शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कटती करणाऱ्या कापूस खरेदी केंद्रांना काळ्या यादीत टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांना अधिकार व संरक्षण देणारा कायदा असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र सरकारने मंजूर केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांना अधिकार व संरक्षण देणारा कायदा असून, यामुळे अनेकांची दलाली बंद होणार असल्यानेच त्याला विरोधकांकडून विरोध केला जात असल्याचा आरोप खासदार उन्मेष पाटील यांनी केला. एकीकडे शेतकरी आंदोलन सुरू असले तरी दुसरीकडे कापूस खरेदीत कटती होत असल्याचे प्रकार सुरू असल्यास अशा खरेदी केंद्रांना काळ्या यादीत टाकू, असा इशारादेखील खासदार पाटील यांनी दिला.

कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हा विरोध केवळ राजकीय विरोध असून, हा कायदा शेतकऱ्यांसाठी कसा लाभदायक आहे, या विषयी माहिती देण्यासाठी रविवारी भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते.

सीसीआयचे पथक तयार करणार

शेतकऱ्यास आजही हमीभाव मिळत नसताना कापूस खरेदीत उलट कटती केली जाते, याविषयी खासदार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या कापूस खरेदी केंद्रावर कटती केली जात असेल, त्या केंद्रांना काळ्या यादीत टाकले जाईल. तसेच अशा केंद्रांवर पाहणी करण्यासाठी सीसीआयचे पथक नेमले जाईल. यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.

केवळ राजकारण

शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात होते. त्यांच्या काळात ज्या सुधारणा राज्यात झाल्या, त्या आता देशपातळीवर होत आहे. मग आता त्याला विरोध का, असा सवालदेखील यावेळी खासदार पाटील यांनी उपस्थित केला.

शेतकरी आंदोलनात शेतकरी नाही तर आडते, बाजार समितींचे पदाधिकारी

दिल्लीतील आंदोलनात पंजाब, हरियाणामधील आडते, मापाडी, पदाधिकाऱ्यांचाच समावेश असल्याचा दावादेखील खासदार पाटील यांनी केला. या आडते, मापाडी, पदाधिकाऱ्यांना विरोधक भडकावत असून, त्यामुळेच हे आंदोलन पेटत असल्याचे सांगण्यात आले.

दानवे यांचे वक्तव्य शेतकरी समर्थनार्थ

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना खासदार पाटील म्हणाले की, चीनने भारताची मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. तर पाकिस्तान हा भारतीय कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे. नवीन कायद्यामुळे अनेकांची दलाली बंद होणार असल्याने काही संघटनांनाही त्याचा फटका बसणार आहे. विदेशातून आयात-निर्यात होणाऱ्या मालाशी संबंधित संघटनांकडूनच आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे दानवे यांचे म्हणणे होते, असे खासदार पाटील यांनी स्पष्ट केले.

अवसायक नेमणुकीचा काळ कोणताही असो, प्रवृत्तींना भाजपचा विरोध

बीएचआर संस्थेत भाजपच्या काळात अवसायकाची नेमणूक झाली होती. या विषयी विचारले असता खासदार पाटील म्हणाले की, अवसायक नेमणुकीचा काळ कोणताही असो, यात कोणीही असो, कोणत्याही प्रवृत्ती असो तसेच यात आमचा पक्ष असो अथवा इतर कोणत्याही पक्षाचा सहभाग असो, त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे खासदार पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांचा उर्वरित कापूस कोण घेणार?

राज्य सरकारने केवळ चांगल्या दर्जाचाच कापूस खरेदी करावा, अशा सूचना केंद्रांना दिल्या आहेत. चांगल्या दर्जाचाच कापूस घेतला गेला तर ज्या कापसाला थोडेफार पाणी लागून त्याच्या दर्जावर परिणाम झाला असेल, तो कापूस कोण घेईल, असा सवाल यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थित केला. कापूस खरेदीत कटतीविषयी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे आमदार सुरेश भोळे म्हणाले.