शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

अमळनेरात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:53 IST

१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा

अमळनेर : प्रशासनाच्या बदलत्या भूमिका, छुप्या मार्गाने नागरिकांचा तालुक्यात शिरकाव आणि जनतेचा बेफिकिरपणा यामुळेच कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला असून संपूर्ण अमळनेर शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १३ असून त्यातील शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही संशयित मृत्यू झालेल्यांचा आणि तपासणी झालेल्यांचा अहवाल बाकी आहे. २७ पासून मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहेसुरुवातीला संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना देखील सावध करण्यात आले नाही किंवा मीडियाला देखील पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जनता बिनधास्त वावरत होती. त्याच वेळी सीमा बंदी झाली खरी , नाके सील झाले मात्र छुप्या मार्गांचा प्रशासनाने विचारच केला नाही. त्याचे परिणाम असे झाले की हजारो लोक पुणे, मुंबई, सुरत , नाशिक व इतर ठिकाणाहून शहरात व तालुक्यात आले. नंतर प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून हळू हळू काहींना क्वारंन्टाईन केले. आधी घरातच थांबण्यास सांगितले गेले. त्यावेळीही जनतेने शिस्त पाळली नाही तर दुसरीकडे काही दिवसातच अशा लोकांना संस्थात्मक कोरोन्टाईन करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेसे नियम पाळले गेले नाहीत. तर शहरात देखील सायंकाळी कोरोंटाईन झालेले लोक एकत्र आले. किती लोकांना क्वारंटाईन केले याचीही माहिती जनतेपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे कुठून कोण जाणे कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला. मध्यंतरी नगरपालिकेने देखील एक नव्हे दोन तीन वेळेस भाजीपाला लिलावचे ठिकाणे बदलले. अम्लेशवर नगर भागात देखील एकदा लिलावचे ठिकाण झाले होते.प्रतिबंधक क्षेत्रातन.पा. कर्मचारी मदतीलाप्रतिबंधक क्षेत्रातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून नगरपरिषदेने बॅरीकेट्स लावलेल्या ठिकाणी १० कर्मचारी तैनात केले असून ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी तिथपर्यंत येऊन वस्तू मागवायच्या आहेत. त्यांना त्या पोहोचविण्यात येणार आहेत. सील केलेल्या भागातील बारी नामक दूध विक्रेत्याला घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहेनिवासी भागात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला बंदी नाहीशहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान बंद ठेवून भ्रमणध्वनी अथवा नगरसेवक ,स्वयंसेवक व दुकांदारांच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु निवासी भागात, गल्ली बोळात असणारी लहान किराणा दुकान सुरू राहतील आणि हातगाडीवर भाजीपाला विक्री करता येईल. त्यांना बंदी नाही अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी दिली. दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचा दर निश्चित करण्यास सांगितले आहे. आणि ज्या वस्तू कॉमन आहेत त्यांना घरपोच पोहचवा निवडीचे पर्याय असलेल्या वस्तूमुळे गोंधळ करू नये किंवा नागरिकांनी त्या वस्तूचे नाव द्यावे अथवा उपलब्ध वस्तू स्वीकाराव्यात.तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून माल मागवला असून पिशव्यांच्या माध्यमातून ५० ते २०० रुपये किमतीच्या काही भाजीपाला असलेल्या पिशव्या घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यात यश आले व संपर्क टळला आहे.१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासाअमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या १३ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित मयतांचे अहवाल बाकी असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने अमलनेरकराना दिलासा मिळाला आहे.