शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भिजपावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:55 IST

जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...

जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.चोपडा : तालुक्यात पंधरा दिवसांपासून असलेल्या अतिवृष्टीने मूग, उडीद आदी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. सततच्या भिजपावसाने मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे. त्यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचे वाटू लागले आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र भिजपाऊस सुरू आहे. त्यामुळे कापूस पिकाला फवारणी केली जात नसल्याने त्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारा कापूस पिक धोक्यात आहे. लष्करी आळीने मका पिकावर जोरदार प्रादुर्भाव झाल्याने ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाताना दिसत आहेत. तसेच सततच्या पावसाने पक्व झालेले मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मूग, उडिदाच्या शेंगांमधून कोंब बाहेर येत आहेत.

मजुरांच्या हाताला नाही काम, रोजीरोटीचा प्रश्नहाताशी आलेली पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरही हवालदिल झाले आहेत. शेतीची कामे खोळंबली असून मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मजुरांना हाताला काम नसल्याने ते रिकामे आहेत. एकंदरीत सततचा भिज पाऊस नुकसानीचा ठरत आहे. शेतकरी उघडीप होण्याची वाट पाहत आहेत.

कांद्याला सर्वाधिक फटकाअडावद, धानोरा, बिडगावसह परिसर हा कांदा उत्पादक परिसर आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने कांदा लागवडीच्या हेतुने शेतक-यांंनी महागडे बियाणे घेऊन रोप तयार करण्याठी साठी नर्सरी टाकल्या होत्या. मात्र बुरशीजन्य रोग पडून ६० ते ७० टक्के रोपे कुजून गेली. त्यामुळे कांदा लागवडीला ब्रेक लागला. थोडीफार लागवड झाली होती. मात्र तीही वाया जात आहे. तर नविन लागवडीसाठी रोपे मिळणे कठीण झाले आहे.