शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

डिमार्ट पुढील पुलाचे काम ‘नही’ व मनपाच्या हेवेदाव्यात रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

रस्ता ‘नही’ च्या हद्दीत : दुभाजक केले तर मनपाला पुलाचे काम करण्यास हरकत काय ? लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

रस्ता ‘नही’ च्या हद्दीत : दुभाजक केले तर मनपाला पुलाचे काम करण्यास हरकत काय ?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील डिमार्ट पुढील शिरसोलीकडे जाणारा रस्ता आता ‘नही’ च्या हद्दीत असून, गेल्या दोन वर्षांपासून मुस्लीम कब्रस्तानसमोरील पूल तुटलेल्या अवस्थेत आहे. मात्र, या पुलाचे काम अजूनही झालेले नाही. ‘नही’ प्रशासन हे काम मनपाकडे ढकलत आहे. तर मनपा प्रशासन हे काम ‘नही’ कडे ढकलत आहे. या ढकलाढकलीमुळे हे काम झालेले नाही. यामुळे पावसाळ्यात हा रस्ता नेहमी पाण्यात असतो, तसेच कब्रस्थाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असतात.

शहरातील अनेक रस्त्यांचा हद्दीचा वादामुळे नागरिकांना फटका बसत आहे. केसी पार्ककडील कानळदा रस्ता हा मनपाच्या हद्दीत येतो, मात्र हा रस्ता तालुक्यातील २२ गावांना जोडतो. मनपा व जि.प.च्या वादात या रस्त्याचे काम होऊ शकलेले नाही. आता या रस्त्याचा वाद जुना असताना डिमार्टकडील रस्त्याचाही वाद निर्माण झाला आहे. शिरसोलीकडून येणारा रस्ता आता इच्छादेवी चौकापर्यंत महामार्ग झाल्याने हा रस्ता नहीच्या ताब्यात गेला आहे. मात्र, हा रस्ता जरी नहीच्या ताब्यात असला तरी रस्त्यावरील पुलाचे काम नहीकडून करण्यात आलेले नाही. नहीने हा रस्ता आपल्या ताब्यात असल्याचे पत्रदेखील मनपाकडे पाठविले होते, असे असताना डिमार्टपुढील पुलाचे काम करण्याची जबाबदारी ‘नही’ ची असताना या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे या भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दुभाजकांचे काम केले, तर पुलाचे का नाही ?

मनपा प्रशासनाने वर्षभरापूर्वी इच्छादेवी चौक ते डिमार्टपर्यंतच्या रस्त्यालगत दुभाजकांचे काम पूर्ण केले. मात्र, हा रस्ता नहीच्या ताब्यात असतानाही मनपाने हे काम केले. तर पुलाचे काम करण्यास मनपा प्रशासनाला काय अडचणी आहेत, असा प्रश्न नगरसेवक प्रशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. जर हद्द नसतानाही दुभाजक करण्याची तत्परता मनपा प्रशासनाने दाखविली तर पुलाचे काम करण्याचीही तत्परता मनपा प्रशासनाने करावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

पावसाळ्यात साचते पाणी

या पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. मुस्लीम समाजबांधवांनी मनपा प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी केली होती. मनपाने हे काम नही चे असल्याचे सांगत पळ काढला. तर नहीने हे काम मनपाच्या अंगावर झटकून मागणीकडे दुर्लक्ष केले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. खोलगट भाग असल्याने या ठिकाणी पाणी साचते, तसेच पाणी कब्रस्तानात वाहते. त्यामुळे नागरिकांना जाण्यास अडचणी निर्माण होत असतात. हा पूल पूर्ण लवकर करण्याची मागणी होत आहे.