शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कापसाच्या क्षेत्रात घट

By admin | Updated: October 2, 2015 00:49 IST

देशात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कापूस लागवडीत सहा लाख हेक्टरने घट झाल्याची माहिती आहे.

देशात यंदाच्या कापूस हंगामात 351 लाख गाठींचे (170 किलो रुईची एक गाठ) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यात राज्याचा वाटा जवळपास 61 ते 62 लाख गाठींचा राहील. याच वेळी देशात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कापूस लागवडीत सहा लाख हेक्टरने घट झाल्याची माहिती आहे.

देशात कापसाच्या लागवडीत घट झालेली आहे. अशीच घट राज्यात झाली आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत जवळपास दोन लाख हेक्टरने घट झाली आहे.

मान्सूनचे आगमन राज्यात यंदा 12 जूननंतर झाले. लागवड तशी वेळेत झाली. पण नंतर कापसाची अधिक लागवड होणा:या सिमांध्र, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये मान्सून बेताचा होता. गुजरातेत सुरुवातीला अतिवृष्टी झाली. नंतर या राज्यातही पाऊसमान हवे तसे नव्हते. पण देशात सरासरीच्या 14 टक्के व राज्यात सरासरीच्या 40 टक्के पाऊस कमी झाला आहे.

 

पूर्वहंगामी म्हणजेच मे महिन्यात लागवड झालेल्या कापसाची वेचणी सुरू झाली असून, त्यात आर्द्रतेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असल्याचे कापूस सल्लागार मंडळाने म्हटले आहे. मंडळाची कापूस हंगाम 2015- 16 तील बैठक येत्या महिन्यात मुंबईत होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर जगभरातील कपाशीसंबंधीची स्थिती, ताळेबंद अधिक स्पष्टपणे समोर येईल, अशी माहिती मिळाली.

वेगवेगळे अंदाज येऊ लागले

कापूस सल्लागार मंडळाचे अंदाज स्पष्टपणे समोर आलेले नसले तरी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी कापसाच्या उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक राहील असे भाकीत केले आहे. देशात यंदा 119 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या हंगामात 125 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. या क्षेत्रातून देशात अखेर्पयत 383 लाख गाठींचे उत्पादन झाले होते.