शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

हतनूर धरणातील आवर्तन पोहोचले नांद्रा खुर्दपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात एक आवर्तन सोडण्यात आल्याने ममुराबादसह परिसरातील गावांना टंचाईच्या काळात दिलासा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : हतनूर धरणातून तापी नदीपात्रात एक आवर्तन सोडण्यात आल्याने ममुराबादसह परिसरातील गावांना टंचाईच्या काळात दिलासा मिळाला आहे.

तापी नदीचे पात्र कोरडे पडल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण झाले झाल्याने हतनूर धरणाचे एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर हतनूरच्या उजव्या कालव्याद्वारे २.९२ दलघमी पाणी सोडण्यात आले असून, ते बुधवारी सकाळी नांद्रा गावापर्यंत पोहोचले.

ममुराबादसह परिसरातील नांद्रा, खापरखेडा, तुरखेडा, आवार, विदगाव आदी गावांच्या पाणी योजना तापी नदीवर अवलंबून आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः मे महिन्यात तापीचे पात्र कोरडेठाक पडल्यानंतर संबंधित सर्व गावांना दरवर्षी तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागते. यंदाही तीच परिस्थिती ओढवलेली असताना, पाणी योजनांचे पंप दिवसातून बंद राहत होते. त्याबद्दल ‘लोकमत’मध्येही काही दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. याशिवाय टंचाईग्रस्त गावांमधील सरपंच तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी हतनूरचे एक आवर्तन तापी नदीपात्रात सोडण्यासाठी निवेदन देऊन पाणीपुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंदर्भात तातडीने धोरणात्मक निर्णय घेऊन पाण्याचे आवर्तन सोडण्याविषयी आदेश दिले. त्यानुसार यावल तालुक्यातील सूर नदीद्वारे हतनूरच्या उजव्या कालव्याचे पाणी जळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पात्रात सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. देऊळवाडे गावाजवळ तापीच्या पात्रात सूर नदीचे पाणी येऊन मिळते. तेथून नांद्रा गावापर्यंत बुधवारी सकाळपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहोचले. टंचाईग्रस्त गावांना त्यामुळे काही दिवस दिलासा मिळू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शशिकांत चौधरी यांनी दिली.

----

फोटो कॅप्शन - ममुराबाद सामूहिक योजनेसाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी तापी नदीच्या पात्रात हतनूरचे पाणी पोहोचले. (जितेंद्र पाटील)