शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

बाबा, शाळेत केव्हा जायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने मुले घरात कंटाळवाणी झाली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे. यामुळे मुले कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई-बाबांना म्हणतात, ‘कोरोना केव्हा जाणार आणि शाळा केव्हा सुरू होणार? बाबा, मला खेळायला जायचं. आई, मला शाळेला जायचं... मुलांच्या या म्हणण्यावर आई-बाबा मात्र निरुत्तर होत आहेत.

मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालपणाच्या जीवनातील अविभाज्य अविस्मरणीय क्षण आहेत; परंतु कोरोना काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. कोठे गावालाही जायला मिळाले नसल्याने नातेवाइकांसह मामाचे गावही पोरके झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत, शालेय मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होण्याची शक्यता दर्शविल्याने मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरची परिस्थिती वाईट आणि भीतीदायक आहे तर घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, चिडचिडी, भांडकुदळ, हट्टी बनली आहेत. काही मुलांना तर मोबाइलशिवाय करमतच नाही. ते आईबाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची

आपल्या पाल्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. पालकांना पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शकांच्या भूमिका साकाराव्या लागत आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका या वेळेस फारच महत्त्वाची ठरत आहे. त्यातच सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने पालक शेतात मोलमजुरीसाठी आणि त्यांची मुले घरी त्यामुळे एकटे एकटे राहून मुलांची कोंडी होत आहे.

पालक प्रतिक्रिया

मुलांसाठी शाळा बंद असल्याने मुले खूपच चिडचिडी बनली आहेत. दिवसभर मोबाइलशी खेळत असतात. मी गवंडी कामाला बाहेर जातो. पत्नी शेतात कामाला जाते. त्यामुळे मुले रिकामी भटकत असतात. तलावावर जातात. वाटेल तिथे फिरतात. लक्ष द्यायला घरी कोणी नसते. हताश झाली आहेत. ‘बाबा, माझी शाळा कधी सुरू होणार?’ असे विचारतात.

- सय्यद इरफान सय्यद रसूल, पालक, गवंडी कामगार