शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:16 IST

कोरोनाचा परिणाम : कमी मनुष्यबळामुळे कामाचा जादा ताण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या ...

कोरोनाचा परिणाम : कमी मनुष्यबळामुळे कामाचा जादा ताण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत, दिवसेंदिवस बाधितांचे प्रमाण वाढत आहे, तसे कोरोनाचा मृत्युदरही वाढत आहे. या कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी शववाहिकेवरील चालकांना पार पाडावी लागत आहे. कोरोनापासून बचावासाठी या चालकांनी योग्य ती खबरदारी घेतली असली, तरी त्यांना सध्या कोरोनाच्या भयावह वातावरणात जीव धोक्यात घालूनच जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात दररोज २० ते २२ कोरोनाबधितांचे मुत्यू होत आहेत. यामुळे स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. रुग्णालयात कधी तासाला एक-दोन, तर कधी एकाच वेळी चार ते पाच कोरोनाबधित मृतदेह बाहेर निघत असल्याने शववाहिकेवरील चालकांना मृतदेह नेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळपासून सुरू झालेली कोरोनाबाधित मृतदेहांची ने-आण रात्री उशिरापर्यंत होत असल्याचे या चालकांनी सांगितले. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण असून, साप्ताहिक सुट्ट्याही रद्द असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शववाहिकेत तांत्रिक बिघाड झाल्यास गॅरेज मालकांकडून कोरोनाच्या भीतीमुळे शववाहिका दुरुस्ती केली जात नाही. अनेकजण नकार दर्शवितात. त्यामुळे शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागत असल्याचेही चालकांनी सांगितले.

इन्फो :

एकूण रुग्णवाहिका- १३६

कोविडसाठीचा रुग्णवाहिका- १३६

चालक संख्या- १७१

नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- १३६

चालक संख्या- १३६

इन्फो :

शववाहिकेवरील चालक असल्याने सुरुवातीला थोडी भीती होती. मात्र, योग्य ती खबरदारी घेऊन गेल्या वर्षापासून काम सुरूच आहे. जीएमसीमध्ये एकच शववाहिका आणि मी एकच चालक असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यामुळे खूप धावपळ होते.

चंद्रकांत पाटील, चालक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने दररोज यावेच लागते. सद्य:स्थितीला शववाहिकेमध्ये बिघाड झाल्यास तिच्या दुरुस्तीसाठी गॅरेजवाले नकार देतात. त्यामुळे आमचे काम अडून पडते. यामुळे दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागते.

कवी कासार, चालक

इन्फो :

कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीत घेऊन जाण्याचे दररोजचे काम असल्यामुळे मनात थोडी भीती असतेच. कोरोनाचा आपल्याला व परिवाराला त्रास होणार नाही, याची खूप काळजी घेत असतो. सध्या तर कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. यामुळे कधी-कधी घरी जायला उशीर होतो.

छोटू पाटील, चालक