शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्ये दोन्ही डोस झालेल्यांना तिसऱ्या लाटेत धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या ॲन्टिबॉडिजचे आयुष्यमान हे शरीरात सहा महिन्यांपासून ते अधिकाधिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर शरीरात निर्माण होणाऱ्या ॲन्टिबॉडिजचे आयुष्यमान हे शरीरात सहा महिन्यांपासून ते अधिकाधिक एक वर्षापर्यंतच राहते, अशा स्थितीत आता फेब्रुवारी मार्चमध्ये लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना तिसऱ्या लाटेत धोका असू शकतो, असे मत व्यक्त करीत आताच्या स्थितीत बूस्टर डोस ही संकल्पना महत्त्वाची असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात मार्चपर्यंत १० हजारांपर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करचे लसीकरण झालेले होते.

जिल्ह्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याची स्थिती आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून, अन्य जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. त्यातच बुधवारी शहरात चार नवे बाधित आढळून आले होते. शहरात ९ सक्रिय रुग्ण झाले आहेत. त्यामुळे ही तिसऱ्या लाटेची चाहूल तर नाही, अशीही एक शक्यता वर्तविली जात आहे.

बूस्टर डोस गरजेचाच

ॲन्टिबॉडिजचे आयुष्य हे दुसऱ्या डोसनंतर सहा महिने व अधिकाधिक एक वर्ष राहते, त्यामुळे तिसरा अर्थात बूस्टर डोस आवश्यक असल्याचे मत शिवाय तसा अभ्यास सांगतो, असे मत औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.भाऊराव नाखले यांनी व्यक्त केले आहे. लसीकरणामुळे कोविडचे गांभिर्य कमी होते. जरी लागण झाली तरी तुम्ही त्यात गंभीर होत नाही. त्यामुळे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात; मात्र सद्यस्थितीत सर्वांचे दोनही डोस होणे महत्त्वाचे असल्याने अद्याप बूस्टर डोसबाबत निर्णय नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नियम पाळणे हेच मोठे औषध

कोविड प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी हेच सद्यस्थितीत मोठे औषध असून, त्यामुळेच आपण व इतरही सुरक्षित राहू शकतो, असा विचार सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषाणू स्वत:मध्ये बदल करेल, अनेक बाबी घडतील; मात्र यापेक्षा आपण नियम जर पाळले तर आपण सुरक्षित राहू, ही बाब नागरिकांनी कायम लक्षात ठेवावी, मास्क लावणे, अंतर पाळणे व हात स्वच्छ धुवून ते नाका- तोंडाला लावणे टाळणे या बाबी पाळाव्यात, असे आवाहन डॉ.नाखले यांनी केले आहे.