शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
3
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
4
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
5
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
6
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
7
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
8
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
9
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
10
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
11
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
12
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
13
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
14
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
15
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
16
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
17
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
18
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
19
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
20
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...

चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा ...

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारलाही चांगलाच बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणचे सब स्टेशन व वीज खांब कोसळल्यामुळे खान्देशातील सुमारे ६७७ गावांचा वीज खंडित झाला. यात सोमवारी सायंकाळ पर्यंत महावितरण प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी' लोकमत'' ला दिली.

रविवारी दुपार पासूनच सर्वत्र सुरू झालेले वादळी वारे आणि त्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. रविवारी रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मुख्य अति उच्च दाब वाहिनीवरच्या तारा व खांब कोसळले. यात महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात ६७७ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडे तीनशे गावांचा समावेश होता. त्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील पावणे दोनशे तर उर्वरित नंदुरबार जिल्ह्यातील गावे होती.

इन्फो :

३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात

खान्देशात विविध गावात झालेल्या वीज पुरवठा खंडितमुळे ३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात होते. यापैकी सोमवारी सायंकाळ पर्यंत ३ लाख ३२ हजार ६३६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. तसेच या वादळात १४ हजार ८९५ रोहित्र बंद झाले असल्याचेही सांगण्यात आले. तसेच उच्च दाब वाहिनीचे ५२ व लघुदाब वाहिनीचे १५९ खांब कोसळले होते.

इन्फो :

७८ सब स्टेशन बंद

या वादळामुळे विविध ठिकाणचे एकूण ७८ सब स्टेशन बंद पडले होते. त्या पैकी काही सब स्टेशनचा रविवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळ पर्यंत ७२ सब स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच अतिउच्च क्षमतेच्या ४४२ वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या, त्यातील ४०६ वीज वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळ पासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन युद्ध पातळीवर काम करून सोमवारी सायंकाळ पर्यंत ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला होता.

इन्फो :

चक्री वादळात जळगाव परिमंडळात ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, त्यातील बहुतांश गावांमध्ये रविवारी रात्रीच तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागात सोमवारी सकाळ पासूनच वीज पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते. चक्री वादळाचे वारे असल्याने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळ पर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला होता.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण