शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

उटखेडावासीयांची पहाट उगवते मंजुळ स्वरांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:05 IST

गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.

ठळक मुद्देहिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्वहा महिना श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पितया महिन्यात पूजा आणि उपवास केल्याने कष्ट होतात दूर

गणेश बी.पाटीलउटखेडा, ता.रावेर : कोजागरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरूवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे. गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.एकेकाळी गावातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठे होते. परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात. गावातील श्रीराम मंदिरात काकड आरतीमध्ये टाळ, मुदुंग यांच्या तालावर अभंग सादर होतात. आताही अनेक गावांमध्येही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक ह्यजय जय राम कृष्ण हरीह्णचा गजर करीत टाळ-मुदुंगाच्या तालावर घालतात.चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निंद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठीही काकड आरतीची परंपरा असल्याचे हभप श्यामजी महाराज यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. आरती दरम्यान तीन मंगलचरण, काकडा आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव आंधळा आदीसह विठ्ठलाची आरती होते.या एक महिन्याच्या उत्सवात श्रीराम मंदिराचे पुजारी हभप श्यामजी महाराज, मोहित महाराज, सुधाकर पाटील, रामदास पाचपोळे, सुभाष पाटील, प्रभाकर पाटील, रमेश महाजन, जिजाबराव पाचपोळ, प्रकाश बोरनारे, संतोष महाजन या सर्वांच्या उपस्थित अशा काकड आरतीची ३० नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होणार आहे.धार्मिक महत्व : हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजेच कापसाची तुपात भिजवलेली ज्योत ओवाळली जाते म्हणून याला काकडा किंवा काकड आरती असे म्हणतात.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर