शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

फेकरी उड्डाण वाहतुकीसाठी धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 17:19 IST

दोन वर्षांपासून दुरुस्ती होईना

दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या फेकरी रेल्वे उड्डाणपुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने अपघातात प्राणहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.फेकरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या फेकरी रेल्वे उड्डाणपुलावरील संरक्षण कठडाचे पाईप व काही भाग पडल्याने येथे जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेकांना प्राण गमावण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.या महामार्गावरून पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहने, बस मिनीडोअर वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात. संरक्षण कठडे नसल्याने खालीदेखील वाहने कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय याच कठड्याचा आधार घेऊन उभे केलेले लोखंडी पाइपदेखील तुटून पडलेले आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या तुटलेल्या घटनेबाबत दुरुस्तीबाबत गेल्या दोन वर्षांपासून या सुरक्षेबाबत कोणत्या प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. भविष्यात या पुलावर मोठ्या अपघाताची दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न सध्या वाहनधारकांना भेडसावत आहे. त्याचप्रमाणे दीपनगर सरगम गेटपर्यंत टोलची हद्द असून तेदेखील दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असून भीती तर आहेच पण या वाहनांकडून टोल वसूल केला जातो.फेकरी रेल्वे उड्डाणपुलाचे कठडे तोडून दोन वर्ष होऊनदेखील दुरुस्त होत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे व संताप व्यक्त केला जात आहे.फेकरी टोलचे मॅनेजर योगेश गुंजाळ यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. सार्वजनिक विभाग यातील वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी तरी लक्ष द्यावे, असा प्रश्न वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ