शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

बाबा, शाळेत केव्हा जायला मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हरताळा, ता. मुक्ताईनगर : कोरोनाच्या संकटामुळे मुले सलग दुसऱ्या वर्षी खेळापासून दुरावली आहेत. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने मुले घरात कंटाळवाणी झाली आहेत. या मुलांना स्वतःच्या घरातच कोरोनाने बंदिस्त करून ठेवले आहे. यामुळे मुले कंटाळून गेली आहेत. शेवटी न राहवून ते आई-बाबांना म्हणतात, ‘कोरोना केव्हा जाणार आणि शाळा केव्हा सुरू होणार? बाबा, मला खेळायला जायचं. आई, मला शाळेला जायचं... मुलांच्या या म्हणण्यावर आई-बाबा मात्र निरुत्तर होत आहेत.

मुलांच्या जीवनात खेळ आणि सवंगडी यांना खूप महत्त्व आहे. खेळामुळे मुलांचे आरोग्य व मन निरोगी राहते. बालकांना नैतिक धडे सवंगड्यांच्या खेळातून मिळत असतात. खेळ व सवंगडी हे बालपणाच्या जीवनातील अविभाज्य अविस्मरणीय क्षण आहेत; परंतु कोरोना काळात मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. कोठे गावालाही जायला मिळाले नसल्याने नातेवाइकांसह मामाचे गावही पोरके झाले आहे. अनेक दिवसांपासून त्यांना बाहेर सवंगड्यांसोबत, शालेय मित्रांसोबत मनसोक्त खेळायला मिळालेच नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक बाधा होण्याची शक्यता दर्शविल्याने मुलांसह पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरची परिस्थिती वाईट आणि भीतीदायक आहे तर घरातल्या घरात राहून ही मुले एकलकोंडी, चिडचिडी, भांडकुदळ, हट्टी बनली आहेत. काही मुलांना तर मोबाइलशिवाय करमतच नाही. ते आईबाबांना नानाविध प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.

पालकांची भूमिका महत्त्वाची

आपल्या पाल्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी पालकांची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. कोरोना काळात मुलांची शाळा, खेळ व मित्र त्यांच्यापासून दुरावलेले आहेत. पालकांना पालकत्व जपून शिक्षक, मित्र, मार्गदर्शकांच्या भूमिका साकाराव्या लागत आहेत. मुलांच्या मानसिक जडणघडणीत पालकांची भूमिका या वेळेस फारच महत्त्वाची ठरत आहे. त्यातच सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने पालक शेतात मोलमजुरीसाठी आणि त्यांची मुले घरी त्यामुळे एकटे एकटे राहून मुलांची कोंडी होत आहे.

पालक प्रतिक्रिया

मुलांसाठी शाळा बंद असल्याने मुले खूपच चिडचिडी बनली आहेत. दिवसभर मोबाइलशी खेळत असतात. मी गवंडी कामाला बाहेर जातो. पत्नी शेतात कामाला जाते. त्यामुळे मुले रिकामी भटकत असतात. तलावावर जातात. वाटेल तिथे फिरतात. लक्ष द्यायला घरी कोणी नसते. हताश झाली आहेत. ‘बाबा, माझी शाळा कधी सुरू होणार?’ असे विचारतात.

- सय्यद इरफान सय्यद रसूल, पालक, गवंडी कामगार