शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अमळनेरात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:53 IST

१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा

अमळनेर : प्रशासनाच्या बदलत्या भूमिका, छुप्या मार्गाने नागरिकांचा तालुक्यात शिरकाव आणि जनतेचा बेफिकिरपणा यामुळेच कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला असून संपूर्ण अमळनेर शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १३ असून त्यातील शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही संशयित मृत्यू झालेल्यांचा आणि तपासणी झालेल्यांचा अहवाल बाकी आहे. २७ पासून मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहेसुरुवातीला संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना देखील सावध करण्यात आले नाही किंवा मीडियाला देखील पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जनता बिनधास्त वावरत होती. त्याच वेळी सीमा बंदी झाली खरी , नाके सील झाले मात्र छुप्या मार्गांचा प्रशासनाने विचारच केला नाही. त्याचे परिणाम असे झाले की हजारो लोक पुणे, मुंबई, सुरत , नाशिक व इतर ठिकाणाहून शहरात व तालुक्यात आले. नंतर प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून हळू हळू काहींना क्वारंन्टाईन केले. आधी घरातच थांबण्यास सांगितले गेले. त्यावेळीही जनतेने शिस्त पाळली नाही तर दुसरीकडे काही दिवसातच अशा लोकांना संस्थात्मक कोरोन्टाईन करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेसे नियम पाळले गेले नाहीत. तर शहरात देखील सायंकाळी कोरोंटाईन झालेले लोक एकत्र आले. किती लोकांना क्वारंटाईन केले याचीही माहिती जनतेपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे कुठून कोण जाणे कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला. मध्यंतरी नगरपालिकेने देखील एक नव्हे दोन तीन वेळेस भाजीपाला लिलावचे ठिकाणे बदलले. अम्लेशवर नगर भागात देखील एकदा लिलावचे ठिकाण झाले होते.प्रतिबंधक क्षेत्रातन.पा. कर्मचारी मदतीलाप्रतिबंधक क्षेत्रातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून नगरपरिषदेने बॅरीकेट्स लावलेल्या ठिकाणी १० कर्मचारी तैनात केले असून ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी तिथपर्यंत येऊन वस्तू मागवायच्या आहेत. त्यांना त्या पोहोचविण्यात येणार आहेत. सील केलेल्या भागातील बारी नामक दूध विक्रेत्याला घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहेनिवासी भागात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला बंदी नाहीशहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान बंद ठेवून भ्रमणध्वनी अथवा नगरसेवक ,स्वयंसेवक व दुकांदारांच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु निवासी भागात, गल्ली बोळात असणारी लहान किराणा दुकान सुरू राहतील आणि हातगाडीवर भाजीपाला विक्री करता येईल. त्यांना बंदी नाही अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी दिली. दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचा दर निश्चित करण्यास सांगितले आहे. आणि ज्या वस्तू कॉमन आहेत त्यांना घरपोच पोहचवा निवडीचे पर्याय असलेल्या वस्तूमुळे गोंधळ करू नये किंवा नागरिकांनी त्या वस्तूचे नाव द्यावे अथवा उपलब्ध वस्तू स्वीकाराव्यात.तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून माल मागवला असून पिशव्यांच्या माध्यमातून ५० ते २०० रुपये किमतीच्या काही भाजीपाला असलेल्या पिशव्या घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यात यश आले व संपर्क टळला आहे.१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासाअमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या १३ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित मयतांचे अहवाल बाकी असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने अमलनेरकराना दिलासा मिळाला आहे.