शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

अमळनेर येथे धरणग्रस्तांची मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 15:48 IST

पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून केले आंदोलनपाडळसरे धरण तातडीने पूर्ण करागटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी ठेवली पाळतआंदोलकांना पोलिसांनी धरले रोखूूनआंदोलनामुळे प्रशासनाची उडाली धावपळ

अमळनेर, जि.जळगाव : पाडळसरे धरण झालेच पाहिजे या मागणीसाठी पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांसमोर येत निदर्शने केली. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच त्यांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. गटागटाने निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी पाळत ठेवून रोखून धरले होते.पाडळसरे धरणाचे काम मागील २० वर्षांपासून रखडलेले आहे. सत्तेत येण्यापूर्वी धरणपूर्तीचे आश्वासन देणाऱ्या सरकारने साडेचार वर्षात धरणास निधी उपलब्ध करून दिला नाही. जिल्ह्यातील असूनही जलसंपदा मंत्र्यांनी धरणाकडे आणि धरणासाठी प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाकडे उपोषण, जेलभरो, जलसत्याग्रहाकडे दुर्लक्ष केल्याने जनतेच्या भावना संतप्त आहे.मुख्यमंत्र्यांना भेटून अमळनेरसह सहा तालुक्यातील जनतेच्या धरणाचे निवेदन जनआंदोलन समिती देणार होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक दिवस आधीच समितीला कोणतेही आंदोलन, निवेदन देणेचे प्रयत्न करू नये, आंदोलन टोपी घालू नये! असे सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपर्यत धरणाचे प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रा.शिवाजीराव पाटील, रणजित शिंदे, महेश पाटील, देवीदास देसले, नामदेव पाटिल, सतीश काटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रतापमिलमधील रस्त्यावर एक एक करून रस्त्याच्या बाजूला आले. मुख्यमंत्र्यांना धरणाचे फलक व काळे झेंडे दाखवत अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर प्रकट झाले.'पाडळसरे धरण झालेच पाहिजे!, ‘धरण आमच्या हक्काचे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. अचानक झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या या निदर्शनानी सतर्क असलेले पोलिसानी आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला रेटण्याचा जोरदार प्रयत्न केला. तर आंदोलकानी धरणाची मागणी यावेळी जोरदारपणे लावून धरली.पाडळसरे धरण तातडीने पूर्ण आमच्या परिसरासाठी अत्यावश्यक आहे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे या उद्देशानेच आम्ही आंदोलन केले, असे यावेळी संघर्ष समितीचे प्रा.शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, तर ही निवडणूक धरणाची व रस्त्यांची नाही, असे महायुतीच्या मागील मेळाव्यात जलसंपदा मंत्र्यांनी सांगितल्याने समितीचा भ्रमनिरास झाला, असे समितीचे रणजित शिंदे यांनी सांगितले.आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कडे करून रोखून धरले. तत्काळ प्रतिबंधात्मक अटक करून पोलीस गाडीत टाकत सभास्थळ मार्गाहून घेऊन गेले, तर पाडळसरे धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी यांच्यासह अजयसिंग पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, रामराव पवार, सुपडू बैसाणे, डी.एम.पाटील, आर.बी.पाटील, संजय पुनाजी पाटील आदींना निदर्शनात्मक हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा निघत असताना जागेवरच रोखून धरले होते.

टॅग्स :agitationआंदोलनAmalnerअमळनेर