शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

अन्न व पाण्याअभावी काळवीटाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:42 IST

दुर्लक्ष : उपचाराच्या प्रतीक्षेत सोडले प्राण

धरणगाव : तालुक्यात पावसाच्या दडीमुळे वन्यजीवांना अन्न व पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहे. २९ रोजी तालुक्यातील नारणे-कामतवाडी शिवारात दुपारी एक पूर्ण वाढ झालेले काळवीट यामुळे अत्यवस्थ आढळून आले. मात्र हा प्रकार गावकऱ्यांनी कळवूनही वनक्षेत्र अधिकारी वेळेवर न पोहचल्याने या काळविटाचा मृत्यू झाला. याबाबत वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित अधिकाºयावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यां सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केली आहे.याबाबत वृत्त असेकी नारणे-कामतवाडी शिवारात शनिवारी दु १.२५ वा एक पूर्ण वाढ झालेले काळवीट अत्यवस्थ, व्याकूळ अवस्थेत आढळून आले होते. कदाचित त्यास भूक, तहान लागली असावी म्हणून नागरिकांनी त्यास चारा व पाणी दिले. मात्र ते खाऊ शकत नव्हते. याची दखल घेत येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी आरएफओ बी. एस. पाटील यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. पाटील यांनी येण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता एका वनरक्षकाला पाठवून काम धकवण्याचा प्रयत्न केला. या टाळाटाळीत व योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने काळविटाने दु. २.३० वा.प्राण सोडला. या अक्षम्य अपराधाबद्दल सरोज पाटील यांनी तिव्र नाराजी व्यक्त करुन वरीष्ठ अधिकाºयाशी संपर्क साधला. त्यानंतर संध्याकाळी वनविभागाचे वनरक्षकाने मृत काळवीट ताब्यात घेवून रात्रभर एरंडोल येथील कार्यालयात ठेवले.आरएफओ बी.एस.पाटील यांनी वनरक्षक उमेश भारुळे, वनपाल पी. डी. पाटील, एस.एम.पाटील, एन.एम.क्षिरसागर यांचे सह मृत काळवीट एम.एच.१९- एम ९४२३ या वाहनाने धरणगाव तालुका पशु चिकित्सक दवाखान्यात आणले. तेथे डॉ. पी. व्ही. सोनवणे यांनी पोस्टमार्टेम करुन काळवीट वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.साळवा पशूचिकित्सक बेपत्ता...साळवा केंद्रावर दिलेले पशू चिकित्सक प्रशांत पाटील आठ दिवसापासून गैरहजर असल्याचा आरोप सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी केला. ते दवाखान्यात उपस्थित असते तर काळविटाचे प्राण वाचू शकले असते. त्यांची चौकशी करुन निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.बैठकीत होतो व्यस्त- आरएफओसदर घटनेबद्दल खुलासा करतांना आरएफओ बी. एस. पाटील यांनी सांगितले की, आपण शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या तयारीत व्यस्त होतो असे ते म्हणाले. धुळ्याचे वरीष्ठ अधिकारी बैठकीला आलेले असल्याने आपण घटनास्थळी पोहचू शकलो नाही, असेही पाटील म्हणाले.