शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मोहाडीत ""निवडणुकी’ला पराभूत करून ""बिनविरोध""चा पुन्हा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाभरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोमात असताना गेल्या पन्नास वर्षांची आपली परंपरा राखत जळगाव तालुक्यातील मोहाडी गावाने यंदाही बिनविरोधचा नारा दिला आहे. ग्रामपंचायतच्या ११ जागांसाठी ११ अर्ज आले आणि सर्वच वैधही ठरल्याने आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

मोहाडी ग्रामपंचायतीची १९५९ मध्ये स्थापना झाली. २०११च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही ४ हजार १०२ होती. जि.प.चे माजी अध्यक्ष स्व. भिलाभाऊ सोनवणे यांनी गावात ही बिनविरोधची परंपरा सुरू केली. तेव्हापासून सलग दहा पंचवार्षिक निवडणुकांमध्ये गावात मतदानच झालेले नाही. छाननीत अर्ज वैध ठरल्यानंतर आता ४ रोजी माघारीच्या दिवशी सर्व ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. अनेक ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट नसताना मोहाडीत मात्र ५० वर्षांपासूनचे चित्र आधीच स्पष्ट झाले असून, यंदाचे हे बिनविरोधाचे ५५वे वर्ष आहे. दरम्यान, मोहाडीची जबाबदारी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी अर्जुन पाचवणे यांनीही मोहाडीत ११ जागांसाठी ११ अर्ज आले असून, सर्व वैध असल्याचे सांगत सर्वांची यंदाही बिनविरोधच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचे सांगितले.

अशी होते निवड

निवडणुका लागल्या की ग्रामस्थांची सामूहिक बैठक होते आणि त्यात पुन्हा बिनविरोधाचा नार दिला जातो. उमेदवार ठरविले जातात आणि निवडणूक टाळून सर्वानुमते जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरून अर्ज दाखल केले जातात. वर्षानुवर्षांची ही परपंरा यंदाही कायम ठेवण्यात ग्रामस्थ व नेत्यांना यश आले आहे. प्रत्येकाला संधी मिळेल असे नियोजन केले जाते. नाराजीनाट्याला थारा न देता सर्वानुमते निर्णय होत असतात.

कोट

स्व. भिलाभाऊंनी सुरू केलेली बिनविरोधची परंपरा यंदाही कायम आहे. गावात कुठलेच राजकारण, मतभेद नसतात. यामुळे विकासकामांमध्ये सुटसुटीपणा आणि पारदर्शकता अधिक असते. सर्व ग्रामस्थ मिळून निर्णय घेत असतात.

- पवन सोनवणे, जि. प. सदस्य

कोट

गावाची परंपरा, स्व. भिलाभाऊंचा शब्द या सर्व बाबीं कायम आहेत. गावात पक्षाचा कुठलाच विषय नसून ग्रामस्थांच्या बैठकीत बिनविरोधचा निर्णय घेतला जातो. यामुळे गावाच्या विकासात अडथळा येत नाही. मने खराब होत नाहीत.

- प्रभाकर सोनवणे, माजी सभापती, तथा जि. प. सदस्य