शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे धरणग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:48 IST

पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून केले आंदोलनपाडळसरे धरण तातडीने पूर्ण करागटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी ठेवली पाळतआंदोलकांना पोलिसांनी धरले रोखूूनआंदोलनामुळे प्रशासनाची उडाली धावपळ

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.पाडळसरे धरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही. जिल्ह्यातील असूनही जलसंपदा मंत्र्यांनी धरणाकडे आणि धरणासाठी प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे उपोषण, जेलभरो, जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.मुख्यमंत्र्यांना भेटून अमळनेरसह सहा तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन, निवेदन देणेचे प्रयत्न करू नये, आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा.शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे, महेश पाटील, देवीदास देसले, नामदेव पाटिल, सतीश काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रतापमिलमधील रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर प्रकट झाले.'पाडळसरे धरण झालेच पाहिजे!, ‘धरण आमच्या हक्काचे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या या निदर्शनानी सतर्क असलेले पोलिसानी आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली.पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले, असे यावेळी संघर्ष समितीचे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, तर ही निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही, असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्र्यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला, असे समितीचे रणजित शिंदे यांनी सांगितले.आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखून धरले. तत्काळ प्रतिबंधात्मक अटक करून पोलीस गाडीत टाकत सभास्थळ मार्गाहून घेऊन गेले, तर पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांच्यासह अजयसिंग पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, रामराव पवार, सुपडू बैसाणे, डी.एम.पाटील, आर.बी.पाटील, संजय पुनाजी पाटील आदींना निदर्शनात्मक हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा निघत असताना जागेवरच रोखून धरले होते.

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर