शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : सर्वच सत्ताधारी एकाच माळेचे मणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:13 IST

जळगाव ते एरंडोल 34 किमी

कुंदन पाटीलजळगाव : सर्वच राजकारणी सारखे आहेत. सत्तेत असताना कापसाला भाव देत नाहीत आणि सत्तेतून गेल्यावर कापसाला भाव मिळावा म्हणून बोंबा मारतात. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर सांत्वनासाठी आलेल्या या राजकीय जत्थ्याचे तोंड पाहण्यासारखे असते. या अभिनय संपन्न राजकारण्यांपेक्षा शेतकरी आणि ग्रामीण जनतेला न्याय देणारे सरकार ज्यादिवशी सत्तेवर येईल. त्याचदिवशी देश सुखी होईल, असे परखड मत पाळधीच्या गुलाबराव पाटील या प्रवाशाने व्यक्त केले.खरंतर सरकार कुठलेही असो पण शिक्षणाला प्राधान्यक्रम देणारे असावे. ग्रामीण भागातूनच प्रयोगशीलतेचे अस्त्र हाती घेऊन ते प्राथमिक शिक्षणापासूनच लागू केल्यास खऱ्या अर्थात देशात सर्वार्थाने सक्षम अशी पिढी निर्माण होईल, असे मत भडगाव येथील रहिवासी आणि मु.जे. महाविद्यालयातील फरहीन शेख या विद्यार्थिनीने व्यक्त केले. एरंडोलचे डिगंबर महाजन म्हणतात, भ्रष्टाचारमुक्त सरकारच देशाला न्याय देऊ शकते.पंतप्रधान मोदींनी त्याची मुहूर्तमेढ रोवली असून ते पुन्हा सत्तेत येतील, असा दावा त्यांनी केला आहे.शिक्षण,शेतकºयाची दुवाजळगाव-एरंडोल या ४० मिनिटांच्या प्रवासात प्रवाशांसोबतच्या चर्चेत देशपातळीवर शिक्षण आणि शेतकरीच महत्त्वाचा असल्याचा मतप्रवाह व्यक्त होतो.युवा पिढी शिक्षण आणि भ्रष्टाचारमुक्तीला प्राधान्य देते. त्यांच्यादृष्टीने गाव, राज्य आणि राष्टÑीय मुद्दे होऊच शकत नाही.पाया मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalgaon-pcजळगावMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019