शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

धरण उशाशी अन् कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:23 IST

तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.

ठळक मुद्देतोंडापूर परिसरात केळी बागा सुकल्यायंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळतोंडापूर धरणात शून्य टक्के जलसाठा

तोंडापूर ता.जामनेर : तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.तोंडापूर गावाला लागुनच मोठे धरण आहे. पावसाळ्यात धरण भरल्यावर सर्वच शेतकºयांना त्याचा लाभ होत असे. यावर्षी धरणात मुबलक साठा वाढणार या आशेने तोंडापूर येथील १०० पेक्षा जास्त शेतकºयांनी शेतात प्रत्येकी पंधरा ते पंचवीस हजार केळी खोडांची लागवड केली. केळी बागांना पुरेशे खतपाणी घातल्यानंतर बाग काटणीवर येण्याआधीच पाण्याअभावी सुकत आहेत. काहींची बाग लहान असतानाच मोठ्या झाडांना वाचवायचे की लहान बागांना या चिंतेने लाखो रुपये खर्च करीत लहान बागांना वाºयावर सोडण्याची वेळ आली.काही शेतकºयांनी केळी बागांवर नांगर चालविला आहे.गावातील सुनील कालभिले यांची दहा हजार बाग, जगदीश पाटील यांची पंधरा हजार, डी.के.पाटील यांची पंचवीस हजार केळीबाग, जाकिर पटेल यांची सहा हजार, संतोष ढेपले यांची चार हजार बाग पाण्याअभावी सुकत असल्याची माहिती शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रत्येकाच्या शेतात विहीर, बोअरवेल पाण्याची सर्व साधने असताना यावर्षी पावसाने दांडी मारल्याने धरण भरलेले नाही. सद्य:स्थितीला धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने शेतातील विहिरी व बोरवेल कोरड्या पडल्या आहे. आॅक्टोबर महिन्यात ही स्थिती आहे तर पुढे काय होणार ही चिंता शेतकºयांना सतावत आहे.'माझी पंचवीस हजार केळीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमजली. यात मला चाळीस लाखांचा फटका बसणार आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.- डी.के.पाटील, प्रगतीशील शेतकरी, तोंडापूर