शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रुग्णांमध्ये गंभीर होण्याचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अन्य रक्तगटांपेक्षा ओ पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह या रक्तगटाच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अन्य रक्तगटांपेक्षा ओ पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह या रक्तगटाच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण हे त्या तुलनेने कमी असते, असा विदेशात अभ्यास झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली. मात्र, आपल्याकडे त्या दृष्टीेने विश्लेषण झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या काळात सध्या रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात फुफ्फुसामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णांचा मृत्यू होत असून, काहींच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊनदेखील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अनेक वेळा रक्ताच्या गाठी होऊन फुफ्फुसाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास अचानक मृत्यू ओढवू शकतो, असे डॉ. नाखले यांनी सांगितले.

गंभीर होण्याचे प्रमाण कमी का?

अन्य रक्तगटांपेक्षा ओ पॉझिटिव्ह व आरएच निगेटिव्ह या रक्तगटाच्या व्यक्तींच्या शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया ही कमी असते. त्यामानाने ती ए, बी, आणि एबी या रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये अधिक असते. यामुळे रक्त गोठून होणाऱ्या व्याधी, धोक्यांचे प्रमाण हे ओ पॉझिटिव्ह या रक्तगटांच्या व्यक्तीत त्या तुलनेत कमी असते. कोरोना काळात रुग्णाच्या शरीरात रासायनिक पदार्थांची निर्मित होऊन रक्त गोठण्याचे प्रमाण वाढते. मात्र, ओ पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरात ते कमी प्रमाणात असल्याने साहजिकच कोरोनाच्या संसर्गात त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण हे कमी असल्याचा हा अभ्यास इंग्लडंच्या एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झाल्याचे डॉ. नाखले यांनी सांगितले.

रक्तगट नोंदणी नाही

आपल्याकडे प्रत्येक रुग्णाला रक्त तपासणी करण्याची गरज नसते, ज्यांना संसर्ग अधिक आहे. त्यांच्याच रक्ततपासणीचे डॉक्टर सूचवितात. मात्र, संसर्गाचे प्रमाण समजण्यासाठी रक्ततपासणी आवश्यक असल्याचे मत काही डॉक्टर व्यक्त करीत असतात. सौम्य लक्षणे असलेल्यांना त्याची गरज नसल्याचे काही डॉक्टर सांगतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या रक्तगटाची नोंदणी नसते, शिवाय तशा दृष्टीकोनातून आपल्याकडे अभ्यास किंवा विश्लेषण झालेले नाही, असेही डॉ. नाखले यांनी सांगितले.