शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

किनगाव, चिंचोली परिसरात पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:18 IST

महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने ...

महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने कांदा उत्पादक व कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच महिनाभरापूर्वी दडी मारून बसलेल्या पावसाने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. परिसरात ५० टक्के कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याचे पेरलेले बियाणे (रोप) ही अतिपावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांना आता नवीन कांदा लावण्यासाठी नवीन बियाणे पेरणी करावी लागणार आहे. अतिपावसामुळे कापसाच्या कैऱ्याही सडल्या असून त्या कैऱ्या तोडून त्यातून ओला कापूस काढण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळेनासा झाला आहे. अजून दोन दिवसांनी पुन्हा पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल काढण्यासाठी धडपड सुरू आहे.

मका पिकांवर खील सुरुवातीपासून लष्करी अळ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेही पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कापूस पिकावर लाल रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या धुक्यामुळे जून महिन्यात लागवड झालेले कपाशी पिकांची फुलफुगडी गळून पडल्याने कापसाचे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

कांद्याचे निम्मे नुकसान

सध्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आता सुरू असलेली कांदा लागवड ही मोठ्या संकटात आहे. महिन्यापासून लागवड केलेल्या कांदा पिकाला तापमानच मिळत नसल्याने पावसामुळे जमिनीत कांदा परिपक्वच होत नसल्याने काही भागात नांगर फिरविण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. कांदा लागवडीसाठी लागलेला मजुरी खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. निसर्गाच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे पाठ सोडता सोडत नसल्याने आधीच रासायनिक खते, महागडी बियाणे, मशागतीची मजुरी यामुळे शेतकरी अधिक खचला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवत आहे.

परिसरात सोयाबीनचा पेराही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची मुदतही संपली असून सोयाबीनच्या झाडावर पाला शिल्लक नसल्याने फक्त सोयाबीन शेंगाच शिल्लक आहे. त्यामुळे अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची शक्यता आहे.