देशात यंदाच्या कापूस हंगामात 351 लाख गाठींचे (170 किलो रुईची एक गाठ) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यात राज्याचा वाटा जवळपास 61 ते 62 लाख गाठींचा राहील. याच वेळी देशात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कापूस लागवडीत सहा लाख हेक्टरने घट झाल्याची माहिती आहे. देशात कापसाच्या लागवडीत घट झालेली आहे. अशीच घट राज्यात झाली आहे. राज्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत कापूस लागवडीत जवळपास दोन लाख हेक्टरने घट झाली आहे. मान्सूनचे आगमन राज्यात यंदा 12 जूननंतर झाले. लागवड तशी वेळेत झाली. पण नंतर कापसाची अधिक लागवड होणा:या सिमांध्र, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये मान्सून बेताचा होता. गुजरातेत सुरुवातीला अतिवृष्टी झाली. नंतर या राज्यातही पाऊसमान हवे तसे नव्हते. पण देशात सरासरीच्या 14 टक्के व राज्यात सरासरीच्या 40 टक्के पाऊस कमी झाला आहे. पूर्वहंगामी म्हणजेच मे महिन्यात लागवड झालेल्या कापसाची वेचणी सुरू झाली असून, त्यात आर्द्रतेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असल्याचे कापूस सल्लागार मंडळाने म्हटले आहे. मंडळाची कापूस हंगाम 2015- 16 तील बैठक येत्या महिन्यात मुंबईत होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर जगभरातील कपाशीसंबंधीची स्थिती, ताळेबंद अधिक स्पष्टपणे समोर येईल, अशी माहिती मिळाली. वेगवेगळे अंदाज येऊ लागले कापूस सल्लागार मंडळाचे अंदाज स्पष्टपणे समोर आलेले नसले तरी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया व इतर संस्थांनी कापसाच्या उत्पादनात राज्याचा वाटा सर्वाधिक राहील असे भाकीत केले आहे. देशात यंदा 119 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. गेल्या हंगामात 125 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. या क्षेत्रातून देशात अखेर्पयत 383 लाख गाठींचे उत्पादन झाले होते.
कापसाच्या क्षेत्रात घट
By admin | Updated: October 2, 2015 00:49 IST