शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सर्वच उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात शेती उद्योगावर मोठा परिणाम झाला ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सर्वच उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात शेती उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट देखील कोसळले आहे. कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने नाइलाजास्तव कमी भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करावा लागत आहे. नेहमी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे, अशा परिस्थितीत कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा मदतीला उतरताना दिसून येत नाही. शासनाने धान्याला घरी हमीभाव निश्चित केला असला तरी या हमीभावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण रब्बीचा हंगाम काढून दोन महिने होऊन देखील शासनाने अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. त्यात खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसाच नसल्याने आता शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात आपला माल विक्री केला आहे. मात्र, गेंड्याच्या कातडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यात आता केंद्र शासनाने देखील रासायनिक खतांच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ केल्यामुळे खरीप हंगामाची तयारी करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर टाकली आहे. केंद्र असो वा राज्य सरकार, दोन्ही सरकार शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेतकरी कर्जासाठी बँकांकडे रांगा लावत आहे, तर दुसरीकडे बियाण्याचे भाव वाढवून सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गडद करत आहे. कोरोनामुळे शेतीमध्ये काम करण्यास देखील आता मजूर तयार होत नाहीत. मजुरीचे दर देखील आता वाढले आहेत. मात्र, दुसरीकडे पिकांचे भाव मात्र अजूनही कमीच आहेत. तसेच राज्य शासनाने गेल्या दोन महिन्यांपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला देखील ग्राहकांपर्यंत पोहोचविता येत नसल्याने भाजीपाला शेतातच पडून खराब होत आहे किंवा शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. कोरोना जेव्हा कमी येईल तेव्हा येईल, मात्र त्याआधी शासनाचे शेतकऱ्यांबद्दलचे असलेले चुकीचे धोरण शेतकऱ्यांना कोरोनापेक्षाही मोठे संकट देणारे ठरत आहे. जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. जिल्ह्यातून होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेण्यास नकार देत आहेत. व्यापाऱ्यांची साखळी शेतकऱ्यांना मारक ठरत असून, मागणी नसल्याचे कारण देत बोर्ड भावापेक्षा ३००-४०० रुपये कमी दराने शेतकऱ्यांना आपली केळी विक्री करावी लागत आहे. जे शेतकरी चांगला भाव मिळेल ही आशा बाळगून आहेत, त्या शेतकऱ्यांच्या माल शेतातच खराब होत आहे. निर्यात कमी असल्याचे कारण देत व्यापारी मात्र आपला उद्देश पूर्ण करताना दिसून येत आहेत. मात्र, याबाबत जिल्ह्यातील एकही नेता उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना दिसून येत नाही.