शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गणित, भौतिकशास्त्राला वगळण्याचा निर्णय चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया : काही म्हणतात, निर्णय योग्य - डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑल इंडिया कौन्सिल फॉर ...

विद्यार्थ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया : काही म्हणतात, निर्णय योग्य

- डमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई)ने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र व गणित हे विषय वगळले आहेत. मात्र, अभियांत्रिकीचा पायाच असणारे विषय वगळले तर अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे कसे, असा सवाल जाणकार व्यक्त करीत आहेत, तर विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र (पीसीएम) विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकत होता. आता अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय एआयसीटीईने वगळले आहेत. गणित हा विषय अभियांत्रिकीचा पाया आहे. अभियांत्रिकीच्या जागा भरावयाच्या म्हणून घेतलेला हा निर्णय धोकादायक असून, एक ते दोन बॅचेस पूर्ण झाल्यानंतर हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे की नाही हे समजेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. शिक्षण क्षेत्रातील काही जाणकार नाराजी व्यक्त करीत असले तरी विद्यार्थ्यांमधून मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्ह्यात ९ महाविद्यालये

जळगाव जिल्ह्यात अभियांत्रिकीची ९ महाविद्यालये आहेत. दरवर्षी सुमारे चार ते पाच हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात असते. अजूनही विद्यार्थ्यांची अभियांत्रिकीला पसंती दिसू येते. बऱ्याच वेळा जिल्ह्यातील विद्यार्थी इतर जिल्ह्यात शिक्षणासाठी जातात. मात्र, जिल्ह्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या चांगली असल्यामुळे इतर जिल्ह्यांत शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्याही घटली आहे. दरम्यान, गणित व भौतिकशास्त्र वगळल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरसुद्धा परिमाण होऊ शकतो, असेही मत व्यक्त होत आहे.

अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय महत्त्वाचे आहेत. गणित विषयाशिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होऊच शकत नाही. म्हणून इंजिनिअरिंगचा दर्जा घसरवायचा नसेल व मुलांना खोट्या आकर्षणाच्या सापळ्यात अडकवायचं नसेल तर भौतिकशास्त्र व गणित वगळू नये. तो निर्णय चुकीचा वाटतो. हा निर्णय संस्थाचालकांच्या दबावाखाली तर झाला नाही ना, अशीही शंका उपस्थित होते.

- अनिल राव, शिक्षणतज्ज्ञ

अभियांत्रिकीची अजूनही क्रेझ आहे. एआयसीटीईने घेतलेला निर्णय योग्य वाटतो. कारण अभियांत्रिकी फक्त कोअर अभियांत्रिकी अभ्यासक्रमापर्यंत मर्यादित नाही. यात बऱ्याच वेगवेगळ्या शाखांचा समावेश आहे. ज्यासाठी तार्किक दृष्टिकोन पाहिजे. बरेच विद्यार्थी उत्कृष्ट आहेत. म्हणून त्यांना अभियांत्रिकीचा प्रतिकूलपणा मिळाला पाहिजे.

- कृष्णा श्रीवास्तव

गणित व भौतिकशास्त्र हे विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. गणित, भौतिकशास्त्र वगळण्याच्या निर्णयामुळे भविष्यात गणित विषयाला फटका बसू शकतो. भौतिकशास्त्र व गणितावर इतर विषय अवलंबून आहेत. दरम्यान, या निर्णयावर एआयसीटीईने यू-टर्न घेतल्याचे कळते.

- गणेश चौधरी, विद्यार्थी

अभियांत्रिकी महाविद्यालय - ०९

जागा - ५००० (सुमारे)