शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमुक्ती योजनेमुळे कर्जवाटपात बँकांची कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

शेतकऱ्यांमधून समाधान : गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पटीपेक्षा अधिक कर्ज वाटप जळगाव : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ...

शेतकऱ्यांमधून समाधान : गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड पटीपेक्षा अधिक कर्ज वाटप

जळगाव : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यामुळे शेतकरी कर्जमुक्त झाला व त्याला पुन्हा नवीन पीक कर्जाचा लाभ घेता आला. यामुळे बँकांकडूननही यंदा अधिक पीक कर्जाचे वाटप झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दीडपटीपेक्षा अधिक कर्जवाटप यंदा झाले असून बळीराजाही समाधानी आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कर्जाच्या खाईतून काढण्यासाठी सरकारतर्फे कर्जमुक्ती योजना राबविली गेली. मात्र गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या अटी व इतर कारणांमुळे बहुतांश शेतकरी कर्जमुक्त होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना नवीन कर्जही मिळणे अवघड झाले होते. मात्र मावळत्या आर्थिक वर्षात बळीराजाच्या खात्यात कर्जमुक्त योजनेची रक्कम जमा होऊन शेतकरी कर्जमुक्त झाला शेतकऱ्याचे खाते कर्जमुक्त झाल्याने त्याला नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यामुळे यंदा कर्ज वाटपाचेही प्रमाण वाढले. जिल्ह्यातील तीन वर्षातील उद्दिष्ट व कर्जवाटप यांची आकडेवारी पाहता यंदा हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात १ हजार ७०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी १ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले. यंदा कर्जमुक्तीचा लाभ मिळाला व कर्ज वाटपाचे प्रमाण वाढून थेट १ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहचले.

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत रखडले होते नवीन पीक कर्ज

सरकारने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यानंतर आपल्यालाही या योजनेचा लाभ होईल या प्रतीक्षेत अनेक शेतकरी होते. त्यामुळे गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या वाट पाहत कर्ज भरलेच नाही. त्यामुळे त्यांना नवीन कर्जाचा लाभ होऊ शकला नाही. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली व नवीन कर्जही त्यांना मिळाले मिळाले.

---------------------

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाल्याने त्यांचे खाते कर्जमुक्त होऊन त्यांना नवीन कर्जाचे वाटपही करण्यात आले. यंदा जिल्ह्यात तब्बल १ हजार ८०० कोटी रुपयांची पीक कर्ज वाटप झाले आहे.

- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

कर्जमाफी योजनेची घोषणा झाली मात्र तिचा लाभ गेल्यावर्षी मिळाला नाही. त्यामुळे कर्ज भरता येत नव्हते. मात्र यंदा कर्जमाफीचा लाभ झाला व नवीन कर्जही मिळू शकले.

- अशोक जाधव, शेतकरी

महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळून आमचे खाते कर्जमुक्त झाले. गेल्या अनेक वर्षांपासून खात्यावर कर्ज असल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण होते. मात्र यंदा नवीन कर्ज मिळाल्याने त्याचा मोठा आधार झाला.

- दिलीप चौधरी, शेतकरी

पीक कर्जाची आकडेवारी

२०१८-१९ - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार ७०० कोटी

२०१९-२० - उद्दिष्ट २ हजार ८०० कोटी, वाटप १ हजार १०० कोटी

२०२०-२१ - उद्दिष्ट ३ हजार २०० कोटी, वाटप १ हजार ८०० कोटी