शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात कोरोनाग्रस्त मृतांची संख्या चारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:53 IST

१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासा

अमळनेर : प्रशासनाच्या बदलत्या भूमिका, छुप्या मार्गाने नागरिकांचा तालुक्यात शिरकाव आणि जनतेचा बेफिकिरपणा यामुळेच कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला असून संपूर्ण अमळनेर शहर कोरोनाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १३ असून त्यातील शहरातील रुग्णांची संख्या १२ झाली आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे तर काही संशयित मृत्यू झालेल्यांचा आणि तपासणी झालेल्यांचा अहवाल बाकी आहे. २७ पासून मात्र गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहेसुरुवातीला संशयितांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी त्या भागातील नागरिकांना देखील सावध करण्यात आले नाही किंवा मीडियाला देखील पुरेशी माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे जनता बिनधास्त वावरत होती. त्याच वेळी सीमा बंदी झाली खरी , नाके सील झाले मात्र छुप्या मार्गांचा प्रशासनाने विचारच केला नाही. त्याचे परिणाम असे झाले की हजारो लोक पुणे, मुंबई, सुरत , नाशिक व इतर ठिकाणाहून शहरात व तालुक्यात आले. नंतर प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून हळू हळू काहींना क्वारंन्टाईन केले. आधी घरातच थांबण्यास सांगितले गेले. त्यावेळीही जनतेने शिस्त पाळली नाही तर दुसरीकडे काही दिवसातच अशा लोकांना संस्थात्मक कोरोन्टाईन करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यावेळी ग्रामीण भागात पुरेसे नियम पाळले गेले नाहीत. तर शहरात देखील सायंकाळी कोरोंटाईन झालेले लोक एकत्र आले. किती लोकांना क्वारंटाईन केले याचीही माहिती जनतेपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे कुठून कोण जाणे कोरोनाचा तालुक्यात शिरकाव झाला. मध्यंतरी नगरपालिकेने देखील एक नव्हे दोन तीन वेळेस भाजीपाला लिलावचे ठिकाणे बदलले. अम्लेशवर नगर भागात देखील एकदा लिलावचे ठिकाण झाले होते.प्रतिबंधक क्षेत्रातन.पा. कर्मचारी मदतीलाप्रतिबंधक क्षेत्रातील लोकांचे हाल होऊ नये म्हणून नगरपरिषदेने बॅरीकेट्स लावलेल्या ठिकाणी १० कर्मचारी तैनात केले असून ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या असतील त्यांनी तिथपर्यंत येऊन वस्तू मागवायच्या आहेत. त्यांना त्या पोहोचविण्यात येणार आहेत. सील केलेल्या भागातील बारी नामक दूध विक्रेत्याला घरोघरी दुधाच्या पिशव्या पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली आहेनिवासी भागात किराणा दुकान व भाजीपाला विक्रीला बंदी नाहीशहरातील मुख्य बाजारपेठेत किराणा दुकान बंद ठेवून भ्रमणध्वनी अथवा नगरसेवक ,स्वयंसेवक व दुकांदारांच्या माध्यमातून घरपोच सेवा देण्याचे आवाहन केले आहे. परंतु निवासी भागात, गल्ली बोळात असणारी लहान किराणा दुकान सुरू राहतील आणि हातगाडीवर भाजीपाला विक्री करता येईल. त्यांना बंदी नाही अशी माहिती तहसीलदार मिलिंद वाघ व मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी दिली. दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंचा दर निश्चित करण्यास सांगितले आहे. आणि ज्या वस्तू कॉमन आहेत त्यांना घरपोच पोहचवा निवडीचे पर्याय असलेल्या वस्तूमुळे गोंधळ करू नये किंवा नागरिकांनी त्या वस्तूचे नाव द्यावे अथवा उपलब्ध वस्तू स्वीकाराव्यात.तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी उत्पादक शेतकऱ्यांकडून माल मागवला असून पिशव्यांच्या माध्यमातून ५० ते २०० रुपये किमतीच्या काही भाजीपाला असलेल्या पिशव्या घरपोच देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दी टाळण्यात यश आले व संपर्क टळला आहे.१२ निगेटीव्ह : मिळाला दिलासाअमळनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या १३ झाली असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित मयतांचे अहवाल बाकी असले तरी कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने अमलनेरकराना दिलासा मिळाला आहे.