शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

बाबा, शाळेत केव्हा जायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने मुले घरात कंटाळवाणी झाली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे. यामुळे मुले कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई-बाबांना म्हणतात, ‘कोरोना केव्हा जाणार आणि शाळा केव्हा सुरू होणार? बाबा, मला खेळायला जायचं. आई, मला शाळेला जायचं... मुलांच्या या म्हणण्यावर आई-बाबा मात्र निरुत्तर होत आहेत.

मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालपणाच्या जीवनातील अविभाज्य अविस्मरणीय क्षण आहेत; परंतु कोरोना काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. कोठे गावालाही जायला मिळाले नसल्याने नातेवाइकांसह मामाचे गावही पोरके झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत, शालेय मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होण्याची शक्यता दर्शविल्याने मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरची परिस्थिती वाईट आणि भीतीदायक आहे तर घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, चिडचिडी, भांडकुदळ, हट्टी बनली आहेत. काही मुलांना तर मोबाइलशिवाय करमतच नाही. ते आईबाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची

आपल्या पाल्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. पालकांना पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शकांच्या भूमिका साकाराव्या लागत आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका या वेळेस फारच महत्त्वाची ठरत आहे. त्यातच सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने पालक शेतात मोलमजुरीसाठी आणि त्यांची मुले घरी त्यामुळे एकटे एकटे राहून मुलांची कोंडी होत आहे.

पालक प्रतिक्रिया

मुलांसाठी शाळा बंद असल्याने मुले खूपच चिडचिडी बनली आहेत. दिवसभर मोबाइलशी खेळत असतात. मी गवंडी कामाला बाहेर जातो. पत्नी शेतात कामाला जाते. त्यामुळे मुले रिकामी भटकत असतात. तलावावर जातात. वाटेल तिथे फिरतात. लक्ष द्यायला घरी कोणी नसते. हताश झाली आहेत. ‘बाबा, माझी शाळा कधी सुरू होणार?’ असे विचारतात.

- सय्यद इरफान सय्यद रसूल, पालक, गवंडी कामगार