शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे दीड हजारावर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील पाच तालुक्यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार ५५८.६० हेक्टर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील पाच तालुक्यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार ५५८.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक १ हजार १३८.६० हेक्टर क्षेत्राचे अमळनेर तालुक्यात नुकसान झाले आहे.

खरीप हंगामात झालेल्या अतिपावसामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. जिल्ह्यात झालेल्या या पावसामुळेच जलस्रोतामध्ये चांगले पाणी असल्याने रब्बी हंगाम चांगला येणार अशी अपेक्षा असतानाच या हंगामातही अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागत आहे. यामध्ये ६ ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव या पाच तालुक्यातील १ हजार ५५८.६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.

गव्हाचे मोठे नुकसान

पाच तालुक्यातील ५१ गावांमधील तीन हजार ९१८ शेतकऱ्यांचे ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू, मका, कांदा या पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक ६१२.६० हेक्टरवरील गव्हाला फटका बसला आहे. त्या खालोखाल ५०८ हेक्टरवरील ज्वारी, २४१ हेक्टरवरील मका, २२१ हेक्टरवरील हरभरा, पाऊन हेक्टरवरील बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका एकूण नुकसान

जळगाव १५.००

चाळीसगाव २२.००

अमळनेर ११३८.६०

पारोळा ३८३.००

भडगाव २५.१५

एकूण १५५८.६०