शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

भिजपावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 21:55 IST

जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...

जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सततच्या भिजपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन पाऊस पडूनदेखील पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.चोपडा : तालुक्यात पंधरा दिवसांपासून असलेल्या अतिवृष्टीने मूग, उडीद आदी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गात आहे. सततच्या भिजपावसाने मातीच्या धाब्याच्या घरांना गळती लागली आहे. त्यामुळे अशा घरात रहाणे ग्रामस्थांना धोक्याचे वाटू लागले आहे.गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र भिजपाऊस सुरू आहे. त्यामुळे कापूस पिकाला फवारणी केली जात नसल्याने त्यावर मावा, तुडतुडे व किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारा कापूस पिक धोक्यात आहे. लष्करी आळीने मका पिकावर जोरदार प्रादुर्भाव झाल्याने ही पिके शेतकऱ्यांच्या हातून जाताना दिसत आहेत. तसेच सततच्या पावसाने पक्व झालेले मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मूग, उडिदाच्या शेंगांमधून कोंब बाहेर येत आहेत.

मजुरांच्या हाताला नाही काम, रोजीरोटीचा प्रश्नहाताशी आलेली पिके जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूरही हवालदिल झाले आहेत. शेतीची कामे खोळंबली असून मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मजुरांना हाताला काम नसल्याने ते रिकामे आहेत. एकंदरीत सततचा भिज पाऊस नुकसानीचा ठरत आहे. शेतकरी उघडीप होण्याची वाट पाहत आहेत.

कांद्याला सर्वाधिक फटकाअडावद, धानोरा, बिडगावसह परिसर हा कांदा उत्पादक परिसर आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने कांदा लागवडीच्या हेतुने शेतक-यांंनी महागडे बियाणे घेऊन रोप तयार करण्याठी साठी नर्सरी टाकल्या होत्या. मात्र बुरशीजन्य रोग पडून ६० ते ७० टक्के रोपे कुजून गेली. त्यामुळे कांदा लागवडीला ब्रेक लागला. थोडीफार लागवड झाली होती. मात्र तीही वाया जात आहे. तर नविन लागवडीसाठी रोपे मिळणे कठीण झाले आहे.