शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

किनगाव, चिंचोली परिसरात पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:18 IST

महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने ...

महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे. कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने कांदा उत्पादक व कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आधीच महिनाभरापूर्वी दडी मारून बसलेल्या पावसाने ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. परिसरात ५० टक्के कांदा पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ आल्याने आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याचे पेरलेले बियाणे (रोप) ही अतिपावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांना आता नवीन कांदा लावण्यासाठी नवीन बियाणे पेरणी करावी लागणार आहे. अतिपावसामुळे कापसाच्या कैऱ्याही सडल्या असून त्या कैऱ्या तोडून त्यातून ओला कापूस काढण्यासाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मजूर मिळेनासा झाला आहे. अजून दोन दिवसांनी पुन्हा पाऊस सांगितल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल काढण्यासाठी धडपड सुरू आहे.

मका पिकांवर खील सुरुवातीपासून लष्करी अळ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेही पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कापूस पिकावर लाल रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात पडलेल्या धुक्यामुळे जून महिन्यात लागवड झालेले कपाशी पिकांची फुलफुगडी गळून पडल्याने कापसाचे उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

कांद्याचे निम्मे नुकसान

सध्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे आता सुरू असलेली कांदा लागवड ही मोठ्या संकटात आहे. महिन्यापासून लागवड केलेल्या कांदा पिकाला तापमानच मिळत नसल्याने पावसामुळे जमिनीत कांदा परिपक्वच होत नसल्याने काही भागात नांगर फिरविण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली आहे. कांदा लागवडीसाठी लागलेला मजुरी खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. निसर्गाच्या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची संकटे पाठ सोडता सोडत नसल्याने आधीच रासायनिक खते, महागडी बियाणे, मशागतीची मजुरी यामुळे शेतकरी अधिक खचला आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्यामुळे शेतकरी डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवत आहे.

परिसरात सोयाबीनचा पेराही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची मुदतही संपली असून सोयाबीनच्या झाडावर पाला शिल्लक नसल्याने फक्त सोयाबीन शेंगाच शिल्लक आहे. त्यामुळे अजून दोन-चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास सोयाबीनही हातचे वाया जाणार असल्याची शक्यता आहे.