शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अमळनेरात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:53 IST

१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा

अमळनेर : प्रशासनाच्या बदलत्या भूमिका, छुप्या मार्गाने नागरिकांचा तालुक्यात शिरकाव आणि जनतेचा बेफिकिरपणा यामुळेच कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला असून संपूर्ण अमळनेर शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १३ असून त्यातील शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही संशयित मृत्यू झालेल्यांचा आणि तपासणी झालेल्यांचा अहवाल बाकी आहे. २७ पासून मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहेसुरुवातीला संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना देखील सावध करण्यात आले नाही किंवा मीडियाला देखील पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जनता बिनधास्त वावरत होती. त्याच वेळी सीमा बंदी झाली खरी , नाके सील झाले मात्र छुप्या मार्गांचा प्रशासनाने विचारच केला नाही. त्याचे परिणाम असे झाले की हजारो लोक पुणे, मुंबई, सुरत , नाशिक व इतर ठिकाणाहून शहरात व तालुक्यात आले. नंतर प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून हळू हळू काहींना क्वारंन्टाईन केले. आधी घरातच थांबण्यास सांगितले गेले. त्यावेळीही जनतेने शिस्त पाळली नाही तर दुसरीकडे काही दिवसातच अशा लोकांना संस्थात्मक कोरोन्टाईन करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेसे नियम पाळले गेले नाहीत. तर शहरात देखील सायंकाळी कोरोंटाईन झालेले लोक एकत्र आले. किती लोकांना क्वारंटाईन केले याचीही माहिती जनतेपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे कुठून कोण जाणे कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला. मध्यंतरी नगरपालिकेने देखील एक नव्हे दोन तीन वेळेस भाजीपाला लिलावचे ठिकाणे बदलले. अम्लेशवर नगर भागात देखील एकदा लिलावचे ठिकाण झाले होते.प्रतिबंधक क्षेत्रातन.पा. कर्मचारी मदतीलाप्रतिबंधक क्षेत्रातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून नगरपरिषदेने बॅरीकेट्स लावलेल्या ठिकाणी १० कर्मचारी तैनात केले असून ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी तिथपर्यंत येऊन वस्तू मागवायच्या आहेत. त्यांना त्या पोहोचविण्यात येणार आहेत. सील केलेल्या भागातील बारी नामक दूध विक्रेत्याला घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहेनिवासी भागात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला बंदी नाहीशहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान बंद ठेवून भ्रमणध्वनी अथवा नगरसेवक ,स्वयंसेवक व दुकांदारांच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु निवासी भागात, गल्ली बोळात असणारी लहान किराणा दुकान सुरू राहतील आणि हातगाडीवर भाजीपाला विक्री करता येईल. त्यांना बंदी नाही अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी दिली. दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचा दर निश्चित करण्यास सांगितले आहे. आणि ज्या वस्तू कॉमन आहेत त्यांना घरपोच पोहचवा निवडीचे पर्याय असलेल्या वस्तूमुळे गोंधळ करू नये किंवा नागरिकांनी त्या वस्तूचे नाव द्यावे अथवा उपलब्ध वस्तू स्वीकाराव्यात.तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून माल मागवला असून पिशव्यांच्या माध्यमातून ५० ते २०० रुपये किमतीच्या काही भाजीपाला असलेल्या पिशव्या घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यात यश आले व संपर्क टळला आहे.१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासाअमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या १३ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित मयतांचे अहवाल बाकी असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने अमलनेरकराना दिलासा मिळाला आहे.