शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

सैन्यात भरती झालेल्या युवकांना धरणगावात मिरवणुुकीने निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:06 IST

लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देमातृभूमीच्या रक्षणार्थ युवकांना प्रोत्साहनजियो तो देश के लिये, और मरो तो देश के लिय

धरणगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे युवकांमध्ये देशभक्ती संचारली असून, ‘जियो तो देश के लिये, और मरो तो देश के लिये’ असा नारा ग्रामीण भागातील युवक देताना दिसत आहे. याचाच प्रत्यय येथे आला. लष्करात भरती झालेल्या युवकांना मिरवणुकीद्वारे निरोप देण्यात आला.नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या सैन्य भरतीत जी.डी.पदावर येथील एकुलता एक असलेला पारस रवींद्र महाजन (मोठा माळी वाडा, धरणगाव), विशाल संजय पाटील (भोणे), राकेश मराठेसह तालुक्यातील सात युवक भरती झाले. त्यांना प्रशिक्षणासाठी कर्नाटक (बेळगाव) येथे मराठा बटालीयनमध्ये हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या युवकांच्या मित्र परिवारासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मिरवणुकीने त्यांची विदाई केली.याप्रसंगी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे सामाजिक कार्यकते गुलाब मराठे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, सामाजिक कार्यकर्ते शरदकुमार बन्सी आदींनी सत्कार करुन लष्करात भरती झालेल्या या युवकांना शुभेच्छा दिल्या.देशसेवेसाठी एकुलत्या एक मुलाला लष्करात भरती करून पाठविल्याबद्दल पारसचे वडील तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र महाजन यांचाही सत्कार यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, गुलाब मराठे यांनी केला. यावेळी उपस्थित युवकांनी बसस्थानकावर ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.