शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चैत्र नवरात्रोत्सवात केळीला मागणी मोठी, भाव मात्र नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:18 IST

चिनावल परिसर : बोर्डावरचे भाव ठरताय शोभेचे आकडे

चिनावल, ता.रावेर : संपूर्ण रावेर तालुक्यात केळी पट्ट्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर केळी माल बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार आहे. सद्य:स्थितीत गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे. विशेष करून उत्तर भारतात या नवरात्रोत्सवात केळीला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे परंतु केळीचे आगार समजल्या जाणाऱ्या संपूर्ण भारतातील जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मात्र मागणीनुसार भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहेदररोज उत्तर भारतासह स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणावर दररोज केळी माल घेऊन रवानगी करताना दिसत आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती काढत असलेल्या केळी भावाला व्यापारी केराची टोपली दाखवत आहे. बोर्डापेक्षा कमी भावाने चांगल्या प्रतीचा माल मागणी करीत असल्याने केळी उत्पादक त्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च करून चांगल्या प्रतीचा माल तयार होण्यासाठी कर्जाऊ पैसे वसूल करून केळी कापणीपर्यंत शेतकरी राबराब राबतो. मात्र केळी कापणीची वेळ आल्यावर व्यापारी मालात दोष काढून हा माल याच भावात द्याल तर घेऊ, असा पवित्रा अवलंबत असल्याने व केळी पिक नाशवंत असल्याने उत्पादकांकडे काही इलाज नसतो. याचा गैरफायदा व्यापारी घेत असून व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणाºया कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र व्यापाऱ्यांविरोधात एक शब्दही काढायला तयार नाही. आधीच केळी पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ज्या केळीच्या भरवशावर शेतकºयांनी आपल्या भविष्यातील विविध नियोजन केले होते तेही कोलमडल्याने उत्पादक त्रस्त झाले आहे.देशाच्या सर्व ठिकाणी बºयापैकी भावही आहे, मग शेतकºयांना द्यायला का भाव नाही, हा मोठा गंभीर प्रश्न उत्पादकांसमोर आहे. अजून बºयाच मोठ्या प्रमाणावर केळी बागा कापणीवर यायच्या आहेत. त्याच्या आधी असे प्रकार अनुभवास येत असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. सद्य:स्थितीत केळीला फरक धरून हजारापेक्षा जास्त भाव आह.े मात्र व्यापारी केळी कापण्यासाठी मळ्यात पोहोचल्यावर हा माल चांगल्या प्रतिचा नाही, अशी विविध कारणे सांगून तेथून परत जातो. यामुळे शेतकºयांनाही नाईलाजाने माल द्यावा लागतो. अजून केळी कापण्याला सुरुवात झाली आहे. चांगल्या प्रतीचा माल सर्वात कमी भागांमध्ये आहे तरीसुद्धा केळी पट्ट्यात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी त्रासले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन विभागाने फक्त ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनीच खरेदी करावे, अशा सक्त सूचना द्याव्यात. तसेच बिगर परवानाधारक व्यापाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.