शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

शववाहिका चालकांचा मृत्यूसोबत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:16 IST

कोरोनाचा परिणाम : कमी मनुष्यबळामुळे कामाचा जादा ताण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या ...

कोरोनाचा परिणाम : कमी मनुष्यबळामुळे कामाचा जादा ताण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेत, दिवसेंदिवस बाधितांचे प्रमाण वाढत आहे, तसे कोरोनाचा मृत्युदरही वाढत आहे. या कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याची जबाबदारी शववाहिकेवरील चालकांना पार पाडावी लागत आहे. कोरोनापासून बचावासाठी या चालकांनी योग्य ती खबरदारी घेतली असली, तरी त्यांना सध्या कोरोनाच्या भयावह वातावरणात जीव धोक्यात घालूनच जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात दररोज २० ते २२ कोरोनाबधितांचे मुत्यू होत आहेत. यामुळे स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी जागा अपुरी पडत आहे. रुग्णालयात कधी तासाला एक-दोन, तर कधी एकाच वेळी चार ते पाच कोरोनाबधित मृतदेह बाहेर निघत असल्याने शववाहिकेवरील चालकांना मृतदेह नेताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळपासून सुरू झालेली कोरोनाबाधित मृतदेहांची ने-आण रात्री उशिरापर्यंत होत असल्याचे या चालकांनी सांगितले. तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण असून, साप्ताहिक सुट्ट्याही रद्द असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शववाहिकेत तांत्रिक बिघाड झाल्यास गॅरेज मालकांकडून कोरोनाच्या भीतीमुळे शववाहिका दुरुस्ती केली जात नाही. अनेकजण नकार दर्शवितात. त्यामुळे शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागत असल्याचेही चालकांनी सांगितले.

इन्फो :

एकूण रुग्णवाहिका- १३६

कोविडसाठीचा रुग्णवाहिका- १३६

चालक संख्या- १७१

नॉन कोविडसाठी रुग्णवाहिका- १३६

चालक संख्या- १३६

इन्फो :

शववाहिकेवरील चालक असल्याने सुरुवातीला थोडी भीती होती. मात्र, योग्य ती खबरदारी घेऊन गेल्या वर्षापासून काम सुरूच आहे. जीएमसीमध्ये एकच शववाहिका आणि मी एकच चालक असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यामुळे खूप धावपळ होते.

चंद्रकांत पाटील, चालक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने दररोज यावेच लागते. सद्य:स्थितीला शववाहिकेमध्ये बिघाड झाल्यास तिच्या दुरुस्तीसाठी गॅरेजवाले नकार देतात. त्यामुळे आमचे काम अडून पडते. यामुळे दुरुस्तीसाठी खूप फिरावे लागते.

कवी कासार, चालक

इन्फो :

कोरोनाबाधित मृतदेहांना स्मशानभूमीत घेऊन जाण्याचे दररोजचे काम असल्यामुळे मनात थोडी भीती असतेच. कोरोनाचा आपल्याला व परिवाराला त्रास होणार नाही, याची खूप काळजी घेत असतो. सध्या तर कोरोनाबाधित मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. यामुळे कधी-कधी घरी जायला उशीर होतो.

छोटू पाटील, चालक