शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काँग्रेसला दणका

By admin | Updated: October 20, 2014 10:07 IST

रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला.

 

■ रावेर मतदारसंघात अल्पसंख्याक, मराठा व दलित मतांची मोट बांधून विजयी होण्याचे स्वप्न उराशी घेऊन आखाड्यात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांनी तब्बल ३१ हजार २७१ मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला फटका बसला. पहिल्या यादीत सहयोगी मावळते आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेसची उमेदवारी घोषित करणार्‍या काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अटीतटीच्या चौरंगी लढतीत चौधरी यांचा १0 हजाराने पराभव करून जनादेशाने जबर धक्का दिला आहे. भाजपाचे हरिभाऊ जावळे यांना मिळालेल्या १0हजारांच्या मताधिक्यात शिवसेना, मनसे, बसपा या पक्षांच्या १२ उमेदवारांची अनामतही जप्त होण्याचा प्रसंग ओढवला. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे उमेदवारजावळे यांच्याविरुद्ध यावल तालुक्यात मसाकासंबंधी प्रचंड नाराजी आहे. भोरगाव लेवा पंचायतचा कल शिरीष चौधरी यांच्या बाजूने आहे. भाजपनेते एकनाथराव खडसे यांची जावळेंबाबत नाराजी आहे.अशा चर्चांना मोठय़ा प्रमाणात ऊत आला होता. रा.काँ. उमेदवार अब्दुल गफ्फार मलिक यांना मतविभागणीसाठी जैन पितापुत्रांनी रिंगणात दाखल केले आहे. ते स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांना अल्पसंख्याक समाजाने जवळ करू नये. असा प्रचार करण्यात आला.मात्र मावळते आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाखाली अधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेठीस धरणार्‍या त्यांच्या नातेवाइकांमुळेच मतदारांनी जावळे यांना स्वीकारल्याचे मानले जात आहे. चौधरी यांच्या पराभवास त्यांचे जवळचेच लोक कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात अब्दुल गफ्फार मलिक यांच्या झोळीत केवळ अल्पसंख्याक मतांचाच जोगवा पडल्याचे स्पष्ट झाले. रा.काँ.चे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाला साद घालत मराठा समाज रा.काँ.कडे वळेल, अशी शक्यता मात्र मतदारांनी फेटाळली आहे. रा.काँ.च्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी रमेश पाटील यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पध्र्यांनी कायम जिल्हाध्यक्षपदाची पदोन्नती नको म्हणून ही शक्ती पणाला लावल्याचे स्पष्ट होते. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी बहुल गावांचा पट्टा वगळता शिरीष चौधरी यांना रावेर व यावल तालुक्यातील लेवा पाटीदार बहुल मोठ-मोठय़ा गावांनी साफ नाकारल्याची वास्तवता आहे. अल्पसंख्याक समाजानेही नाकारले. जावळे यांना लोकसभेत उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती असली तरी मोदी लाटेची ओसरती कडा त्यांना तारणारी ठरली आहे.सन १९९५ मध्ये मधुकरराव चौधरी यांच्या पराभवास कारणीभूत ठरलेल्या अँड.याकूब तडवीप्रमाणे पुनरावृत्ती होऊन रा.काँ.चे अब्दुल गफ्फार मलिक यांनी शिरीष चौधरी यांना पराभवाचे दर्शन घडवल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.