शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत ""निवडणुकी’ला पराभूत करून ""बिनविरोध""चा पुन्हा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव तालुक्यातील मोहाडी गावाने यंदाही बिनविरोधचा नारा दिला आहे. ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी ११ अर्ज आले आणि सर्वच वैधही ठरल्याने आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीची १९५९ मध्ये स्थापना झाली. २०११च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही ४ हजार १०२ होती. जि.प.चे माजी अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी गावात ही बिनविरोधची परंपरा सुरू केली. तेव्हापासून सलग दहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गावात मतदानच झालेले नाही. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर आता ४ रोजी माघारीच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट नसताना मोहाडीत मात्र ५० वर्षांपासूनचे चित्र आधीच स्पष्ट झाले असून, यंदाचे हे बिनविरोधाचे ५५वे वर्ष आहे. दरम्यान, मोहाडीची जबाबदारी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन पाचवणे यांनीही मोहाडीत ११ जागांसाठी ११ अर्ज आले असून, सर्व वैध असल्याचे सांगत सर्वांची यंदाही बिनविरोधच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले.

अशी होते निवड

निवडणुका लागल्या की ग्रामस्थांची सामूहिक बैठक होते आणि त्यात पुन्हा बिनविरोधाचा नार दिला जातो. उमेदवार ठरविले जातात आणि निवडणूक टाळून सर्वानुमते जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरून अर्ज दाखल केले जातात. वर्षानुवर्षांची ही परपंरा यंदाही कायम ठेवण्यात ग्रामस्थ व नेत्यांना यश आले आहे. प्रत्येकाला संधी मिळेल असे नियोजन केले जाते. नाराजीनाट्याला थारा न देता सर्वानुमते निर्णय होत असतात.

कोट

स्व. भिलाभाऊंनी सुरू केलेली बिनविरोधची परंपरा यंदाही कायम आहे. गावात कुठलेच राजकारण, मतभेद नसतात. यामुळे विकासकामांमध्ये सुटसुटीपणा आणि पारदर्शकता अधिक असते. सर्व ग्रामस्थ मिळून निर्णय घेत असतात.

- पवन सोनवणे, जि. प. सदस्य

कोट

गावाची परंपरा, स्व. भिलाभाऊंचा शब्द या सर्व बाबीं कायम आहेत. गावात पक्षाचा कुठलाच विषय नसून ग्रामस्थांच्या बैठकीत बिनविरोधचा निर्णय घेतला जातो. यामुळे गावाच्या विकासात अडथळा येत नाही. मने खराब होत नाहीत.

- प्रभाकर सोनवणे, माजी सभापती, तथा जि. प. सदस्य