शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

वादळी पावसामुळे २२ घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे अमळनेर तालुक्यातील अंचलवाडीतील दोघी बहिणीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रविवारी दुपारपासून जळगाव शहरासह जिल्हयात वादळी वा-यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बहुतांश भागांमधील वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील ३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे वादळी वा-यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत तालुकासह जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे. तर शहरातील चिमुकले राम मंदिर, रिंगरोड, हरिविठठल नगर झाडे कोसळली होती. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

दोन बैलांचा मृत्यू

वादळी पाऊस सुरू असताना वीज कोसळून अमळनेर तालुक्यातील मंगळरूळ येथील शशिकांत पाटील यांचा मालकीचा बैल तर झाड कोसळून अमळनेर तालुक्यातील वावडे येथील भालेराव पाटील यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाला आहे.

सख्या बहिणींच्या अंगावर कोसळले झाड

अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडीवर झाड कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तर अमळनेर तालुक्यातीलचं पळासदळे येथे घर बांधकामासातील पत्रे व विटा अंगावर पडून दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्‍यात आला आहे.

कुठं पत्रे उडाले तर कुठं भिंती कोसळल्या...

पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावल्यामुळे जळगाव जिल्हयातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काहींचे पत्रे उडाले असून तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. फुलगाव (ता.भुसावळ) येथील विलास गायकवाड व रणाईचे येथील प्रकाशन रतन बोरसे तसेच सारबोटे (ता.अमळनेर) येथील सेना राठोड यांच्या घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जानवे (ता.अमळनेर) येथील बाळू गोबा पाटील यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्राचे छत व भिंत कोसळून नुकसान झाले आहे. कोळपिंप्री येथे एकाचे घराचे तर महाळपूर (ता.पारोळा) येथील १७ घरांचे पत्रे व भिंती कोसळून नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे.