शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

हतनूर धरणातील आवर्तन पोहोचले नांद्रा खुर्दपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात एक आवर्तन सोडण्यात आल्याने ममुराबादसह परिसरातील गावांना टंचाईच्या काळात दिलासा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात एक आवर्तन सोडण्यात आल्याने ममुराबादसह परिसरातील गावांना टंचाईच्या काळात दिलासा मिळाला आहे.

तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण झाले झाल्याने हतनूर धरणाचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर हतनूरच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ दलघमी पाणी सोडण्यात आले असून, ते बुधवारी सकाळी नांद्रा गावापर्यंत पोहोचले.

ममुराबादसह परिसरातील नांद्रा, खापरखेडा, तुरखेडा, आवार, विदगाव आदी गावांच्या पाणी योजना तापी नदीवर अवलंबून आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः मे महिन्यात तापीचे पात्र कोरडेठाक पडल्यानंतर संबंधित सर्व गावांना दरवर्षी तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही तीच परिस्थिती ओढवलेली असताना, पाणी योजनांचे पंप दिवसातून बंद राहत होते. त्याबद्दल ‘लोकमत’मध्येही काही दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमधील सरपंच तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी हतनूरचे एक आवर्तन तापी नदीपात्रात सोडण्यासाठी निवेदन देऊन पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन पाण्याचे आवर्तन सोडण्याविषयी आदेश दिले. त्यानुसार यावल तालुक्यातील सूर नदीद्वारे हतनूरच्या उजव्या कालव्याचे पाणी जळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पात्रात सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. देऊळवाडे गावाजवळ तापीच्या पात्रात सूर नदीचे पाणी येऊन मिळते. तेथून नांद्रा गावापर्यंत बुधवारी सकाळपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहोचले. टंचाईग्रस्त गावांना त्यामुळे काही दिवस दिलासा मिळू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली.

----

फोटो कॅप्शन - ममुराबाद सामूहिक योजनेसाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी तापी नदीच्या पात्रात हतनूरचे पाणी पोहोचले. (जितेंद्र पाटील)