शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

भाऊबिजेसाठी बहिणीकडे जाणाऱ्या भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 16:23 IST

कार-दुचाकीची धडक : चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील अपघात

मेहुणबारे, ता.चाळीसगाव : सासरी कितीही सोन्याचा धूर निघू लागला तरी बहिणीला माहेरची आस असते. अशीच आस उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील बहिणीला आजच्या भाऊबिजेनिमित्त घरी भाऊ येणार म्हणून लागली होती. मात्र, आपल्या बहिणीकडे जाणाºया भावाचा २९ रोजी दुपारी चारच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील आडगावजवळ अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.याबाबत माहिती अशी, सोनज टाकळी (ता. मालेगाव) येथील रहिवासी मनोज शेवाळे (वय ३०) हा तरुण आपल्या दुचाकीने (एमएच-४१-५७२०) उंबरखेड (ता.चाळीसगाव) येथील बहिणीकडे भाऊबिजेनिमित्त जाण्यासाठी निघाला. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरून जात असताना आडगाव ते हॉटेल चंद्रा दरम्यान मालेगावकडे जाणाºया कारने (एमएच-१९-बीयू-५२७८) त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती, की अपघातात मनोज शेवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी घटनास्थळी कमलेश राजपूत व मनोहर पाटील यांना पाठवले. मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात संदीप शेवाळे यांनी दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.बहिणीने फोडला टाहोउंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील वाल्मीक महाले यांचा मनोज शेवाळे हा लहान शालक होता. प्राप्त माहितीनुसार, मनोज २९ रोजी दुपारी देवघट (ता.मालेगाव) येथील मोठ्या बहिणीकडे औक्षण करून उंबरखेडे येथे जाण्यासाठी निघाला. दुपारी साडेचारच्या सुमारास मनोजवर काळाने झडप घालून बहिणीपासून त्याला हिरावून नेले. या अपघाताची माहिती उंबरखेडे येथील बहिणीला समजताच तिने अपघातस्थळी धाव घेतली. भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच बहिणीने एकच टाहो फोडला. अरे दादा, कुठे गेला.. काय झाले... हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते. मनोज हा आपल्या दोन्ही बहिणींचा लहान भाऊ होता. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. भाऊबिजेच्या दिवशी ही घटना घडल्याने सोनज टाकळी व उंबरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.