शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

देव्हारीवासीयांची 15 वर्षापासून पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 10, 2017 10:58 IST

550 लोकवस्ती असलेल्या देव्हारी ग्रामस्थांची गेल्या 15 वर्षापासून पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

 ऑनलाई लोकमत/अजय पाटील  

जळगाव, दि.10- सात-आठ वर्षाचा होतो, तेव्हा उन्हाळा सुरु झाला की आई-वडिल मामाच्या किंवा नातेवाईकांच्या गावाला आमची रवानगी करून देत असत, कारण उन्हाळ्याचे चार महिने म्हटले की देव्हारीवासीयांसाठी पाण्याकरीता भटकंतीचा काळ. मुलांचे या काळात हाल होवू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात हीच स्थिती होती.  आज मी 23 वर्षाचा झालो तरी गावात हीच स्थिती कायम आहे. उन्हाळा आला की बायाबापडय़ांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. ना शासन लक्ष देते ना लोकप्रतिनिधी. आम्ही ग्रामस्थांनी आता काय करायचे? असा उद्वीगA सवाल देव्हारी गावातील  नितीन बि:हाळे  या युवकाने ‘लोकमत’प्रतिनिधीकडे उपस्थित केला. 

जळगाव शहरापासून 15 किलो मीटर अंतरावर व वाघूर धरणापासून फक्त दोन कि.मी. अंतरावर असलेल्या देव्हारीगावाची बिकट अवस्था आहे. धरणाच्या काठावर असतानाही पाणीपुरवठय़ाची योजना नसल्याने ग्रामस्थ वर्षानुवर्षे तहानलेलेच आहेत. मात्र गावाची मतदारसंख्या अगदी कमी असल्याने लोकप्रतिनिधींनी गावाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. 
फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाईच्या झळा
550  लोकवस्ती असलेल्या देव्हारी ग्रामस्थांची गेल्या 15 वर्षापासून पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. परिसरात पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने ग्रामस्थांची फेब्रुवारी महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरु होत असते. फेब्रुवारी ते जुलै महिन्यादरम्यान ग्रामस्थांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत असतात. दरवर्षी हीच स्थिती. लोकप्रतिनीधी, अधिका:यांकडे अनेकदा व्यथा मांडल्या, मात्र नाईलाज झाला. गावात टंचाई कायम आहे. 
दिवसाला दोन टॅँकर
देव्हारी व उमाळा दोन गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. पर्जन्यमान चांगले असले तर देव्हारी गावात साधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात टॅँकरने पाणीपुरवठा सुरु होत असतो. पर्जन्यमानात घट झाली तर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच गावात टॅँकरने पाणीपुरवठा होतो. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने फेब्रुवारी र्पयत परिसरातील विहिरी व कुपनलिकांमध्ये पाणी होते. मात्र मार्च महिन्याच्या दुस:या आठवडय़ापासून पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे 6 एप्रिलपासून गावात सकाळी दोन टॅँकर येतात व त्याव्दारे गावाला पाणीपुरवठा होत असल्याचे देव्हारी ग्रामस्थांनी सांगितले. 
शासकीय कार्यालयांचे उंबरठे ङिाजविल्यानंतर सुरु झाले टँकर
मार्च महिन्यात पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांनी  गावात टॅँकर सुरु करण्यात यावा यासाठी गटविकास अधिका:यांकडे प्रस्ताव पाठविला. मात्र प्रस्ताव पाठवून देखील टॅँकर सुरु होत नसल्याने ग्रामस्थांना उमाळा गावातून व देव्हारीच्या शिवारात 3 ते 4  कि.मी.पायपीट करून पाणी आणावे लागत होते. ग्रामस्थांनी पंचायत समिती, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे ङिाजविल्यानंतर 15 दिवसांनी गावात टॅँकर सुरु झाल्याची माहिती सखाराम पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.