शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसामुळे २२ घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादामुळे रविवारी जळगाव जिल्हयातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे अमळनेर तालुक्यातील अंचलवाडीतील दोघी बहिणीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.

रविवारी दुपारपासून जळगाव शहरासह जिल्हयात वादळी वा-यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बहुतांश भागांमधील वीज वाहिन्या तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. दुसरीकडे जळगाव तालुक्यातील मोहाडी गावातील ३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे वादळी वा-यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत तालुकासह जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे. तर शहरातील चिमुकले राम मंदिर, रिंगरोड, हरिविठठल नगर झाडे कोसळली होती. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

दोन बैलांचा मृत्यू

वादळी पाऊस सुरू असताना वीज कोसळून अमळनेर तालुक्यातील मंगळरूळ येथील शशिकांत पाटील यांचा मालकीचा बैल तर झाड कोसळून अमळनेर तालुक्यातील वावडे येथील भालेराव पाटील यांच्या मालकीच्या बैलाचा मृत्यू झाला आहे.

सख्या बहिणींच्या अंगावर कोसळले झाड

अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडीवर झाड कोसळले. त्यात ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. तर अमळनेर तालुक्यातीलचं पळासदळे येथे घर बांधकामासातील पत्रे व विटा अंगावर पडून दिलीप पाटील यांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्‍यात आला आहे.

कुठं पत्रे उडाले तर कुठं भिंती कोसळल्या...

पावसाने काही वेळ जोरदार हजेरी लावल्यामुळे जळगाव जिल्हयातील २२ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये काहींचे पत्रे उडाले असून तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. फुलगाव (ता.भुसावळ) येथील विलास गायकवाड व रणाईचे येथील प्रकाशन रतन बोरसे तसेच सारबोटे (ता.अमळनेर) येथील सेना राठोड यांच्या घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जानवे (ता.अमळनेर) येथील बाळू गोबा पाटील यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्राचे छत व भिंत कोसळून नुकसान झाले आहे. कोळपिंप्री येथे एकाचे घराचे तर महाळपूर (ता.पारोळा) येथील १७ घरांचे पत्रे व भिंती कोसळून नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद घेण्यात आली आहे.