शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा ...

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारलाही चांगलाच बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणचे सब स्टेशन व वीज खांब कोसळल्यामुळे खान्देशातील सुमारे ६७७ गावांचा वीज खंडित झाला. यात सोमवारी सायंकाळ पर्यंत महावितरण प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी' लोकमत'' ला दिली.

रविवारी दुपार पासूनच सर्वत्र सुरू झालेले वादळी वारे आणि त्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. रविवारी रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मुख्य अति उच्च दाब वाहिनीवरच्या तारा व खांब कोसळले. यात महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात ६७७ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडे तीनशे गावांचा समावेश होता. त्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील पावणे दोनशे तर उर्वरित नंदुरबार जिल्ह्यातील गावे होती.

इन्फो :

३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात

खान्देशात विविध गावात झालेल्या वीज पुरवठा खंडितमुळे ३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात होते. यापैकी सोमवारी सायंकाळ पर्यंत ३ लाख ३२ हजार ६३६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. तसेच या वादळात १४ हजार ८९५ रोहित्र बंद झाले असल्याचेही सांगण्यात आले. तसेच उच्च दाब वाहिनीचे ५२ व लघुदाब वाहिनीचे १५९ खांब कोसळले होते.

इन्फो :

७८ सब स्टेशन बंद

या वादळामुळे विविध ठिकाणचे एकूण ७८ सब स्टेशन बंद पडले होते. त्या पैकी काही सब स्टेशनचा रविवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळ पर्यंत ७२ सब स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच अतिउच्च क्षमतेच्या ४४२ वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या, त्यातील ४०६ वीज वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळ पासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन युद्ध पातळीवर काम करून सोमवारी सायंकाळ पर्यंत ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला होता.

इन्फो :

चक्री वादळात जळगाव परिमंडळात ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, त्यातील बहुतांश गावांमध्ये रविवारी रात्रीच तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागात सोमवारी सकाळ पासूनच वीज पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते. चक्री वादळाचे वारे असल्याने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळ पर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला होता.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण