शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुलाच्या मृत्यूनंतर महिनाभरात पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

जळगाव : मुलाने आत्महत्या करून जीवनाला कवटाळल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत पित्याचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहरापासून काही अंतरावर ...

जळगाव : मुलाने आत्महत्या करून जीवनाला कवटाळल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत पित्याचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहरापासून काही अंतरावर असलेल्या शामा फायर या फटाके निर्मितीच्या कारखान्यात घडली. पंडित सुकलाल बारी (सुन्ने) (६०, रा. शिरसोली प्र.न.) असे मृत झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित बारी हे शिरसोली रस्त्यावर असलेल्या श्यामा फायर कंपनीत २२ वर्षांपासून कामाला होते. सोमवारी सकाळी कंपनीत गुरांसाठी लागवड केलेल्या गवतात ते पाणी भरण्याचे काम करीत होते. कंपनीतील सहकारी शिवदास भगवान खलसे व पंडित बारी दोघे जण ११.४५ वाजता सोबत होते. त्यानंतर शिवदास निघून गेले. जेवण झाल्यानंतर पुन्हा दुपारी १ वाजता पंडित बारी यांना भेटायला आले असता ते गवतात मृतावस्थेत आढळून आलेले. त्यांनी हा प्रकार तातडीने मालक प्रकाश श्यामलाल मिलवानी यांना सांगितला. मिलवानी यांनी जवळ जाऊन पाहणी केल्यानंतर पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना फोन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्याचे सांगितले. रुग्णवाहिका न मिळाल्याने कंपनीच्या वाहनातूनच मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मालक आल्याशिवाय शवविच्छेदनास नकार

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंडित बारी यांचा मुलगा गणेश, लक्ष्मण, ग्रा.पं. सदस्य श्रावण ताडे, माजी सरपंच रामकृष्ण काटोले व नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार शिवदास चौधरी व स्वप्निल पाटील यांनी पंचनामा करून पूर्तता केली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने मालकाने त्याचा खुलासा करावा व कुटुंबीयाला मदत करावी, त्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

सलगच्या घटनांनी कुटुंबावर आघात

पंडित बारी यांचा मुलगा शिवाजी याने १२ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. या घटनेला एक महिनाही पूर्ण होत नाही, तोच पित्याचा मृत्यू झाला. सलगच्या या घटनांमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. पंडित बारी यांच्या पश्चात पत्नी सखुबाई, मुलगा गणेश, लक्ष्मण, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यू

लॉकडाऊनमुळे कंपनी बंद होती. त्यामुळे काम बंद होते. दिवाळीच्या काळात कंपनी सुरू झाली होती, तेव्हा पंडित बारी कामावर आले, मात्र पुन्हा रोजगाराचा फटका बसला. त्यामुळे ते दिवाळीपासून घरीच होते. सोमवारी कामावर येण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. कामाच्या पहिल्याच दिवशी मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.