शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सुनील झंवरचे अटकेचे संरक्षण काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा एकदा झटका दिला. त्याला अटकेपासून दिलेले संरक्षण न्यायालयाने काढून घेतले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात सुनील झंवरला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले होते. तसे त्याने न्यायालयाला अभिवचन दिले होते. त्याची मुदत गुरुवारी संपुष्टात आली. या कालावधीत झंवरने जिल्हा न्यायालयात जाऊन अटकपूर्व अर्ज दाखल करणे अपेक्षित होते; परंतु झंवरने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. उलट न्यायालयाचा अवमान केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. झंवरला यापुढे कुठलेही संरक्षण देऊ नका, असेही चव्हाण यांनी न्यायालयात सांगितले, त्यामुळे न्यायमूर्ती वराडे, न्या. तायडे यांनी दिलेले संरक्षण काढून घेत झंवरविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अवसायक जितेंद्र खंडारे व झंवरचा मुलगा सूरज यांच्या अर्जावर गुरुवारी कामकाज होणार होते; परंतु ते आता शुक्रवारी होणार आहे.