शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे खान्देशातील ६७७ गावांची बत्ती झाली गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा ...

महावितरण : जळगाव महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी गावे अंधारात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ' तौक्ते ' चक्री वादळाचा फटका जळगाव जिल्ह्यासह धुळे व नंदुरबारलाही चांगलाच बसला आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणचे सब स्टेशन व वीज खांब कोसळल्यामुळे खान्देशातील सुमारे ६७७ गावांचा वीज खंडित झाला. यात सोमवारी सायंकाळ पर्यंत महावितरण प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला असल्याची माहिती महावितरणच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी' लोकमत'' ला दिली.

रविवारी दुपार पासूनच सर्वत्र सुरू झालेले वादळी वारे आणि त्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. रविवारी रात्रभर आणि सोमवारी दुपार पर्यंत सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मुख्य अति उच्च दाब वाहिनीवरच्या तारा व खांब कोसळले. यात महावितरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात ६७७ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे साडे तीनशे गावांचा समावेश होता. त्या पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील पावणे दोनशे तर उर्वरित नंदुरबार जिल्ह्यातील गावे होती.

इन्फो :

३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात

खान्देशात विविध गावात झालेल्या वीज पुरवठा खंडितमुळे ३ लाख ६० हजार ५२४ ग्राहक अंधारात होते. यापैकी सोमवारी सायंकाळ पर्यंत ३ लाख ३२ हजार ६३६ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. तसेच या वादळात १४ हजार ८९५ रोहित्र बंद झाले असल्याचेही सांगण्यात आले. तसेच उच्च दाब वाहिनीचे ५२ व लघुदाब वाहिनीचे १५९ खांब कोसळले होते.

इन्फो :

७८ सब स्टेशन बंद

या वादळामुळे विविध ठिकाणचे एकूण ७८ सब स्टेशन बंद पडले होते. त्या पैकी काही सब स्टेशनचा रविवारी रात्री वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. तर सोमवारी सायंकाळ पर्यंत ७२ सब स्टेशनचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. तसेच अतिउच्च क्षमतेच्या ४४२ वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या, त्यातील ४०६ वीज वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळ पासून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन युद्ध पातळीवर काम करून सोमवारी सायंकाळ पर्यंत ५९९ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला होता.

इन्फो :

चक्री वादळात जळगाव परिमंडळात ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, त्यातील बहुतांश गावांमध्ये रविवारी रात्रीच तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागात सोमवारी सकाळ पासूनच वीज पुरवठा सुरू करण्याचे काम सुरू होते. चक्री वादळाचे वारे असल्याने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळ पर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला होता.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण