शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

धरण उशाशी अन् कोरड घशाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:23 IST

तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.

ठळक मुद्देतोंडापूर परिसरात केळी बागा सुकल्यायंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळतोंडापूर धरणात शून्य टक्के जलसाठा

तोंडापूर ता.जामनेर : तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.तोंडापूर गावाला लागुनच मोठे धरण आहे. पावसाळ्यात धरण भरल्यावर सर्वच शेतकºयांना त्याचा लाभ होत असे. यावर्षी धरणात मुबलक साठा वाढणार या आशेने तोंडापूर येथील १०० पेक्षा जास्त शेतकºयांनी शेतात प्रत्येकी पंधरा ते पंचवीस हजार केळी खोडांची लागवड केली. केळी बागांना पुरेशे खतपाणी घातल्यानंतर बाग काटणीवर येण्याआधीच पाण्याअभावी सुकत आहेत. काहींची बाग लहान असतानाच मोठ्या झाडांना वाचवायचे की लहान बागांना या चिंतेने लाखो रुपये खर्च करीत लहान बागांना वाºयावर सोडण्याची वेळ आली.काही शेतकºयांनी केळी बागांवर नांगर चालविला आहे.गावातील सुनील कालभिले यांची दहा हजार बाग, जगदीश पाटील यांची पंधरा हजार, डी.के.पाटील यांची पंचवीस हजार केळीबाग, जाकिर पटेल यांची सहा हजार, संतोष ढेपले यांची चार हजार बाग पाण्याअभावी सुकत असल्याची माहिती शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रत्येकाच्या शेतात विहीर, बोअरवेल पाण्याची सर्व साधने असताना यावर्षी पावसाने दांडी मारल्याने धरण भरलेले नाही. सद्य:स्थितीला धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने शेतातील विहिरी व बोरवेल कोरड्या पडल्या आहे. आॅक्टोबर महिन्यात ही स्थिती आहे तर पुढे काय होणार ही चिंता शेतकºयांना सतावत आहे.'माझी पंचवीस हजार केळीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमजली. यात मला चाळीस लाखांचा फटका बसणार आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.- डी.के.पाटील, प्रगतीशील शेतकरी, तोंडापूर