शहरं
Join us  
Trending Stories
1
Smriti Mandhana Wedding Postponed : स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली! लग्न पुढे ढकलले
2
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
3
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
4
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
5
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
6
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
7
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
8
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
9
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
10
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
11
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
12
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
13
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
14
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
15
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
16
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
17
IND vs SA : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! मोर्कोसह पहिल्या डावात द.आफ्रिकेनं साधला मोठा डाव
18
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
19
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
20
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
Daily Top 2Weekly Top 5

चैत्र नवरात्रोत्सवात केळीला मागणी मोठी, भाव मात्र नगण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:18 IST

चिनावल परिसर : बोर्डावरचे भाव ठरताय शोभेचे आकडे

चिनावल, ता.रावेर : संपूर्ण रावेर तालुक्यात केळी पट्ट्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर केळी माल बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार आहे. सद्य:स्थितीत गुढीपाडवा व चैत्र नवरात्र उत्सवाची धूम आहे. विशेष करून उत्तर भारतात या नवरात्रोत्सवात केळीला मोठ्या प्रमाणात मागणीही आहे परंतु केळीचे आगार समजल्या जाणाऱ्या संपूर्ण भारतातील जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मात्र मागणीनुसार भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहेदररोज उत्तर भारतासह स्थानिक व्यापारी मोठ्या प्रमाणावर दररोज केळी माल घेऊन रवानगी करताना दिसत आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती काढत असलेल्या केळी भावाला व्यापारी केराची टोपली दाखवत आहे. बोर्डापेक्षा कमी भावाने चांगल्या प्रतीचा माल मागणी करीत असल्याने केळी उत्पादक त्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर खर्च करून चांगल्या प्रतीचा माल तयार होण्यासाठी कर्जाऊ पैसे वसूल करून केळी कापणीपर्यंत शेतकरी राबराब राबतो. मात्र केळी कापणीची वेळ आल्यावर व्यापारी मालात दोष काढून हा माल याच भावात द्याल तर घेऊ, असा पवित्रा अवलंबत असल्याने व केळी पिक नाशवंत असल्याने उत्पादकांकडे काही इलाज नसतो. याचा गैरफायदा व्यापारी घेत असून व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणाºया कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र व्यापाऱ्यांविरोधात एक शब्दही काढायला तयार नाही. आधीच केळी पट्ट्यात भूगर्भातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ज्या केळीच्या भरवशावर शेतकºयांनी आपल्या भविष्यातील विविध नियोजन केले होते तेही कोलमडल्याने उत्पादक त्रस्त झाले आहे.देशाच्या सर्व ठिकाणी बºयापैकी भावही आहे, मग शेतकºयांना द्यायला का भाव नाही, हा मोठा गंभीर प्रश्न उत्पादकांसमोर आहे. अजून बºयाच मोठ्या प्रमाणावर केळी बागा कापणीवर यायच्या आहेत. त्याच्या आधी असे प्रकार अनुभवास येत असल्याने शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष आहे. सद्य:स्थितीत केळीला फरक धरून हजारापेक्षा जास्त भाव आह.े मात्र व्यापारी केळी कापण्यासाठी मळ्यात पोहोचल्यावर हा माल चांगल्या प्रतिचा नाही, अशी विविध कारणे सांगून तेथून परत जातो. यामुळे शेतकºयांनाही नाईलाजाने माल द्यावा लागतो. अजून केळी कापण्याला सुरुवात झाली आहे. चांगल्या प्रतीचा माल सर्वात कमी भागांमध्ये आहे तरीसुद्धा केळी पट्ट्यात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकरी त्रासले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन विभागाने फक्त ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनीच खरेदी करावे, अशा सक्त सूचना द्याव्यात. तसेच बिगर परवानाधारक व्यापाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी केळी उत्पादकांनी केली आहे.