांची अनामत रक्कम परत दिली जाईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चलन नसणे, हरविणे किंवा उपलब्ध नसणे याबाबींमुळे जिल्ह्यातील पाच ग्रामसेवक हे कंत्राटीवरून नियमित होऊनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चलन नसणे, हरविणे किंवा उपलब्ध नसणे याबाबींमुळे जिल्ह्यातील पाच ग्रामसेवक हे कंत्राटीवरून नियमित होऊनही त्यांची अनामत रक्कम परत मिळण्यास तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. दरम्यान ३३ ग्रामसेवकांची मात्र, ही रक्कम अदा करण्यात आली असून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा कारभार याबाबतीत सुस्थितीत असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे.

कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करीत असताना त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून दहा हजारांची अनामत रक्कम घेतली जाते. तीन वर्षानंतर ते सेवेत कायम झाल्यानंतर त्यांना नियमानुसार ही रक्कम परत द्यावी, लागते. याचा सर्व लेखाजोखा हा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे असतो. गेल्या पाच वर्षात ४९ कंत्राटी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी ३८ जण हे कायस्वरूपी सेवेत नियुक्त झाले आहेत. मात्र, सद्य:स्थितीतही ग्रामसेवकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे चित्र असून एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक गावे असल्याचे चित्र आहे.

३८ ग्रामसेवक नियमित सेवेत

गेल्या अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया होत नसल्याने जिल्हा परिषदेत पदे रिक्त राहत असल्याचे चित्र आहे. त्याच धर्तीवर ग्रामसेवकांचीही पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र, काही प्रमाणात कंत्राटी पद्धतीने नियुक्त ३८ग्रामसेवकांना कायस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यात आले आहेत.

एकूण ग्रामसेवक

१४५

कंत्राटी ग्रामसेवक

१६

चलनाच्या मुद्यामुळे चार ते पाच ग्रामसेवकांची ही अनामत रक्कम परत करणे बाकी आहे. ती तांत्रिक बाब आहे. आपण ३३ ग्रामसेवकांना नियमित करून त्यांच्या अनामत रकमा परत केल्या आहेत. - बाळासाहेब बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग

आपल्या जिल्ह्यात काहीच ग्रामसेवकांची अनामत रक्कम परत करणे बाकी आहे. हा एक शासकीय कामकाजाचा भाग आहे. मोठ्या अधिकांश ग्रामसेवकांना त्यांच्या अनामत रकमा या मिळालेल्या आहेत. - संजीव निकम, राज्य कार्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना